शहरं
Join us  
Trending Stories
1
जगापासून लपवले, सॅटेलाइटने सगळे टिपले; इराण हल्ल्यात अमेरिकेची १५ तळावरील २२८ ठिकाणे बेचिराख
2
“भारत-व्हिएतनाम संबंध अधिक दृढ करण्यासाठी महाराष्ट्र कटिबद्ध”: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
3
पश्चिम बंगालमध्ये ममता राज संपुष्टात! राज्यपालांकडून मंत्रिमंडळ बरखास्त; आता होणार भाजप युगाची सुरुवात
4
गुंतवणूकदारांची चांदी! देशातील सर्वात महागड्या शेअरकडून 'डिविडेंड' जाहीर, एका स्टॉकची किंमत १३००००; किती मिळणार लाभांश?
5
Mitchell Marsh Fastest Century: मिचेल मार्शचा मोठा पराक्रम; जलद शतकी खेळीसह रिषभ पंतचा विक्रम मोडला
6
“२०२९ला सुनेत्रा पवार मुख्यमंत्रीपद अन् बारामतीच्या उमेदवार असतील”; जय पवारांचा मोठा दावा
7
SSC Result 2026: दहावीच्या विद्यार्थ्यांची निकालाची प्रतीक्षा संपली! उद्या दुपारी १ वाजता जाहीर होणार रिझल्ट; 'या'वेबसाईटवर पाहा
8
“सीमावर्ती भागात जाऊ नये”; बांगलादेशचे नागरिकांना आवाहन, प. बंगालमध्ये भाजपा येताच सतर्क
9
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीनंतर हिंसाचार सुरूच! हावड्यात भाजप कार्यकर्त्यांवर बॉम्बफेक; पाच जण गंभीर
10
Bhuvneshwar Kumar: स्विंगचा किंग भुवीनं रचला इतिहास; IPL मध्ये 'हा' मैलाचा पल्ला गाठणारा ठरला पहिला
11
गोड बातमी! भारतीय T20 कर्णधार सूर्यकुमार यादवला कन्यारत्न; देविशाने दिला गोंडस मुलीला जन्म
12
Nagpur Crime : धक्कादायक ! २१ वर्षीय तरुणाकडून सावत्र आईवर बलात्कार; पीडिता चार महिन्यांची गरोदर
13
"गजब भयो रामा जुलम भयो रे..."; बंगालमध्ये 'मुर्शिद ते मोदी' अन् 'मदीना ते कृष्णा'; निकालानंतर धून तीच बोल नवीन...! - VIDEO 
14
तामिळनाडूमध्ये राज्यपाल विरोधाचा दुसरा अंक! विजय दुसऱ्यांदा माघारी परतला; कार्यकर्ते संतापले
15
कोण आहेत तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर? बहुमत असून सत्तास्थापनेत पेच; देशाचे लक्ष
16
ठाणे, कल्याण डोंबिवलीत वादळी वारे, धुळीचे लोट; DCM शिंदेंच्या हेलिकॉप्टरचे 'इमर्जन्सी लँडिंग'
17
Suvendu Adhikari : "मी भवानीपूरमध्ये ममता बॅनर्जींचा पराभव केला, म्हणूनच चंद्रनाथची हत्या झाली"; सुवेंदू अधिकारी आक्रमक
18
Mumbai Watermelon Case : ना कलिंगड, ना बिर्याणी...पायधुनीतील 'त्या' चौघांच्या मृत्यूचं खरं कारण अखेर समोर!
19
यंदा शनि जयंती कधी आहे? दर्श भावुका अमावास्या अन् सौभाग्य योग; पाहा, महत्त्व अन् मान्यता
20
नुसतं सोनंच नाही, तर खाणीतून सोनं काढणंही महागलं! इराण युद्धामुळे डिझेल-स्फोटकांचे दर भडकले; पाहा काय आहे गणित
Daily Top 2Weekly Top 5

पाचगाव झाले ‘खासगाव’

By admin | Updated: November 24, 2014 01:21 IST

पाचगावचा फक्त भौैतिकच नव्हे तर सामाजिक आणि सांस्कृतिक पातळीवर विकास करून हे गाव महाराष्ट्रात एक आदर्श गाव ठरेल असे प्रयत्न करू, असा संकल्प केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी

राज्यात आदर्श गाव करणार : नितीन गडकरी यांचा संकल्प
नागपूर : पाचगावचा फक्त भौैतिकच नव्हे तर सामाजिक आणि सांस्कृतिक पातळीवर विकास करून हे गाव महाराष्ट्रात एक आदर्श गाव ठरेल असे प्रयत्न करू, असा संकल्प केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.
संसद आदर्श ग्राम योजनेंतर्गत गडकरी यांनी उमरेड तालुक्यातील पाचगाव हे गाव दत्तक घेतले. या योजनेचा शुभांरभ रविवारी गडकरी यांच्या हस्ते झाला. त्यावेळी त्यांनी पाचगावच्या विकासाबाबत असलेल्या संकल्पनेची मांडणी केली. गावाचा विकास करणे ही फक्त माझी किंवा अधिकाऱ्यांची जबाबदारी नसून गावातील नागरिकांचाही त्यात सहभाग असावा,असे आवाहन त्यांनी यावेळी केले. गाव व्यसनमुक्त करण्यासाठी महिलांनी पुढाकार घेण्याचे आवाहन त्यांनी केले. किमान कौशल्यावर आधारित रोजगार केंद्र सुरू करणे, महिला बचत गटांच्या माध्यमातून रोजगार निर्मिती, बँकेच्या माध्यमातून चार टक्के दराने कर्जपुरवठ्यासह अनेक योजनांची घोषणा गडकरी यांनी केली. पुढील १५ दिवसांनी गावात येऊन समस्यांची पाहणी करून कामाला सुरुवात करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी खासदार कृपाल तुमाने व आमदार सुधीर पारवे यांची भाषणे झाली. यावेळी शौचालये बांधण्यासाठी ५ लाख १० हजार रुपयांचा धनादेश ग्रामपंचायतीला देण्यात आला. ८५ लाभार्थ्यांना प्रत्येकी ६ हजार रुपये अनुदान वाटप करण्यात येणार आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जि.प.चे मुख्य कार्यपालन अधिकारी शिवाजीराव जोंधळे यांनी केले तर आभार सरपंच पुण्यशिला मेश्राम यांनी मानले. कार्यक्रमाला भाजपचे जिल्ह्यातील सर्व आमदार, माजी खासदार दत्ता मेघे, जिल्हाधिकारी अभिषेक कृष्णा यांच्यासह मोठ्या प्रमाणात गावकरी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
आमदार, जि.प.सदस्यांना आवाहन
खासदाराप्रमाणेच आमदार आणि जिल्हा परिषद सदस्यांनीही एक गाव दत्तक घेऊन विकास करावा, यातून विकासाची स्पर्धा निर्माण होईल, असे गडकरी म्हणाले.