शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
4
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
5
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
6
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
7
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
8
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
9
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
10
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
11
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
12
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
13
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
14
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
15
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
16
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
17
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
18
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
19
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
20
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
Daily Top 2Weekly Top 5

इंग्रजी शाळा संस्था चालकांचा वाढला संताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:07 IST

नागपूर : महाराष्ट्र शासनाने १९ मे रोजी एक परिपत्रक काढून आरटीईच्या प्रतिपूर्तीचे नवीन दर निश्चित केले. हे ...

नागपूर : महाराष्ट्र शासनाने १९ मे रोजी एक परिपत्रक काढून आरटीईच्या प्रतिपूर्तीचे नवीन दर निश्चित केले. हे दर निश्चित करताना ५० टक्क्यांची कपात केली. त्यामुळे राज्यातील इंग्रजी शाळेच्या संस्था चालकांमध्ये असंतोषाचा भडका उडाला आहे. चार-चार वर्षे प्रतिपूर्ती द्यायची नाही. प्रतिपूर्ती देणे होत नसल्याने ५० टक्क्यांची घट करून शासनाने इंग्रजी शाळांवर अन्याय केला असल्याची भावना संस्था चालकांच्या संघटनांनी व्यक्त करीत आंदोलनाचा इशारा दिला आहे.

माहिती अधिकारात मिळालेल्या माहितीनुसार, केंद्र सरकार आरटीईची प्रतिपूर्ती प्रति विद्यार्थी २९,००० रुपये देते. असे असताना राज्य सरकार वर्ष २०२०-२१ करिता ८,००० रुपये परतावा कुठल्या निकषांच्या आधारावर ठरवित आहे, असा सवाल संस्थाचालकांचा आहे. गेल्या ४ वर्षांपासून निधीचा परतावा दिला नाही. नवीन प्रवेश घेण्याबाबत बंधने टाकली जात आहे व अशात परताव्याची रक्कम १७,६७० वरून ८,००० रुपये केली आहे. ही मनमानी राज्यातील इंग्रजी शाळा कधीही खपवून घेणार नाहीत. या परिपत्रकाच्या विरोधात लवकरच नागपूर उच्च न्यायालयाच्या खंडपीठात दाद मागण्याची भूमिका संस्था चालकांनी घेतली आहे. सरकार कुठलेही निकष न ठरविता वर्ष संपल्यानंतर सरसकट ५० टक्के परतावा रक्कम कशी काय कमी करू शकते, असा सवाल संस्था चालकांनी केला.

- विद्युत बिल, मनपा टक्स, टेलीफोन बिल, जीएसटी आदी सेवांचा चार्ज शाळाकडून १०० टक्के घेतल्या जातो. राज्याने ठरवून दिलेला १७,६७० रुपयांचा परतावा, महागाई वाढत असताना ५० टक्के कपात केला जातो. हा अजब न्याय आहे. थकीत पूर्ण निधी न देता, शासन आमची मुस्कटदाबी करीत आहे. सरकारच्या या परिपत्रकाचा विरोध करून रस्त्यावर उतरू वेळप्रसंगी न्यायालयात दाद मागणार.

प्रा.सचिन काळबांडे, अध्यक्ष, आरटीई फाउंडेशन

-

‘मेस्टा’ कोर्टात जाणार

कोरोना महामारीसारख्या संकटात शासन दरबारी बसलेले काही उचापतीखोर मंडळी दर महिन्याला काही ना काही सुल्तानी संकट उभे करीत आहे. आरटीईमध्ये नोंदणीकृत असलेल्या बहुतांश शाळा स्वयंअर्थसहायित आहे. शालेय शुल्क विद्यार्थ्यांनी भरले नसल्याने, कोरोनामुळे शाळांची स्थिती फार बिकट झाली आहे. हक्काचा निधी सरकार तीन-तीन वर्ष देत नाही. अशात आरटीईच्या प्रतिपूर्तीमध्ये कपात करून आमची कोंडी करीत आहे. आम्ही या निर्णयाविरुद्ध कोर्टात जाणार, असा इशारा मेस्टाचे विभागीय सचिव कपिल उमाळे व विभाग संयोजक अ‍ॅड.निशांत नारनवरे यांनी दिला.