शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब किंग्सच्या विजयाने वाढली चेन्नई सुपर किंग्सची डोकेदुखी; Play off साठी ठोकली दावेदारी
2
"हिम्मत असेल, तर घोषणा करा..."! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधींना दिली 3 आव्हानं; बघा VIDEO
3
"पोलिसांनी त्याची हत्या केली..."! सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपीच्या आत्महत्येला नवं वळण
4
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
5
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
6
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
7
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
8
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
9
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
10
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
11
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
12
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
13
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
14
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
15
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
16
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
17
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
18
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
19
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
20
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम

आर्द्रता घटली, आठवडाभरात वाढणार उष्णतामान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 07, 2021 12:23 AM

Humidity decreased विदर्भातील वातावरणात आर्द्रता मोठ्या प्रमाणावर घटली आहे. हवामान विभागाने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार, येत्या आठवड्यात मोठ्या प्रमाणावर वातावरण कोरडे होण्याची शक्यता आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : विदर्भातील वातावरणात आर्द्रता मोठ्या प्रमाणावर घटली आहे. हवामान विभागाने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार, येत्या आठवड्यात मोठ्या प्रमाणावर वातावरण कोरडे होण्याची शक्यता आहे. तसेच विदर्भातील सरासरी तापमान ३८ ते ३८.८ अंशाच्या जवळपास जाईल, असा अंदाज वर्तविला आहे.

नागपूर शहरातील शनिवारचे तापमान ३७.४ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. दिवसभर वातावरणात चांगलाच उकाडा होता. शहरातील आर्द्रतेमध्येही मोठ्या प्रमाणावर घट नोंदविण्यात आली. सकाळी आर्द्रता ३७ टक्के होती. ती सायंकाळी घटून १७ टक्क्यांवर आली. त्यामुळे सायंकाळी वातावरणात उकाडा जाणवत होता.

विदर्भात चंद्रपूर आणि अकोल्यात सर्वाधिक तापमान नोंदविण्यात आले. चंद्रपुरात ३९.४ तर अकोल्यात ३९.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. अमरावती, बुलडाणा, गडचिरोली, यवतमाळ आणि नागपूरचे तापमान ३७ अंशावर राहिले. तर वर्ध्यात मध्ये ३८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली.

नागपुरातील भारतीय हवामान विभाग प्रादेशिक हवामान केंद्राच्या अंदाजानुसार, ६ मार्च ते १० मार्च दरम्यान आकाश निरभ्र राहील, असा अंदाज आहे. हवामान कोरडे, कमाल तापमान ३८ ते ३८.८ अंश सेल्सिअस, किमान तापमान १७.५ ते १९.५ अंश सेल्सिअस राहील, असा अंदाज व्यक्त केला आहे. सकाळची सापेक्ष आर्द्रता ३७ ते ४७ टक्के, दुपारची सापेक्ष आर्द्रता २१ ते २९ टक्के तर वाऱ्याचा वेग ६ किलोमीटर प्रती तास राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

शेतकऱ्यांना सल्ला

तापमानात होणारी संभाव्य वाढ लक्षात घेता, जनावरांना हिरवा चारा, पिण्यास थंड व स्वच्छ पाणी द्यावे तसेच सावलीच्या ठिकाणी निवाऱ्याची व्यवस्था करावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर पालेभाज्या, भेंडी, गवार, चवळी, काकडी, दुधी भोपळा, काशीफळ, दोडका, कारली, ढेमसे, टरबूज, खरबूज, पालक, मुळा, मेथी आणि कोथिंबीर पिकास जमिनीतील ओलावा बघून आवश्यकतेनुसार ओलीत करावे. परिपक्व झालेल्या हरभरा, जवस, गहू, ज्वारी, मका, करडई, तूर आणि इतर पिकाची तात्काळ काढणी व मळणीची कामे करून सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी, असेही सुचविण्यात आलीे आहे.

टॅग्स :weatherहवामानnagpurनागपूर