शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायत सशक्तीकरण गुंडाळले

By admin | Updated: July 25, 2015 03:16 IST

केंद्र आणि राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर ग्रामीण विकासाला गती मिळण्याची अपेक्षा होती.

गणेश हूड नागपूरकेंद्र आणि राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर ग्रामीण विकासाला गती मिळण्याची अपेक्षा होती. परंतु आघाडी सरकारच्या काळातील अनेक चांगल्या योजना बंद करण्याचा सपाटा सुरू आहे. अशीच राजीव गांधी पंचायत सशक्तीकरण योजना गुंडाळली आहे. योजना बंद झाल्याने ३६ कंत्राटी अभियंते बेरोजगार झाले असून ग्रामीण विकासाला ब्रेक लागले आहे. ग्रामपंचायतींना अधिकाधिक सक्षम करण्यासाठी २०११ पासून जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागागाच्या माध्यमातून राजीव गांधी पंचायत सशक्तीकरण अभियानाला सुरुवात करण्यात आली. सुरुवातीला अभियान संथ होते. परंतु मागील दोन वर्षात गती पकडल्याने ग्रामीण भागातील विकास कामांना गती मिळाली होती. गावाचा विकास करतानाच ग्रामपंचायत सक्षम असावी. हक्काचे कार्यालय असावे, यासाठी सर्वप्रथम या अभियानातून राजीव गांधी भवन ही संकल्पना गावागावात राबविण्यात आली. यातून जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात ग्रामपंचायत भवनाची कामे हाती घेण्यात आली. ग्रामपंचायतीच्या कारभाराला गती मिळण्याला मदत झाली.या योजनेंतर्गत ५ हजाराहून अधिक लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींना ग्रामपंचायत भवन बांधकामासाठी प्रत्येकी १२ लाखाचा निधी ग्रामपंचायत भवन बांधकामासाठी मिळत होता. २०१३-१४ या वर्षात नागपूर जिल्ह्याला केंद्राकडून ४.४१ कोटी तर राज्य सरकारकडून १.४७ कोटी असा ५.८८ कोटीचा निधी प्राप्त झाला होता. अभियान राबविण्यासाठी जि.प.ते ग्रामपंचायत स्तरापर्यत कर्मचारी व अधिकाऱ्यांची यंत्रणा निर्माण करण्यात आली होती. यात ५ हजाराहून अधिक लोकसंख्या असलेल्या गावाच्या ठिकाणी कंत्राटी अभियंता नियुक्त करण्यात आले होते. जिल्ह्यात ३६ कंत्राटी अभियंता व ८ गटअभियंता यांची नियुक्ती करण्यात आली. तर जिल्हा कार्यालयात लेखाधिकारीं , साहायक,लिपीक व परिचर अशी पदे कंत्राटी पद्धतीवर भरण्यात आली होती. परंतु केंद्रात सत्ताबदल झाल्याने २०१४-१५ या वर्षात निधी मिळाला नाही. वर्षभरात निधी नसल्याने या योजनेचे काम ठप्प आहे.