शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

यंत्रणा उभारली तर अंत्यसंस्काराच्या यातनातून सुटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 21:32 IST

Cremation problem नागपूर शहरातील सर्व १६ दहन घाटावर विद्युत वा एलपीजी शवदाहिनीची सुविधा निर्माण केली तर अंत्यसंस्कार सुलभ होतील. कोरोनामुळे महापालिकेला ही संधी प्राप्त झाली आहे.

ठळक मुद्देमनपाला कोरोनामुळे संधी : नागरिकांना अंत्यसंस्कारासाठी प्रतीक्षा करावी लागणार नाही

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : नागपूर जिल्ह्यातील कोविड रुग्णांची संख्या पाच हजारांवर गेली आहे. शहरातील आकडाही वाढत आहे, सोबतच मृत्यूचा आकडा वाढत आहे. दररोज शंभराहून अधिक मृत्यू होत असल्याने दहन घाटावर अंत्यसंस्कारासाठी वेटिंग आहे. घाटावर सुविधा उपलब्ध करण्याची जबाबदारी महापालिकेची आहे. मोफत लाकडे उपलब्ध केली म्हणजे जबाबदारी संपली, असा याचा अर्थ होत नाही. बदलत्या परिस्थितीत घाटावर आधुनिक सुविधा उपलब्ध कराव्या लागतील. शहरातील सर्व १६ दहन घाटावर विद्युत वा एलपीजी शवदाहिनीची सुविधा निर्माण केली तर अंत्यसंस्कार सुलभ होतील. कोरोनामुळे महापालिकेला ही संधी प्राप्त झाली आहे. प्रशासनाने नियोजन करून यासाठी आर्थिक तरतूद करून घाटांचा विस्तार, सौंदर्यीकरण, नवीन घाटांची निर्मिती ही काळाची गरज आहे.

मनपाचे १६ दहन घाट आहेत. यापैकी मोक्षधाम, अंबाझरी व सहकारनगर या घाटावर विद्युत दाहिनी तर गंगाबाई व वैशालीनगर घाटावर एलपीजी दाहिनीची सुविधा आहे. अन्य घाटावर अंत्यसंस्कारासाठी लाकूड वा काष्ठ वापरले जातात. यावर मनपाला मोठा खर्च करावा लागतो. विद्युत दाहिनीत अंत्यसंस्कार केल्यास प्रत्येक अंत्यसंस्कारामागे एक हजाराची बचत होऊन पर्यावरणपूरक अंत्यसंस्कार करता येतील. मनपा अर्थसंकल्पात घाटांची देखभाल करण्यासाठी पाच ते सहा कोटीची तरतूद केली जाते. यातील मोठा निधी लाकडावर खर्च केला जातो. हा खर्चही कमी होईल.

....

दाहिनीमुळे वेळ व खर्चात बचत

विद्युत वा एलपीजी शवदाहिनीत एका दिवशी सहा अंत्यसंस्कार करणे शक्य होते. दुसरीकडे एका ओट्यावर एकच अंत्यसंस्कार करता येतो. ओट्यावरील राख उचलल्याशिवाय दुसरा अंत्यसंस्कार करता येत नाही. दुसरीकडे अंत्यसंस्कारासाठी लाकूड व गोवऱ्याचा वापर केल्यास यावर अडीच ते तीन हजार रुपये खर्च होतो. विद्युत दाहिनीसाठी दीड हजार खर्च येतो. यामुळे मनपाची आर्थिक बचत होईल तसेच वेळेचीही बचत होईल.

शहरालगत घाट निर्माण करावे

नागपूर शहराची लोकसंख्या वाढत आहे. काही घाट लोकवस्तीत आहेत. अशा घाटावरील भार कमी करण्यासाठी शहरालगतच्या भागात नवीन घाटाची निर्मिती करणे गरजेचे आहे. यासाठी जागा व निधी उपलब्ध करण्याची गरज आहे.

घाटावर या सुविधा असाव्यात

- विद्युत वा एलपीजी शवदाहिनी

- घाट परिसराचे सौंदर्यीकरण

- पाण्याची व्यवस्था

- विधीसाठी शेडचे निर्माण

- परिसरात बांधकाम व टाईल्स लावणे

- शौचालय व मुतारीची व्यवस्था

शहरातील प्रमुख घाट

सहकारनगर

अंबाझरी

फ्रेंड्‌स कॉलनी

मानेवाडा

मोक्षधाम

दिघोरी

वाठोडा

गंगाबाई

शांतिनगर

पारडी

वैशालीनगर

नारी

मानकापूर

नारा

जयताळा

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याnagpurनागपूरDeathमृत्यू