शहरं
Join us  
Trending Stories
1
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
2
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
3
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
4
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
5
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
6
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
7
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
8
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
9
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
10
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
11
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
12
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
13
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
14
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
15
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
16
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
17
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
18
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
19
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
20
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
Daily Top 2Weekly Top 5

सामान्य रसिकांची दाद हेच गायधनी यांच्यासाठी मोठे प्रमाणपत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2020 04:22 IST

नागपूर : यशवंतराव चव्हाणांसारखे महाराष्ट्राचे सर्वोच्च नेते ज्या महाकवीच्या कवितांचा संदर्भ देऊन भाषणे करायचे, ज्या कविच्या प्रतिभेची दखल जग ...

नागपूर : यशवंतराव चव्हाणांसारखे महाराष्ट्राचे सर्वोच्च नेते ज्या महाकवीच्या कवितांचा संदर्भ देऊन भाषणे करायचे, ज्या कविच्या प्रतिभेची दखल जग घेत आहे, अनेक भाषांमध्ये त्या अनुवादित होत आहेत, त्या सुधाकर गायधनी यांच्या कवितांना सामान्यांचीही तेवढीच दाद मिळत आहे. त्यामुळे महाराष्ट्रभूषण सारख्या पुरस्कारापेक्षा सामान्य रसिकांची दाद हेच त्यांच्यासाठी मोठे प्रमाणपत्र आहे, असे भावपूर्ण उद्गार ज्येष्ठ पत्रकार मधुकरराव भावे यांनी काढले.

कृषी विकास प्रतिष्ठानच्यावतीने ज्येष्ठ कवि सुधाकर गायधनी यांचा एक लाख रूपये आणि स्मृतिचिन्ह असा समावेश असलेला स्व. माणिकलाल गांधी स्मृती विदर्भ गौरव पुरस्कार -२०२० देऊन भावे यांच्या हस्ते सपत्निक सन्मान करण्यात आला. अध्यक्षस्थानी डॉ. श्रीकांत तिडके होते. ज्येष्ठ पत्रकार गणेश कनाटे प्रमुख पाहुणे होते. प्रतिष्ठानचे गिरीश गांधी व्यासपीठावर उपस्थित होते.

समारंभादरम्यान वक्त्यांनी गायधनी यांना महाराष्ट्रभूषण पुरस्कार मिळावा, अशी भावना व्यक्त केली. तो धागा पकडून भावे म्हणाले, खऱ्या प्रतिभावंताचे सत्कार, पुरस्काराने काही अडत नाही. पाणी थोपवल्याने जसे न थांबता वाट काढते, तसे खऱ्या प्रतिभावंतांचे असते.

सत्काराला उत्तर देताना सुधाकर गायधनी म्हणाले, साहित्य ही संवादकला आहे. ती दुर्बोध असू नये. नेणिवेच्या डोहात जाताना प्रज्ञापकड मजबूत असली तर ती प्रतिभा साकारते, अन्यथा विकृत बनते. आपल्या काव्यावर बुद्ध आणि येशूचा प्रभाव असल्याचे सांगून ते म्हणाले, यामुळेच आपल्या काव्यात करुणा झळकते.

गणेश कनाटे म्हणाले, १९८० नंतर ताकदीच्या कविता निर्माण झाल्या नाही, अलिकडे कवितासंग्रह खपत नाही, ही प्रकाशकांची खंत आहे. कवितेचे हे हरविलेले बळ उभारण्यासाठी कविता आणि समीक्षकांसाठी संस्थात्मक उभारणी केली जावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

डॉ. श्रीकांत तिडके म्हणाले, गायधनी हे लययोग साधलेले कवी आहेत. त्यांच्या कविता दुर्बोधही नाहीत, सुबोधही नाहीत, मात्र सामान्यांच्या काळजाला हात घालणाऱ्या आहेत. प्रारंभी प्रास्ताविक गिरीश गांधी यांनी केले. संचालन रेखा दंडिगे-घिये यांनी तर आभार बाळ कुलकर्णी यांनी मानले.