शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमधील हिंसाचार शिगेला! सुवेंदू अधिकारी यांच्या PA वर गोळीबार; उपचारादरम्यान मृत्यू
2
इराणशी डील करतोय हे ट्रम्प यांनी सांगितलेच नाही; इस्रायल म्हणतोय, “आम्ही हल्ले सुरू ठेवणार”
3
महाराष्ट्रात पॅटर्न तामिळनाडूत होणार? विजयला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी DMK-AIADMK एकत्र येणार?
4
SRH vs PBKS : सनरायझर्स हैदराबादची अव्वल कामगिरी! ‘त्या’ तीन चुकांमुळे पंजाब किंग्सचा पराभव
5
“काँग्रेसमध्ये आमचे अनेक धुरंधर आहेत, ६ जण निवडूनही आलेत”; हेमंत बिस्वा सरमांचे मोठे विधान
6
Abhishek Sharma Record : १३ चेंडूत ३५ धावा! वादळी खेळीसह अभिषेक शर्मानं मोडला ख्रिस गेलचा विक्रम
7
मुलीच्या पाठवणीनंतर काळाचा घाला! यमुनेत नाव उलटून ९ जण बुडाले; तीन सुरक्षित बाहेर, ६ जणांचा शोध सुरू
8
एका मताची ताकद! माजी मंत्र्याचा धक्कादायक पराभव; तिरुपत्तूरच्या निकालावर आनंद महिंद्रांनी सोशल मीडियावर काय लिहिलं?
9
IPL New Record : क्लासेन-ईशानचा शानदार शो! सनरायझर्स हैदराबादनं केली मुंबई इंडियन्सची बरोबरी
10
गुड न्यूज...! पेट्रोल, डिझेल अन् घरगुती गॅसचे दर स्थिर राहणार...; जागतिक संकटानंतरही मोदी सरकारची मोठी घोषणा
11
शेजारच्या बाईने माझ्याविषयी अफवा पसरवली;पर्वती प्रकरणात आजोबांचा दावा; कोर्टात नेमकं काय घडलं ?
12
पराभव होताच ममतांच्या निकटवर्तीयांचे 'एक्झिट'! ज्या IAS अधिकाऱ्यासाठी घेतली होती PM मोदींशी टक्कर; त्यांनीही दिला राजीनाम!
13
“११८ आमदारांचा पाठिंबा असलेले पत्र घेऊन या”; राज्यपाल-विजय भेटीत काय घडले? TVKचे तोंडी बहुमत!
14
SRH vs PBKS : झेल सोडण्याचा कहर! शशांक सिंगची पुन्हा मोठी चूक; चहलसह पॉटिंगही शॉक (VIDEO)
15
मध्य रेल्वेवरील पहिल्या नॉन-AC लोकलची चाचणी मुंबईत होणार नाही, थेट उत्तर प्रदेशात! कारण काय?
16
पश्चिम बंगालमध्ये भाजप देणार महिला मुख्यमंत्री? 'या' नावांची जोरदार चर्चा, ९ मे रोजी शपथविधी
17
युद्धाचे ढग विरणार? अमेरिका आणि इराणमध्ये ऐतिहासिक कराराची तयारी; पुढच्या ४८ तासांत होणार मोठा फैसला!
18
IPL 2026, SRH vs PBKS: पंजाब किंग्सचे खेळाडू 'काळ्या फिती' बांधून का उतरले मैदानात? जाणून घ्या त्यामागचं कारण
19
तामिळनाडूमध्ये काँग्रेसची 'दिल्ली'सारखी चूक? विजयला पाठिंबा देण्याच्या निर्णयावरून 'त्या' पुनरावृत्ती भीती
20
West Bengal Violence : २०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

१५ व्या वित्त आयोगाचा निधी पाच महिन्यापासून पडून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:19 IST

नागपूर : ऐन कोरोनाच्या काळात जिल्हा परिषदेच्या तिजोरीत ठणठणाट असताना, जिल्हा परिषदेला विकास कामासाठी १५ व्या वित्त आयोगाचे गिफ्टच ...

नागपूर : ऐन कोरोनाच्या काळात जिल्हा परिषदेच्या तिजोरीत ठणठणाट असताना, जिल्हा परिषदेला विकास कामासाठी १५ व्या वित्त आयोगाचे गिफ्टच मिळाले होते. निधीच नसल्याने विकास कामे कुठून करणार? असे कारण देणाऱ्या जिल्हा परिषदेच्या तिजोरीत जुलै महिन्यात सात कोटीचा निधी १५ व्या वित्त आयोगातून मिळाला होता. पण या निधीतून करण्यात येणाऱ्या कामाचे नियोजन झाले नसल्याने पाच महिन्यापासून निधी पडून आहे.

जानेवारी महिन्यात जिल्हा परिषदेच्या निवडणुका पार पडल्या आणि मार्च महिन्यापर्यंत अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सर्व सभापतींची निवड झाली. नवीन कार्यकारिणी कामाला सुरुवात करणार एवढ्यातच कोरोनाने विळखा घेतला. कोरोनामुळे शासनाने सर्व निधी रोखून ठेवला. जिल्हा परिषदेचा सेस फंडही रिकामा झाला. अशात १५ व्या वित्त आयोगाचा निधी मिळाल्याने जिल्हा परिषदेला बळ आले. सदस्यांनादेखील आपापल्या भागात कामे करून दाखविण्याची संधी मिळाली. जुलै महिन्यात हा निधी जिल्हा परिषदेला आला. अध्यक्षांनी बंधित आणि अबंधित स्वरूपात प्रत्येकी चार लाखाची कामे सदस्यांकडून मागितली. अनेक सदस्यांनी कामाचे प्रस्ताव सादर केले. पण कामाचे नियोजन झाले नसल्याने त्याचा फायदा झाला नाही. निधी असतानाही त्याचे नियोजन झाले नसल्याने विरोधकासोबत सत्ताधारी सदस्यांनीही नाराजी व्यक्त केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अध्यक्षांचा बंधित कामांमध्ये रिचार्ज शॉप व रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या कामाला आग्रह आहे. पण अनेक सदस्यांची ही कामे करवून घेण्याची इच्छा नाही. प्रस्ताव सादर केल्यानंतर नियोजन का झाले नाही, असाही सवाल सदस्य करीत आहेत.

- आता अधिकार सीईओंचा

वित्त आयोगाचा निधी प्राप्त झाल्यानंतर दोन महिन्यात त्याचे नियोजन न झाल्यास, ते खर्च करण्याचे अधिकार सीईओंना जातात. वित्त आयोगाच्या पहिल्या टप्प्यातील निधी लवकरच खर्च झाला असता, तर दुसऱ्या टप्प्यातील निधी जि.प.ला मागविता आला असता.

- कोरोनाच्या काळात जेव्हा तिजोरीत ठणठणाट होता, तेव्हा १५ व्या वित्त आयोगाच्या निधीचा मोठा दिलासा जि.प.ला मिळाला होता. ताबडतोब नियोजन केले असते तर सदस्यांना सर्कलमध्ये काम दाखविण्याची संधी मिळाली असती. १५ व्या वित्त आयोगाचे सात कोटी रुपये मिळाले. ५८ सदस्यांचा वाटा किमान १२ लाख रुपयाचा येतो. पण कामे केवळ आठ लाख रुपयाची मागितली. उर्वरित चार लाखाचे नियोजन काय? याचाही खुलासा केला नाही. निधी मिळाल्यानंतर पाच महिने नियोजन होत नसेल तर सत्ताधारी करतात तरी काय?

अनिल निधान, विरोधी पक्षनेते

- आम्ही सीईओंना पत्र पाठविले

यासंदर्भात वित्त सभापती भारती पाटील यांना विचारणा केली असता, त्यांनी सांगितले की, वित्त सभापती नात्याने १५ व्या वित्त आयोगाच्या निधीचे लवकरात लवकर नियोजन करावे, यासंदर्भात सीईओंना पत्र पाठविले आहे. लवकरच कामे सुरू होतील.