शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
4
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
5
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
6
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
7
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
8
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
9
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
10
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
11
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
12
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
13
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
14
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
15
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
16
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
17
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
18
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
19
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
20
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
Daily Top 2Weekly Top 5

विकासाच्या नावावर शेतकरी होतोय उद्ध्वस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:13 IST

कळमेश्वर : कळमेश्वर-सावनेर मार्गाचे चौपदीकरणाचे काम वेगात सुरू आहे. मात्र, या विकासकामाचा फटका स्थानिक शेतकऱ्यांना बसतो आहे. मौजा.घोराड प.ह.न.२० ...

कळमेश्वर : कळमेश्वर-सावनेर मार्गाचे चौपदीकरणाचे काम वेगात सुरू आहे. मात्र, या विकासकामाचा फटका स्थानिक शेतकऱ्यांना बसतो आहे. मौजा.घोराड प.ह.न.२० शेती सर्व्हे क्रमांक ११० येथे नरेश भैय्याजी काकडे यांची ४.१६ हेक्टर शेती आहे. या शेतीत त्यांनी यंदा सोयाबीन पिकाची लागवड केली होती. या शेतालगत नाला असून, या नाल्याचे उत्खनन मे.दिलीप बिल्डकॉन कंपनीच्या वतीने करण्यात आली. नाल्याची माती रस्ते कामासाठी वापरण्यात आली. या कंपनीने नाल्याचे खोदकाम हे चुकीच्या पद्धतीने केल्यामुळे पावसामुळे काकडे यांच्या शेतातील बांध फुटले व नाल्याचे पाणी शेतात शिरले. यात त्यांच्या सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नाल्याचे खोदकाम करताना मे.दिलीप बिल्डकॉन कंपनीच्या वतीने येथून जड वाहनाची वाहतूक केल्याने, शेतात जाणाऱ्या रस्त्याचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्याला शेतीत वहिवाट करणे अशक्य झाले आहे. नाल्याचे शेतात शिरल्याने शेतातील पीक आणि माती वाहून गेली आहे, तसेच शेतात जागोजागी खड्डे पडले आहेत. काकडे यांनी यंदाच्या खरीप हंगामासाठी कळमेश्वर येथील बँक ऑफ इंडिया शाखेतून एक लाख रुपये कर्ज घेतले आहे. मात्र, यंदा उत्पादनच होणार नसल्याने बँकचे कर्ज कसे फेडायचे, हा प्रश्न काकडे यांच्यापुढे उभा ठाकला आहे.

प्रशासन गप्प का?

झालेल्या नुकसानीची माहिती काकडे यांनी कळमेश्वरचे तहसीलदार, जिल्हाधिकारी, तालुका कृषी अधिकारी, घोराड येथील तलाठी यांना एका अर्जाद्वारे कळविली. यानुसार, तलाठ्याच्या वतीने झालेल्या नुकसानीची पंचनामाही करण्यात आला. याचा अहवाल तहसीलदारांनाही सोपविण्यात आला. मात्र, जुलै महिन्यापासून शासकीय कार्यालयाच्या पायऱ्या झिजविण्याव्यतिरिक्त या शेतकऱ्याच्या हाती काही आलेले नाही.

पोलीस आणि गडकरी यांच्याकडे तक्रार

मे.दिलीप बिल्डकॉन कंपनीच्या वतीने काकडे यांना कोणत्याही स्वरूपाचे आश्वासन मिळाले नसल्याने, त्यांनी याबाबतची तक्रार कळमेश्वर पोलीस स्टेशन आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे. आता पोलीस आणि गडकरी यावर काय कारवाई करतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.