शहरं
Join us  
Trending Stories
1
परदेश दौरे बंद अन् ताफा अर्ध्यावर; मुख्यमंत्र्यांचे कडक आदेश, मंत्री-अधिकारी एक दिवस बस-मेट्रोने फिरणार
2
PM मोदींच्या आवाहनाचा परिणाम! इंधन बचतीसाठी सुवेंदू अधिकारी यांचाही पुढाकार; DGP ना दिला मोठा आदेश
3
नाशिक कुंभमेळ्याचा 'महाप्लॅन' तयार; प्रत्येक आखाड्याला ५ कोटींचा निधी- एकनाथ शिंदे
4
नरेंद्र मोदींचा कृतीतून संदेश! पंतप्रधानांच्या ताफ्यात फक्त दोन कार, राजधानी दिल्लीतील व्हिडीओ व्हायरल
5
“नेपाळ-बांगलादेशप्रमाणे GenZ ने भारतातही रस्त्यावर उतरायला हवे”; केजरीवाल असे का म्हणाले?
6
PM मोदींचे आवाहन सकारात्मकतेने घेणं गरजेचं, विरोधकांनी थट्टा करू नये- मुख्यमंत्री फडणवीस
7
“जो सामील असेल, त्यावर कारवाई व्हायला हवी”; NEET पेपर लीक प्रकरणी CM फडणवीसांनी केले स्पष्ट
8
Travel : लडाखमध्ये इंजिन बंद असूनही गाड्या आपोआप चढतात डोंगर; या 'मॅग्नेटिक हिल'चं रहस्य काय?
9
विराटकडून प्रेरणा; आईच्या मार्गदर्शनाखाली फिटनेस स्तर उंचावला! IPL गाजवणाऱ्या साईची खास गोष्ट
10
भयंकर! फक्त एका लिंबूसाठी १२ वर्षांच्या मुलाची हत्या; संतप्त जमावाकडून पोलिसांवर दगडफेक
11
PM मोदी म्हणाले, १ वर्ष सोनं खरेदी करू नका; पण चांदीबद्दल काहीच का नाही बोलले? दर वर्षी किती चांदी खरेदी करतो भारत?
12
Top Marathi News Live: नागपूर विमानतळाला आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणून केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता
13
इराणचा 'डर्टी बॉम्ब'! एका स्फोटात शहरं होतील ओसाड; अमेरिकन नौदलाला हाय अलर्ट
14
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
15
STचे प्रवाशांसाठी मोठे पाऊल! १ जूनपासून सर्व स्वच्छतागृहे मोफत; प्रताप सरनाईकांची घोषणा
16
वर्दीतील देवदूत! हायवेवर Heart Attack आलेल्या चालकाचे वाचवले प्राण; इंटरनेटवर कौतुकाचा वर्षाव
17
पती हरवल्याची तक्रार घेऊन पोलीस ठाण्यात आली; तपास सुरू झाला, समोर आले पत्नीचे दोन आशिक अन्.. 
18
“मनमानी भाडेवाढ करणारे खासगी बस वाहतूकदार, अवैध प्रवासी ॲपवर कारवाई करा”: प्रताप सरनाईक
19
Huma Praveen : २ मुलींची जबाबदारी, १० वर्षे नोकरी, ५ वर्षे अपयश; किचनमध्ये केला अभ्यास, सून झाली ऑफिसर
20
LPG ग्राहकांसाठी सूचना! छोटीशी चूक तुम्हाला अडचणीत आणू शकते; सरकार लोकांना का करतंय अलर्ट?
Daily Top 2Weekly Top 5

गावाचा विकास हाच खरा देशाचा विकास

By admin | Updated: December 2, 2014 00:33 IST

गावाचा विकास झाला तरच देशाचा विकास होईल, असे महात्मा गांधी म्हणायचे. त्यांचे विचार आजही प्रासंगिक असून गांधीजींच्या विचारांनीच या देशाचा खरा विकास होऊ शकेल.

जाहीर व्याख्यान : अण्णा हजारे यांचा विश्वास
नागपूर : गावाचा विकास झाला तरच देशाचा विकास होईल, असे महात्मा गांधी म्हणायचे. त्यांचे विचार आजही प्रासंगिक असून गांधीजींच्या विचारांनीच या देशाचा खरा विकास होऊ शकेल. प्रकृतीचे दोहण न करता होणारा विकास शाश्वत विकास होय, असा विश्वास ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी येथे व्यक्त केला.
भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलन न्यास नागपूर विभागातर्फे सोमवारी सायंकाळी रामगोपाल माहेश्वरी सभागृह सीताबर्डी येथे आयोजित जाहीर व्याख्यानात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ समाजसेवी उमेश चौबे होते. याप्रसंगी अण्णा हजारे यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
अण्णा हजारे पुढे म्हणाले, प्रकृतीचे दोहण मोठ्या प्रमाणावर होत असल्याने अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. प्रदूषण वाढले आहे. यातून वेगवेगळे आजार वाढत आहे. तापमान ५० डिग्रीपर्यंत पोहोचले आहे. समुद्राची पातळी वाढली आहे. त्यामुळे समुद्राच्या काठांवर असलेली शहरे धोक्यात आली आहेत. त्यामुळेच महात्मा गांधीजींनी प्रकृतीचे रक्षण करा, गावाकडे चला असा संदेश दिला होता. त्यांच्या विचारांनी आम्ही कामाला सुरुवात केली. ज्या गावात बाराही महिने दुष्काळ राहत होता, तिथे प्रकृती रक्षणाचे काम हाती घेतले. पावसाचे पाणी अडविले, ते जमिनीत साचवले. त्यामुळे गावातील पाण्याची पातळी वाढली. एकेकाळी दुष्काळग्रस्त असलेले गाव आज वर्षभर पीक घेणारे बनले आहे. उमेश चौबे यांनी राजकारणावर प्रहार करीत भ्रष्टाचाराविरुद्ध लढत असलेल्या कार्यकर्त्यांना धमकावले जात असल्याचे सांगितले. भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलन न्यास राळेगण सिद्धीचे विश्वस्त डॉ. शिवनाथ कुंभारे यांनी प्रास्ताविक केले. श्रद्धा बेले यांनी गुरुवंदना सादर केली. सुमितकुमार ‘आतिष’ यांनी अण्णा हजारे यांच्यावर आधारित गीत सादर केले. शुभांगी रायलू यांनी संचालन केले. डॉ. गोपाल बेले यांनी आभार मानले.(प्रतिनिधी)
भ्रष्टाचारविरोधी लढ्यात स्वार्थी कार्यकर्ते नको
ग्राम विकास आणि भ्रष्टाचारविरोधी लढा लढायचा असेल तर कार्यकर्त्यांनी नि:स्वार्थी, समर्पणाने आणि त्याग करण्याच्या भावनेतून काम करण्याची गरज आहे. तुम्ही निष्कलंक असाल तरच तुमचा प्रभाव पडेल. त्यामुळे या लढ्यामध्ये स्वार्थी कार्यकर्ते नकोत, असे अण्णा हजारे यांनी यावेळी ठणकावून सांगितले.