शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

देशमुखांची टीका भाजपच्या जिव्हारी

By admin | Updated: March 11, 2015 02:12 IST

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर भाजप आमदार मौनी असल्याची माजी मंत्री अनिल देशमुख यांनी केलेली टीका भाजप नेत्यांच्या जिव्हारी लागली आहे.

नागपूर : शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर भाजप आमदार मौनी असल्याची माजी मंत्री अनिल देशमुख यांनी केलेली टीका भाजप नेत्यांच्या जिव्हारी लागली आहे. गेल्या २० वर्षात देशमुखांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी काय केले, कोणते निर्णय घेतले याचा हिशेब आधी द्यावा, अशी मागणी भाजप नेत्यांनी केली असून मंत्रिपद व आमदारकी गमावल्यामुळे आलेल्या नैराश्यातून देशमुख अशी आगपाखड करीत असल्याची टीकाही भाजप नेत्यांनी केली आहे. भाजप- राष्ट्रवादीत जुंपल्यामुळे येत्या काळात जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे आहेत. भाजपचे शहर अध्यक्ष आ. कृष्णा खोपडे यांनी प्रसिद्धीपत्रक जारी करीत देशमुख यांच्या वक्तव्याचा जोरात समाचार घेतला आहे. भाजप सरकारच्या पहिल्या अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाच लाख शेतकऱ्यांचे सावकारी कर्ज माफ करण्याची घोषणा केली. २१५ कोटी रुपये वीजबिल माफ केले. उलट राष्ट्रवादी काँग्रेसने शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या पॅकेजमध्ये घोटाळे केले. शेतकरी हिताचा एकही निर्णय घेतला नाही. विधानसभेतील पराभवाचा देशमुखांना मानसिक धक्का बसला आहे. त्यामुळेच ते असे आरोप करीत सुटले आहेत. राष्ट्रवादीने त्यांची मानसिक तपासणी करावी, खर्च भाजप देईल, अशी बोचरी टीकाही खोपडे यांनी केली आहे. जिल्हाध्यक्ष डॉ. राजीव पोतदार यांनीही देशमुखांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने कमी काळात शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेण्याचा सपाटा लावला. जिल्हा दुष्काळमुक्त व्हावा यासाठी योजना आखली. विदर्भ- मराठवाड्यातील शेतकऱ्यांना विहिरींवर पंप देण्याची योजना, सौरपंपाची योजना आणली. उलट अनिल देशमुख यांनी गेल्या २० वर्षात शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी कधी जनता दरबार घेतला नाही. देशमुख यांनी केलेल्या ‘भाजपच्या आमदारांच्या चपलांचे हार घालू’ या वक्तव्यामुळे जिल्हा भाजपचे कार्यकर्ते संतापले असून अशी विधाने खपवून घेतली जाणार नाहीत, अशा इशाराही डॉ. पोतदार यांनी दिला आहे. (प्रतिनिधी)