शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमधील हिंसाचार शिगेला! सुवेंदू अधिकारी यांच्या PA वर गोळीबार; उपचारादरम्यान मृत्यू
2
इराणशी डील करतोय हे ट्रम्प यांनी सांगितलेच नाही; इस्रायल म्हणतोय, “आम्ही हल्ले सुरू ठेवणार”
3
महाराष्ट्रात पॅटर्न तामिळनाडूत होणार? विजयला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी DMK-AIADMK एकत्र येणार?
4
SRH vs PBKS : सनरायझर्स हैदराबादची अव्वल कामगिरी! ‘त्या’ तीन चुकांमुळे पंजाब किंग्सचा पराभव
5
“काँग्रेसमध्ये आमचे अनेक धुरंधर आहेत, ६ जण निवडूनही आलेत”; हेमंत बिस्वा सरमांचे मोठे विधान
6
Abhishek Sharma Record : १३ चेंडूत ३५ धावा! वादळी खेळीसह अभिषेक शर्मानं मोडला ख्रिस गेलचा विक्रम
7
मुलीच्या पाठवणीनंतर काळाचा घाला! यमुनेत नाव उलटून ९ जण बुडाले; तीन सुरक्षित बाहेर, ६ जणांचा शोध सुरू
8
एका मताची ताकद! माजी मंत्र्याचा धक्कादायक पराभव; तिरुपत्तूरच्या निकालावर आनंद महिंद्रांनी सोशल मीडियावर काय लिहिलं?
9
IPL New Record : क्लासेन-ईशानचा शानदार शो! सनरायझर्स हैदराबादनं केली मुंबई इंडियन्सची बरोबरी
10
गुड न्यूज...! पेट्रोल, डिझेल अन् घरगुती गॅसचे दर स्थिर राहणार...; जागतिक संकटानंतरही मोदी सरकारची मोठी घोषणा
11
शेजारच्या बाईने माझ्याविषयी अफवा पसरवली;पर्वती प्रकरणात आजोबांचा दावा; कोर्टात नेमकं काय घडलं ?
12
पराभव होताच ममतांच्या निकटवर्तीयांचे 'एक्झिट'! ज्या IAS अधिकाऱ्यासाठी घेतली होती PM मोदींशी टक्कर; त्यांनीही दिला राजीनाम!
13
“११८ आमदारांचा पाठिंबा असलेले पत्र घेऊन या”; राज्यपाल-विजय भेटीत काय घडले? TVKचे तोंडी बहुमत!
14
SRH vs PBKS : झेल सोडण्याचा कहर! शशांक सिंगची पुन्हा मोठी चूक; चहलसह पॉटिंगही शॉक (VIDEO)
15
मध्य रेल्वेवरील पहिल्या नॉन-AC लोकलची चाचणी मुंबईत होणार नाही, थेट उत्तर प्रदेशात! कारण काय?
16
पश्चिम बंगालमध्ये भाजप देणार महिला मुख्यमंत्री? 'या' नावांची जोरदार चर्चा, ९ मे रोजी शपथविधी
17
युद्धाचे ढग विरणार? अमेरिका आणि इराणमध्ये ऐतिहासिक कराराची तयारी; पुढच्या ४८ तासांत होणार मोठा फैसला!
18
IPL 2026, SRH vs PBKS: पंजाब किंग्सचे खेळाडू 'काळ्या फिती' बांधून का उतरले मैदानात? जाणून घ्या त्यामागचं कारण
19
तामिळनाडूमध्ये काँग्रेसची 'दिल्ली'सारखी चूक? विजयला पाठिंबा देण्याच्या निर्णयावरून 'त्या' पुनरावृत्ती भीती
20
West Bengal Violence : २०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

दयाशंकर तिवारी नवे महापौर तर मनीषा धावडे उपमहापौर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:19 IST

काँग्रेसचे रमेश पुणेकर व रश्मी धुर्वे पराभूत : बसपा उमेदवारांचाही पराभव लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : नागपूर महापालिकेच्या महापौरपदी ...

काँग्रेसचे रमेश पुणेकर व रश्मी धुर्वे पराभूत : बसपा उमेदवारांचाही पराभव

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : नागपूर महापालिकेच्या महापौरपदी भाजपचे दयाशंकर तिवारी यांची तर उपमहापौरपदी मनिषा धावडे याची निवड करण्यात आली. तिवारी व धावडे यांना प्रत्येकी १०७ मते मिळाली. काँग्रेसचे महापौरपदाचे उमेदवार रमेश पुणेकर यांना २७ मते पडली. उपमहापौर पदाच्या उमेदवार रश्मी धुर्वे यांना २६ मते मिळाली. बसपाचे महापौर पदाचे उमेदवार नरेंद्र वालदे व उमहापौरपदाच्या उमेदवार वैशाली नारनवरे यांना प्रत्येकी १० मते मिळाली. तिवारी यांनी पुणेकर याचा ८० मतांनी तर धावडे यांनी धुर्वे याचा ८१ मतांनी पराभव केला. पीठासीन अधिकारी व जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी दयाशंकर तिवारी यांना विजयी घोषित केले. ते शहराचे ५४ वे महापौर आहेत. मंगळवारी मनपा मुख्यालयातील डॉ.पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहामध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून निवडणूक प्रक्रिया पार पडली.

काँग्रेसकडून रमेश पुणेकर व मनोज गावंडे यांनी महापौरपदासाठी तर रश्मी धुर्वे व शिवसेनेच्या मंगला गवरे यांनी अर्ज दाखल केले होते. निवडणुकीपूर्वी मनोज गावंडे व मंगला गवरे यांनी अर्ज मागे घेतल्याने तिरंगी लढत झाली. महापौर संदीप जोशी यांनी राजीनामा दिल्याने महापौरपदाच्या १३ महिन्यांच्या कालावधीसाठी ही निवडणूक पार पडली. भाजपचे सभागृहातील संख्याबळ विचारात घेता महापौरपदी दयाशंकर तिवारी यांची निवड निश्चित होती. परंतु, मनपा इतिहासात प्रथमच ऑनलाईन पद्धतीने महापौरपदासाठी निवडणूक होत असल्याने सत्तापक्षाची चिंता वाढली होती. त्यांनी पक्षाच्या सर्व नगरसेवकांना मुख्यालयात बोलावले होते.

तांत्रिक बिघाडामुळे व्यत्यय

सर्व नगरसेवक मोबाईल, लॅपटॉपवरून प्रक्रियेत सहभागी झालेत. उपस्थितीची नोंद सुरू असतानाच सदस्यांना म्यूट केल्याने आवाज येत नव्हता. यावर सत्तापक्षनेते संदीप जाधव यांनी नाराजी व्यक्त केली. निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाल्यानंतर ११.३० ला ऑनलाईन यंत्रणेत बिघाड निर्माण झाला. दुरुस्तीसाठी वेळ लागला. त्यानंतर १२.३० ला पुन्हा व्यत्यय आला होता.