शहरं
Join us  
Trending Stories
1
“१४ वर्षांचा वनवास संपला, स्वगृही परतलो, माझ्यात DNA…”; आनंद परांजपेंचा शिंदेसेनेत प्रवेश
2
“...तर महाराष्ट्र पुरोगामी राहिला असता”; प्रणिती शिंदेंचे विधान, गडकरींच्या कार्याची स्तुती
3
हा पराभव पचवणं कठीण; सलग पाचव्या पराभवानंतर तिलक वर्माचं नाव घेत काय म्हणाला श्रेयस अय्यर?
4
अरविंद केजरीवाल यांच्यासह ‘आप’च्या ५ नेत्यांच्या अडचणी वाढल्या; ‘या’ प्रकरणात खटला चालणार
5
तिलक वर्माचा मॅच विनिंग सिक्सर! रोमहर्षक सामन्यात MI नं मारली बाजी; पाचव्या पराभवासह PBKS चं गणित बिघडलं
6
भारतीय जहाजावरील हल्ल्यानंतर होर्मुझजवळ आणखी एक मोठी घटना; नांगर टाकलेल्या जहाजावर कब्जा, इराणच्या दिशेनं गेलं!
7
हिटमॅन रोहित शर्माने MS धोनीचा रेकॉर्ड मोडला, पण विराटला मागे टाकणं जमणार नाही, कारण...
8
सोन्यासंदर्भात सरकारचा आणखी एक मोठा निर्णय! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं खरेदी टाळण्याचं आवाहन 
9
PBKS vs MI : शार्दुल ठाकूरची कमाल! श्रेयस अय्यरचा असा घेतला बदला; अन्... (VIDEO)
10
‘एल-निनो’चा संभाव्य धोका, खरीप हंगामासाठी आवश्यक सज्जता ठेवा: शिवेंद्रसिंहराजे भोसले
11
अमेरिका इराण तणावामध्ये भारतासाठी चांगली बातमी, २ LPG टँकर्स 'होर्मुझ' पार करून पुढे निघाले!
12
Jasprit Bumrah : १३ वर्षांचा प्रवास; जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार! हार्दिक पांड्याचा विषय संपला?
13
ह्युंडाई स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणणार, काय काय फीचर्स असणार? टाटा पंच EV सह या कारना देणार टक्कर
14
जबरदस्त! १३८० किमी धावणार अन् तीन चाकांवरही पळणार! 'ही' नवी हायटेक इलेक्ट्रिक कार ऑटो विश्वात धुमाकूळ घालणार?
15
रशियाचे परराष्ट्र मंत्री PM मोदींना भेटले; तेल संकट, युक्रेन, परस्पर संबंध वाढवण्यावर चर्चा
16
देशातील परिस्थिती गंभीर, सर्वपक्षीय बैठक बोलवा, त्यात पंतप्रधानांनी हजर राहावे- शरद पवार
17
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
18
Vaibhav Suryavanshi In India A Squad : वैभव सूर्यवंशीला BCCI चं मोठं गिफ्ट; भारतीय ‘अ’ संघात निवड
19
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
20
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
Daily Top 2Weekly Top 5

रेती घाटांचा लिलाव न झाल्याने शासनाला नुकसान

By admin | Updated: December 5, 2014 00:38 IST

पर्यावरण व वनमंत्रालयाची मंजुरी न मिळाल्याने २०१४ या वर्षात नागपूर व भंडाऱ्यांच्या रेतीघाटाचा लिलाव करण्यात आला नाही. ज्याचा परिणाम राज्य शासनाच्या उत्पन्नावर पडला आहे.

व्हीटीएची मागणी : रेती माफिया सक्रिय
नागपूर : पर्यावरण व वनमंत्रालयाची मंजुरी न मिळाल्याने २०१४ या वर्षात नागपूर व भंडाऱ्यांच्या रेतीघाटाचा लिलाव करण्यात आला नाही. ज्याचा परिणाम राज्य शासनाच्या उत्पन्नावर पडला आहे. या दोन जिल्ह्यांच्या रेतीघाटाचा लिलाव न झाल्याने ६० कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. यामुळे रेती माफिया सक्रिय झाले असून राज्य शासनाने रेती घाटांच्या लिलावाला मंजुरी द्यावी, अशी मागणी विदर्भ टॅक्सपेअर असोसिएशनचे सचिव तेजिंदर सिंह रेणु यांनी केली आहे.
यासंदर्भात व्हीटीएतर्फे जिल्हाधिकारी अभिषेक कृष्णा यांना एक निवेदन देण्यात आले. हे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनाही पाठविण्यात आले आहे. यासंदर्भात अध्यक्ष जे.पी. शर्मा म्हणाले, बांधकाम व्यवसायात रेती अतिशय महत्त्वाची असते. नागपूर आणि भंडारा येथून रेती मागविण्यात येते. पण शासनातर्फे रेती घाटांचा लिलाव न करण्यात आल्याने रेतीच्या किमती दुप्पटीने वाढल्या आहेत. तेजिंदरसिंह रेणु म्हणाले, शासनाने रेतीघाटांंचा लिलाव न केल्याने अप्रत्यक्षपणे रेती माफियांना मदत होते आहे. रेतीच्या किमती वाढल्याने अवैध खनन मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे. ट्रक चालकांनाही पर्याप्त काम मिळत नसल्याने चोरीच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. रेतीच्या किमतीत वाढ झाल्याने अनावश्यकरीत्या प्रकल्पांच्या किमती वाढल्या आहेत. पर्यावरण मंत्रालयाच्या परिपत्रकाप्रमाणे पाच हेक्टर आणि त्यापेक्षा कमी असलेल्या रेती घाटांना पर्यावरणाची मंजुरी घेण्याची गरज नसल्याचे माहिती दिली आहे. नागपूर आणि भंडाऱ्याचे रेती घाट पाच हेक्टरपेक्षा कमी आहे. त्यामुळे या रेती घाटांना केंद्र शासनाच्या परवानगीची गरज नाही. राज्य शासनाने या रेती घाटांचा लिलाव करून अवैध खनन थांबवावे आणि भ्रष्टाचार होऊ देऊ नये, अशी मागणी रेणु यांनी केली आहे. (प्रतिनिधी)