शहरं
Join us  
Trending Stories
1
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
2
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
3
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
4
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
5
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
6
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
7
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
8
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
9
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
10
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
11
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
12
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
13
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
14
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
15
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
16
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
17
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
18
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
19
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
20
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा

नागपूर विभागातील धरणे ‘फुल्ल’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2019 10:17 PM

मुसळधार पावसामुळे नागपूरसह एकूणच विभागातील पाणीटंचाई दूर झाली आहे. नागपूर विभागातील धरणांमध्ये पाणीच पाणी आहे. विभागातील एकूण १८ धरणांपैकी ५ धरणे १०० टक्के तर ५ धरणे ९० टक्केवर भरली आहेत.

ठळक मुद्दे५ धरणे १०० टक्के, ५ धरणे ९० टक्केवर

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मागील काही दिवसात झालेल्या मुसळधार पावसामुळे नागपूरसह एकूणच विभागातील पाणीटंचाई दूर झाली आहे. नागपूर विभागातील धरणांमध्येपाणीच पाणी आहे. विभागातील एकूण १८ धरणांपैकी ५ धरणे १०० टक्के तर ५ धरणे ९० टक्केवर भरली आहेत.नागपूर विभागात एकूण मोठी धरणे १८ आहेत. यापैकी गोंदिया जिल्ह्यातील इटियाडोह, चंद्रपूर जिल्ह्यातील असोलामेंढा, गडचिरोलीतील दिना, आणि वर्धा जिल्ह्यातील धाम व पोथरा ही धरणे १०० टक्के भरली आहेत. नागपूर जिल्ह्यातील तोतलाडोह ९६.१६ टक्के, कामठी खैरी ९४.११ टक्के, वडगाव ९१.४४ टक्के, गोंदिया जिल्ह्यातील पुजारी टोला ९३.०६ टक्के, कालिसरार ९४.८४ टक्के भरली आहेत. यासोबतच लोअर नांद ८५.५६ टक्के, सिरपूर ८५.२१ टक्के, लोअर वर्धा ८२.६६ टक्के इतकी भरली आहेत. उर्वरित धरणांमध्ये रामटेक २९.२३ टक्के, बोर ५६.८४ टक्के, गोसेखुर्द ५०.८७ टक्के, बावनथडी ३४.७१ आणि धापेवाडा बॅरेज टप्पा २- ३०.४९ टक्के इतके भरले आहे.पाच वर्षातील सर्वाधिक साठानागपूर विभागातील मोठ्या प्रकल्पांचा विचार केल्यास मागील पाच वर्षात यंदा धरणांमध्ये सर्वाधिक पाणीसाठा जमा झाला आहे. विभागातील १८ मोठ्या धरणातील पाणीसाठा क्षमता ३५५२.२६ दलघमी इतकी आहे. आजच्या तारखेला १३ सप्टेंबर रोजी या धरणांमध्ये एकूण २७५८.२४ दलघमी म्हणजेच ७७.६५ टक्के इतका पाणीसाठा जमा झाला आहे. गेल्या पाच वर्षातील आजच्याच दिवसातील पाणीसाठ्याचा विचार केल्यास तो कितीतरी अधिक अआहे. उदाहरणार्थ गेल्या वर्षी आजच्या तारखेला केवळ १६४८.०८ दलघमी म्हणजेच ४६.३८ टक्के इतका साठा होता. त्यापूर्वी २०१७ मध्ये ११६५.३५ दलघमी, २०१६ मध्ये २००९.०४ दलघमी, २०१५ मध्ये २३५५.६९ दलघमी आणि २०१४ मध्ये २५४९.१३ दलघमी इतका होता.

टॅग्स :DamधरणWaterपाणी