शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यातील सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये बॉम्बसदृश्य वस्तू; रुग्ण-नागरिकांमध्ये खळबळ अन् घबराट
2
‘देवाभाऊं’चा एक फोन अन् तत्काळ प्रश्न सुटला; CM फडणवीसांनी अधिकाऱ्यांना सुनावलं, नेमकं काय घडलं?
3
प्रवाशांना मोठा दिलासा, विदर्भातून गोव्याला जाणारी ट्रेन नियमित केली; नाशिक-मुंबईकरांना लाभ!
4
आकाशात संकट! एअर इंडियाच्या अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणांना 'ब्रेक'; जगभरात ६ हजारांहून अधिक उड्डाणं 'लेट' 
5
IPL 2026: KKR विरुद्ध खाते उघडल्यावर किंग कोहलीचं 'शतकी सेलिब्रेशन'; RCB चे चाहतेही झाले शॉक (VIDEO)
6
अमूलनंतर आता मदर डेअरीचाही दणका! दूध महागलं, म्हशीच्या दुधापासून फुल क्रीमपर्यंत नवे दर जाहीर; पहा संपूर्ण यादी
7
RCB vs KKR : मुंबईकर रघुवंशीची तुफान फटकेबाजी; किंग कोहलीनंही टाळ्या वाजवत दिली दाद (VIDEO)
8
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून EV वाहनाचा वापर सुरू, ताफ्यातील वाहनेही केली कमी
9
महागाईचा झटका, अमूलने दुधाचा भाव वाढवला! कधीपासून लागू होणार नवे दर? जाणून घ्या 
10
IPL All Time Record : किंग कोहलीनं रचला इतिहास; MS धोनीचा महारेकॉर्ड मोडला
11
हरियाणातील स्थानिक निवडणुकीत BJPचा दबदबा; PM मोदींनी मानले जनतेचे आभार, म्हणाले...
12
२० कोच ‘वंदे भारत’ शानदार शो… १० दिवसात ४५ हजार प्रवाशांचा प्रवास, तुफान प्रतिसाद; पण कुठे?
13
खरा मित्र… रशियाने पुन्हा सिद्ध केले, गॅरंटी दिली, “काही होऊ दे, भारताचे नुकसान करणार नाही”
14
“नेपाळ-बांगलादेशप्रमाणे GenZ ने भारतातही रस्त्यावर उतरायला हवे”; केजरीवाल असे का म्हणाले?
15
“जो सामील असेल, त्यावर कारवाई व्हायला हवी”; NEET पेपर लीक प्रकरणी CM फडणवीसांनी केले स्पष्ट
16
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
17
PBKS vs MI: "विश्वास ठेवा, ट्रॉफी जिंकून दाखवू"; पंजाबच्या पराभवाच्या मालिकेनंतर प्रभसिमरनची चाहत्यांना भावनिक साद
18
RCB vs KKR : पावसाच्या बॅटिंगचा कुणाला बसणार फटका? कट-ऑफ टाइमचा नियम काय?
19
आशिष नेहरा वर्षाला किती कमवतो? GT चा कोच म्हणून किती मानधन घेतो? आकडा वाचून थक्क व्हाल
20
"आता मुस्लिमांमध्ये राष्ट्रवादी नेता सापडणे कठीण...!"; दत्तात्रेय होसबळे यांचं मोठं विधान, कारणही सांगितलं!
Daily Top 2Weekly Top 5

मुलांचा ताबा एखाद्या मालमत्तेप्रमाणे हस्तांतरित केला जाऊ शकत नाही !

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2026 14:56 IST

Nagpur : कौटुंबिक वाद उद्भवलेल्या दाम्पत्यांच्या मुलांचा ताबा, हा समाजातील अत्यंत संवेदनशील मुद्दा असून यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर :
कौटुंबिक वाद उद्भवलेल्या दाम्पत्यांच्या मुलांचा ताबा, हा समाजातील अत्यंत संवेदनशील मुद्दा असून यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्यानागपूर खंडपीठाने महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. मुलांचा ताबा एखाद्या मालमत्तेप्रमाणे हस्तांतरित केला जाऊ शकत नाही. ताबा देण्यापूर्वी मुलांच्या सर्वांगीण हिताचा विचार करणे आवश्यक, असे या निर्णयात स्पष्ट करण्यात आले आहे.

न्यायमूर्तिद्वय ऊर्मिला जोशी-फलके व निवेदिता मेहता यांनी हा निर्णय दिला. या निर्णयाद्वारे नागपूर जिल्ह्यातील काटोल येथील सुनीलला त्याच्या अल्पवयीन मुलीचा ताबा नाकारण्यात आला. सुनीलची मुलगी सध्या आठ वर्षे वयाची असून ती जन्मापासूनच आजी-आजोबांकडे राहत आहे. या काळात सुनीलने प्रेम आणि स्नेहापोटी तिचा ताबा मिळविण्यासाठी कोणतेच प्रयत्न केले नाहीत. उलट दुसरे लग्न करून नवीन संसार थाटला; परंतु प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी न्यायालयाने १४ जानेवारी २०२२ रोजी मुलीला पोटगी देण्याचा आदेश दिल्यामुळे सुनीलचे पितृप्रेम अचानक जागृत झाले व त्याने २०२३ मध्ये उच्च न्यायालयात याचिका दाखल करून मुलीचा ताबा देण्याची मागणी केली. न्यायालयाने मुलीचे सर्वागीण हित व मानवतावादी दृष्टिकोन विचारात घेता सुनीलला तिचा ताबा दिला जाऊ शकत नाही, असे सांगितले. मुलीने जन्मापासूनच सुनीलला पाहिलेले नाही. सध्या मुलगी आयुष्यातील स्थित्यंतराच्या टप्प्यावर आहे. या परिस्थितीत तिच्या ताब्यामध्ये हस्तक्षेप करता येणार नाही, असेही न्यायालय म्हणाले.

आईचा मृत्यू

कौटुंबिक वादामुळे मुलीची आई ही गर्भवती असतानाच माहेरी निघून गेली होती. तिने ६ एप्रिल २०१८ रोजी मुलीला जन्म दिला. त्यानंतर ती सुनीलकडे परत गेली नाही. दरम्यान, १९ जून २०२० रोजी तिचा मृत्यू झाला. तेव्हापासून आजी, आजोबा व मामा त्या मुलीचा सांभाळ करीत आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Child custody isn't property; welfare paramount, says High Court.

Web Summary : Nagpur High Court ruled child custody isn't transferable like property. A father's plea for his daughter's custody was denied, prioritizing the child's welfare as she's been raised by grandparents since birth. The court cited the child's stability and best interests.
टॅग्स :High Courtउच्च न्यायालयnagpurनागपूर