शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
2
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
3
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
4
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
5
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
6
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
7
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
8
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
9
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
10
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
11
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
12
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
13
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
14
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
15
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
16
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
17
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
18
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
19
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
20
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

संविधान हे बाबासाहेबांचे स्मारकच

By admin | Updated: December 20, 2015 03:00 IST

स्वातंत्र्याच्या ६६ वर्षात भारतावर अनेक सामाजिक, आर्थिक व राजकीय संकटे आली.

न्या. भूषण गवई : विद्यापीठाच्या संविधान सप्ताहाचा समारोपनागपूर : स्वातंत्र्याच्या ६६ वर्षात भारतावर अनेक सामाजिक, आर्थिक व राजकीय संकटे आली. मात्र अशा सर्व परिस्थितीत हा देश एकसंघ राहिला तो केवळ आणि केवळ संविधानामुळेच. त्यामुळे जोपर्यंत संविधान आहे, तोपर्यंत देशातील एकही नागरिक डॉ. बाबासाहेबांना विसरणार नाही. संविधान म्हणजे, बाबासाहेबांनी तयार केलेले जिवंत स्मारक होय, असे प्रतिपादन उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे प्रशासकीय न्यायाधीश न्या. भूषण गवई यांनी केले.राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या डॉ. आंबेडकर विचारधारा विभागातर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंती वर्षानिमित्त आयोजित संविधान सप्ताहाच्या समारोपीय कार्यक्रमात न्या. भूषण गवई बोलत होते. याप्रसंगी नागपूर विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद येवले, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पदव्युत्तर विधी विभागाचे विभागप्रमुख डॉ. दिलीप उके, नागपूर विद्यापीठाचे कुलसचिव पूरणचंद्र मेश्राम, डॉ. आंबेडकर विचारधारा विभागाचे विभागप्रमुख डॉ. प्रदीप आगलावे आदी मान्यवर उपस्थित होते. न्या. गवई म्हणाले, बाबासाहेबांनी जे स्वप्न पाहिले होते, त्यानुसार परिवर्तन घडत आहे. या देशात महिलांना शुद्रांपेक्षाही कमी दर्जाचे लेखले जात होते. त्यांना आज पुरुषांच्या बरोबरीचे स्थान मिळाले ते बाबासाहेब व त्यांनी दिलेल्या संविधानामुळे. संविधानात नमूद मार्गदर्शक तत्त्वे हे मूलभूत अधिकारांएवढेच महत्त्वपूर्ण आहेत. यामध्ये देशातील सर्व समस्यांचे उत्तर सापडते. सामाजिक, आर्थिक विषयांशी संबंधित लाखो खटले न्यायालयापुढे आले. मात्र मार्गदर्शक तत्त्वांमधील घटनाकारांचा आशय न्यायालयांना सुनावणीसाठी नेहमी मार्गदर्शक ठरतो. महिलांचे अधिकार, आरक्षण, वाईट प्रथा,कामगारांचे प्रश्न, किंवा दुर्गम भागातील नागरिकांच्या समस्या असो, या सर्वांच्या अधिकारांची सुरक्षा संविधानाने निश्चित केल्याचे ते म्हणाले. यावेळी डॉ. दिलीप उके म्हणाले, देशातील अस्पृश्यता व जातीभेदामुळे बाबासाहेबांना ज्या अडचणींना तोंड द्यावे लागले, त्या सर्व वाईट चालिरीती त्यांनी संविधानाच्या माध्यमातून दूर करण्याचा प्रयत्न केला. मात्र बाबासाहेबांना अपेक्षित सामाजिक समता अद्याप प्रस्थापित झाली नाही. सामाजिक व आर्थिक समता स्थापित होईपर्यंत बाबासाहेबांना अपेक्षित लोकशाही आणि संविधानाची उद्दिष्टे सफल होणार नाहीत, असे मत त्यांनी व्यक्त केले. डॉ प्रमोद येवले यांनी, संविधानाच्या रूपाने देशाचा पाया मजबूत असल्याने लोकशाही कोलमडली नाही, असे सांगत प्रामाणिक अंमलबजावणीने भविष्य उज्ज्वल होईल, असा विश्वास व्यक्त केला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक पुरण मेश्राम यांनी केले. डॉ. प्रदीप आगलावे यांनी आभार मानले.(प्रतिनिधी)