शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: पेपर फुटला, नीट २०२६ ची परीक्षा रद्द, सीबीआय चौकशीचे आदेश
2
'पंतप्रधानांच्या घोषणेने देशात अस्वस्थता, सर्वपक्षीय बैठक तातडीने बोलवा'; शरद पवारांची प्रतिक्रिया
3
कोयता सोडून धरली औषधपेटी! ऊसतोड महिला आता फडावरच्या ‘डॉक्टर मॅडम’; बीड पॅटर्नचा राज्याला आदर्श 
4
Top Marathi News LIVE Updates: हिमंता बिस्वा सरमा यांनी घेतली आसामच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ
5
Tamil Nadu Politics: अण्णा द्रमुकमध्ये फूट, षण्मुगम गटाने TVK ला दिला पाठिंबा, तामिळनाडूत मोठी उलथापालथ
6
हळदीत आनंदाने नाचले अन् मुलीची पाठवणी करण्याआधीच बापाचा मृत्यू; पालघरमधील ह्रदयद्रावक घटना
7
"अल्लू अर्जुनची प्रॉपर्टी...", अभिनेत्रीच्या 'त्या' फोटोवर युजरची घाणेरडी कमेंट, दिलं सडेतोड उत्तर
8
PM Modi: पंतप्रधानांच्या आवाहनाचा होतोय परिणाम, 'हे' टेक दिग्गज Work From Home लागू करण्याच्या तयारीत
9
Nashik TCS Case : "सामाजिक दबाव, बदनामीची भीती..."; TCS प्रकरणात महिला आयोगाच्या अहवालात धक्कादायक खुलासे
10
जमिनीच्या व्यवहारासाठी  ले-आउट मंजुरी गरजेची, अन्यथा गुन्हा दाखल होणार; महसूलमंत्री बावनकुळेंचा इशारा
11
ड्रॅगनची अमेरिकेत घुसखोरी! माजी महापौरांनीच दिला देशाला धोका, चिनी एजंट असल्याचं केलं कबूल
12
‘चुका तुमच्या आणि त्याचा भुर्दंड जनतेला का ?’ राज ठाकरेंचं पत्र, केंद्र सरकारला प्रश्न
13
जगात युद्धाचा भडका, अन् चीनची गुपचूप 'धान्य साठेबाजी'; भारतासाठी धोक्याची घंटा?
14
Adhik Maas 2026: अधिक मासात अधिक पुण्यप्राप्तीसाठी 'या' दोन गोष्टी महिनाभर करण्याचा करा संकल्प!
15
Ashok Kharat : भोंदू खरातचे फसवणुकीचे जाळे ईडीकडून उलगडणार, रूपाली चाकणकरांच्या अडचणीत वाढ
16
मुंबईत उत्तराखंडमधून आणलेल्या ६.५ कोटींच्या हेरॉईनसह ३ अटकेत, नेमकी कुठे करण्यात आली कारवाई?
17
अल्पवयीन प्रियकर-प्रेयसीला पकडलं, अमानुषपणे केस कापले अन् संपूर्ण गावातून धिंड काढून लावलं लग्न!
18
Pragya Singh Missing Case: ट्रेनमधून गायब झालेली नवरी सापडली, नवऱ्याच्या जीवात जीव आला! आता रेल्वे प्रशासन म्हणते.. 
19
हिमंता बिस्वा सरमांच्या शपथविधीसाठी एकनाथ शिंदे गुवाहाटीमध्ये, सरमांच्या नेतृत्वाचं कौतुक करत म्हणाले...  
20
भारतात पेट्रोलचा साठा संपणार? इंधनावर कोटा लागू होणार का? केंद्र सरकारने दिलं मोठं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

‘कोरोना’ नियमावलीचे पालन करुनच परीक्षांचे आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 04:09 IST

आशिष दुबे लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दहावी-बारावीच्या परीक्षांच्या तारखांची घोषणा केली आहे. अद्यापपर्यंत ...

आशिष दुबे

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दहावी-बारावीच्या परीक्षांच्या तारखांची घोषणा केली आहे. अद्यापपर्यंत यासंबंधाची अधिकृत माहिती विभागीय मंडळ कार्यालयांना मिळालेली नाही. मात्र राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील यांनी ‘लोकमत’शी चर्चेत या वृत्ताला दुजोरा दिला आहे. ‘कोरोना’चा संसर्ग लक्षात घेता सुरक्षेची संपूर्ण खबरदारी घेण्यात येईल व ‘कोरोना’च्या नियमावलीचे पालन करुनच परीक्षांचे आयोजन होईल, असे त्यांनी सांगितले.

‘कोरोना’ नियमांनुसार परीक्षा केंद्रांमध्ये ‘एक बेंच, एक विद्यार्थी’ योजनेंतर्गत परीक्षार्थ्यांच्या बसण्याची व्यवस्था करण्यात येईल. एका वर्गखोलीत केवळ २५ विद्यार्थ्यांनाच बसण्याची परवानगी देण्यात येईल. विद्यार्थ्यांना ‘कोरोना’ संसर्गापासून दूर ठेवण्यासाठी उत्तर पत्रिका व प्रश्नपत्रिका अगोदरच केंद्रांवर पोहोचविण्यात येतील. शिवाय परीक्षा केंद्रांवर ‘मास्क’ आणि ‘सॅनिटायझर’ अनिवार्य करण्यात येईल, असे पाटील यांनी सांगितले.

याअगोदर शिक्षण मंडळाने दहावी व बारावीच्या पुरवणी परीक्षांचे आयोजन केले होते. एकाही विद्यार्थ्याला ‘कोरोना’चा संसर्ग झाला नाही. ही बाब लक्षात घेता परीक्षांच्या तारखांची घोषणा करण्यात आली आहे. मंडळाच्या या निर्णयामुळे यंदा परीक्षा केंद्रांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.

‘ऑनलाईन’ होत आहे अभ्यास

‘कोरोना’चा संसर्ग लक्षात मंडळाने परीक्षेचा अभ्यासक्रम कमी केला आहे. शाळांकडून ‘ऑनलाईन’ अध्ययन सुरू आहे. यासोबतच टीव्ही, रेडियो व इतर माध्यमांतून विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम पूर्ण करण्यात आला आहे. शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांत आता प्रत्यक्ष वर्गदेखील होत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाबाबत चिंता करण्याची आवश्यकता नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.