शहरं
Join us  
Trending Stories
1
Petrol Diesel price hike: महागाईच्या झळा सुरू, पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ! प्रति लिटर ३ रुपयांनी महाग झाले इंधन
2
आजचे राशीभविष्य - १५ मे २०२६, आर्थिक स्थिती मजबूत दिसेल; गैरसमजा पासून जपून राहावे
3
'नीट'चे पेपरचोर रडारवर, अधिकाऱ्यांवरही संशय; पुण्यातील महिलेच्या २१ बँक खात्यांत लाखोंचे व्यवहार
4
राखीव प्रवर्गाची सवलत घेतलेल्या उमेदवारांना खुल्या प्रवर्गात ‘नो एंट्री’, राज्य सरकारचा मोठा निर्णय
5
विशेष लेख: महाराष्ट्रातही लाखो मतदार वगळले जातील का?
6
चिनी जहाजांसाठी होर्मुझ पुन्हा उघडले; ट्रम्प-जिनपिंग चर्चा सुरू असताना इराणचा निर्णय
7
उत्तर प्रदेशात पावसाच्या जोरदार तडाख्याने १११ जणांचा मृत्यू; एक जण ५० फूट उडाला
8
महाराष्ट्रात एसआयआर; ३० जूनपासून होणार मतदारांची पडताळणी; १६ राज्ये, ३ केंद्रशासित प्रदेशांमध्ये तिसरा टप्पा  
9
‘प्रतिस्पर्धी नको, आपण भागीदार बनू; व्यापार युद्धात कोणीच विजयी नसतो’, शी जिनपिंग यांच्या ट्रम्प यांना कानपिचक्या
10
जावेद जाफ़रीच्या पत्नीची १७.५ कोटींची फसवणूक: वादग्रस्त महापालिका सहायक आयुक्त पाटीलसह साथीदारांविरुद्ध गुन्हा; पटेलला अटक
11
महाराष्ट्रात काटकसर सुरू! अधिकारी आठवड्यातून किमान १ दिवस फिरणार रेल्वे, बसने
12
“१४ वर्षांचा वनवास संपला, स्वगृही परतलो, माझ्यात DNA…”; आनंद परांजपेंचा शिंदेसेनेत प्रवेश
13
“...तर महाराष्ट्र पुरोगामी राहिला असता”; प्रणिती शिंदेंचे विधान, गडकरींच्या कार्याची स्तुती
14
हा पराभव पचवणं कठीण; सलग पाचव्या पराभवानंतर तिलक वर्माचं नाव घेत काय म्हणाला श्रेयस अय्यर?
15
अरविंद केजरीवाल यांच्यासह ‘आप’च्या ५ नेत्यांच्या अडचणी वाढल्या; ‘या’ प्रकरणात खटला चालणार
16
तिलक वर्माचा मॅच विनिंग सिक्सर! रोमहर्षक सामन्यात MI नं मारली बाजी; पाचव्या पराभवासह PBKS चं गणित बिघडलं
17
भारतीय जहाजावरील हल्ल्यानंतर होर्मुझजवळ आणखी एक मोठी घटना; नांगर टाकलेल्या जहाजावर कब्जा, इराणच्या दिशेनं गेलं!
18
हिटमॅन रोहित शर्माने MS धोनीचा रेकॉर्ड मोडला, पण विराटला मागे टाकणं जमणार नाही, कारण...
19
सोन्यासंदर्भात सरकारचा आणखी एक मोठा निर्णय! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं खरेदी टाळण्याचं आवाहन 
20
PBKS vs MI : शार्दुल ठाकूरची कमाल! श्रेयस अय्यरचा असा घेतला बदला; अन्... (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

प्रदूषणाच्या विळख्यात चंद्रपूर

By admin | Updated: January 16, 2015 01:01 IST

चंद्रपूर देशातील दुसऱ्या क्रमांकाचे प्रदूषित शहर असतानाही तत्कालीन उद्योगमंत्र्यांनी तडाली एमआयडीसीमध्ये नियम डावलून ३६ नवीन कोळसा वखारींना मंजुरी दिली आहे. यामुळे चंद्रपूरच्या

हायकोर्टात याचिका : ३६ वखारींना नियम डावलून मंजुरी
नागपूर : चंद्रपूर देशातील दुसऱ्या क्रमांकाचे प्रदूषित शहर असतानाही तत्कालीन उद्योगमंत्र्यांनी तडाली एमआयडीसीमध्ये नियम डावलून ३६ नवीन कोळसा वखारींना मंजुरी दिली आहे. यामुळे चंद्रपूरच्या धोकादायक सीमेपर्यंत पोहोचलेल्या प्रदूषणात आणखी भर पडेल, असा दावा समाजसेवक राजीव कक्कड यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल जनहित याचिकेत केला आहे.
न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व मृदुला भटकर यांनी १४ जानेवारी रोजी याचिकेवर सुनावणी केली. न्यायालयाने केंद्रीय पर्यावरण व वन मंत्रालय, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे विभागीय अधिकारी, उद्योगमंत्री/महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे अध्यक्ष, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे विभागीय अधिकारी, क्षेत्रीय व्यवस्थापक आणि ३६ कोळसा वखार कंपन्यांना नोटीस बजावली आहे. याचिकाकर्त्याने कोळसा वखार कंपन्यांना स्वत: नोटीस तामील केली असून यासंदर्भात न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. ३६ पैकी एका कोळसा वखार कंपनीने वकिलामार्फत न्यायालयात उपस्थिती दर्शवून उत्तर सादर करण्यासाठी २८ जानेवारीपर्यंत वेळ घेतला आहे.
याचिकेतील माहितीनुसार, केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने २००९ मध्ये काढलेल्या सर्वसमावेशक पर्यावरण प्रदूषण निर्देशांकात चंद्रपूर चौथ्या क्रमांकावर आहे. नासाने केलेल्या उपग्रह सर्वेक्षणात चंद्रपूर शहरात १५६० मायक्रोन्स ‘आरएसपीएम’स्तर आढळला आहे. नियमानुसार हा स्तर १५० मायक्रोन्स असायला पाहिजे. ७० पेक्षा जास्त ‘सीईपीआय’ असलेला परिसर गंभीर प्रदूषित मानला जातो. चंद्रपूर शहरात ८३.८८ ‘सीईपीआय’ आहे. देशातील प्रदूषित शहरांमध्ये चंद्रपूर दुसऱ्या स्थानावर आहे. यामुळे केंद्रीय पर्यावरण व वन मंत्रालयाने १३ जानेवारी २०१० रोजीच्या अध्यादेशाद्वारे चंद्रपूर, तडाली, घुग्गुस व बल्लारशाह औद्योगिक वसाहतीत नवीन उद्योग उभारण्यावर बंदी आणली आहे.
यानंतर शासनाने १५ मार्च २०१० रोजी दुसरा अध्यादेश काढून गंभीर प्रदूषित औद्योगिक क्षेत्राच्या सीमा संबंधितांना कळविल्या. तडाली एमआयडीसीचा यात समावेश आहे. ३० मार्च २०१० रोजी काढण्यात आलेल्या तिसऱ्या अध्यादेशानुसार २५ औद्योगिक क्षेत्रावर बंधने आणण्यात आली. हा अध्यादेश तडाली एमआयडीसीला लागू आहे. असे असतानाही ३६ कोळसा वखारींना मंजुरी देण्यात आली आहे. याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. अवधूत पुरोहित यांनी बाजू मांडली. (प्रतिनिधी)