शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde : धर्मवीर चित्रपटात राजन विचारेंबाबत दाखवलेलं सर्व खोटं, विचारे नकली शिष्य; एकनाथ शिंदेंनी सगळंच सांगितलं
2
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला किती मिळणार? देवेंद्र फडणवीसांनी सांगितला आकडा
3
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
4
Israel Hamas War : इस्रायली लष्कराचा पॅलेस्टिनी नागरिकांना अल्टिमेटम, मोठ्या हल्ल्याची भीती
5
भाजपाचे २५-३० आमदार फोडण्याचं उद्धव ठाकरेंचं प्लॅनिंग झालं होतं; एकनाथ शिंदेंचा नवा दावा
6
Income Tax Return : आयटीआर फाईल करण्यासाठी का आवश्यक आहे Form 16? नसेल तर काय करू शकता?
7
Kangana Ranaut : "निवडणूक जिंकली तर..."; बॉलिवूड क्वीन कंगना राणौतची फिल्मी करिअरबाबत मोठी घोषणा
8
Rahul Gandhi : "संविधान बदलण्यासाठी 400 जागांचा नारा पण 150 जागाही मिळणार नाहीत"; राहुल गांधींचं टीकास्त्र
9
आम्हाला धोनी आपल्या संघात हवाय? चाहत्याची मागणी; पंजाबची मालकीण प्रीतीचं भारी उत्तर
10
पराभवाच्या भीतीने नरेंद्र मोदींच्या तोंडी हिंदू-मुस्लीम आणि पाकिस्तानची भाषा, काँग्रेसचं टीकास्र
11
बारामतीत गुंडांकडून प्रचार, रोहित पवार आणि अमोल मिटकरी आमने-सामने, गंभीर आरोप प्रत्यारोप
12
Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्रातील खासदारांचं प्रगतीपुस्तक; लोकसभेत कशी राहिली कामगिरी?
13
रोकड पाहून अधिकारी चक्रावले; ED च्या छापेमारीवर काँग्रेस नेते आलमगीर यांची पहिली प्रतक्रिया
14
एकेकाळी वेटर म्हणून काम केलं; आता अंबानी-अदानी-मस्क-झुकरबर्ग यांनाही मागे टाकलं...
15
राज ठाकरेंच्या नावाचा विचार करावा, आनंद दिघेंच्या 'त्या' विधानानंतर काय घडलं?; CM शिंदेंचा गौप्यस्फोट
16
“पंतप्रधान मोदींना यावे लागते, महाराष्ट्रातील पराभव महायुतीला स्पष्ट दिसतो आहे”: अमोल कोल्हे
17
Acharya Pramod Krishnam : "जो PM मोदींसोबत नाही, तो देशद्रोही", आचार्य प्रमोद कृष्णम यांच्या विधानावरून वाद
18
व्हॉट्सॲपच्या एका फिचरवरुन सरकारसोबत वाद, भारतात WhatsApp बंद होणार?
19
एका दिवसात ₹११७० कोटींनी कमी झाली Rekha Jhunjhunwala यांची संपत्ती, टाटाचा 'हा' शेअर आपटला
20
“RSS-हेमंत करकरे यांच्यात संघर्ष, संघाचे लोक माझ्याकडे यायचे अन्...”; राऊतांचा मोठा दावा

केंद्राचे पथक भिवापूर तालुक्यातील तीन गावांची करणार पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2019 10:49 PM

अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी केंद्राचे पथक सोमवारी जिल्ह्यात दाखल होणार असून ते भिवापूर तालुक्यातील तीन गावांची पाहणी करणार असल्याची माहिती आहे.

ठळक मुद्देसोमवारी देणार भेटी 

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी केंद्राचे पथक सोमवारी जिल्ह्यात दाखल होणार असून ते भिवापूर तालुक्यातील तीन गावांची पाहणी करणार असल्याची माहिती आहे.अतिवृष्टीमुळे शेतपिकांचे मोठे नुकसान झाले. महसूल व कृषी विभागाकडून करण्यात आलेल्या सर्वेक्षणाच्या अहवालानुसार नागपूर जिल्ह्यात १ लाख १९ हजार ३५५ शेतकऱ्यांचे ५४ हजार २०२ हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाले. यासाठी ४८ कोटींच्या मदतीचा प्रस्ताव प्रशासनाकडून पाठविण्यात आला. शासनाकडून शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पहिला टप्प्यात १३ कोटींचा निधी देण्यात आला आहे. राज्य शासनाने मदतीसाठी केंद्र सरकारकडे १० हजार कोटींचा प्रस्ताव पाठविला आहे.त्यामुळे या नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी केंद्राचे चार पथक राज्यात दाखल झाले आहे. एक पथक विदर्भातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी शुक्रवार २२ तारखेलाच दाखल झाले. हे पथक सोमवारी जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी करणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार दुपारच्या सुमारास हे पथक नागपूर जिल्ह्यात दाखल होणार असून भिवापूर तालुक्यातील तीन गावांची पाहणी करतील. नक्षीवडद, सानेगाव व भिवापूर या तीन गावांना ते भेटी देतील, असे सांगितले जाते.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरीCentral Governmentकेंद्र सरकार