शहरं
Join us  
Trending Stories
1
“१४ वर्षांचा वनवास संपला, स्वगृही परतलो, माझ्यात DNA…”; आनंद परांजपेंचा शिंदेसेनेत प्रवेश
2
“...तर महाराष्ट्र पुरोगामी राहिला असता”; प्रणिती शिंदेंचे विधान, गडकरींच्या कार्याची स्तुती
3
हा पराभव पचवणं कठीण; सलग पाचव्या पराभवानंतर तिलक वर्माचं नाव घेत काय म्हणाला श्रेयस अय्यर?
4
अरविंद केजरीवाल यांच्यासह ‘आप’च्या ५ नेत्यांच्या अडचणी वाढल्या; ‘या’ प्रकरणात खटला चालणार
5
तिलक वर्माचा मॅच विनिंग सिक्सर! रोमहर्षक सामन्यात MI नं मारली बाजी; पाचव्या पराभवासह PBKS चं गणित बिघडलं
6
भारतीय जहाजावरील हल्ल्यानंतर होर्मुझजवळ आणखी एक मोठी घटना; नांगर टाकलेल्या जहाजावर कब्जा, इराणच्या दिशेनं गेलं!
7
हिटमॅन रोहित शर्माने MS धोनीचा रेकॉर्ड मोडला, पण विराटला मागे टाकणं जमणार नाही, कारण...
8
सोन्यासंदर्भात सरकारचा आणखी एक मोठा निर्णय! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं खरेदी टाळण्याचं आवाहन 
9
PBKS vs MI : शार्दुल ठाकूरची कमाल! श्रेयस अय्यरचा असा घेतला बदला; अन्... (VIDEO)
10
‘एल-निनो’चा संभाव्य धोका, खरीप हंगामासाठी आवश्यक सज्जता ठेवा: शिवेंद्रसिंहराजे भोसले
11
अमेरिका इराण तणावामध्ये भारतासाठी चांगली बातमी, २ LPG टँकर्स 'होर्मुझ' पार करून पुढे निघाले!
12
Jasprit Bumrah : १३ वर्षांचा प्रवास; जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार! हार्दिक पांड्याचा विषय संपला?
13
ह्युंडाई स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणणार, काय काय फीचर्स असणार? टाटा पंच EV सह या कारना देणार टक्कर
14
जबरदस्त! १३८० किमी धावणार अन् तीन चाकांवरही पळणार! 'ही' नवी हायटेक इलेक्ट्रिक कार ऑटो विश्वात धुमाकूळ घालणार?
15
रशियाचे परराष्ट्र मंत्री PM मोदींना भेटले; तेल संकट, युक्रेन, परस्पर संबंध वाढवण्यावर चर्चा
16
देशातील परिस्थिती गंभीर, सर्वपक्षीय बैठक बोलवा, त्यात पंतप्रधानांनी हजर राहावे- शरद पवार
17
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
18
Vaibhav Suryavanshi In India A Squad : वैभव सूर्यवंशीला BCCI चं मोठं गिफ्ट; भारतीय ‘अ’ संघात निवड
19
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
20
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
Daily Top 2Weekly Top 5

अर्थसंकल्प प्रतिक्रिया ...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:49 IST

आत्मनिर्भर भारतावर भर देताना कोरोना महामारीच्या संकटात अर्थसंकल्पात आरोग्यावर जास्त भर दिला आहे. टेक्सटाइल पार्क, रस्ते, रेल्वे आणि छोट्या ...

आत्मनिर्भर भारतावर भर देताना कोरोना महामारीच्या संकटात अर्थसंकल्पात आरोग्यावर जास्त भर दिला आहे. टेक्सटाइल पार्क, रस्ते, रेल्वे आणि छोट्या कंपन्यांसाठी केलेली तरतूद तसेच करपात्र उत्पन्नासाठी वाद निराकरण समितीचे गठन ही पावले उत्तम आहेत. स्टार्टअपसाठी एक वर्ष करात दिलेली सूट या क्षेत्राला प्रोत्साहन देणारी आहे. सीमाशुल्क कमी केल्याने कच्च्या मालाच्या किमती कमी होतील.

चंद्रशेखर शेगावकर, अध्यक्ष, हिंगणा एमआयए इंडस्ट्रीज असो.

प्रत्येक क्षेत्राला दिलासा

जुने मोटर वाहन स्क्रॅप धोरण, सात मेगा टेक्सटाइल पार्क, फ्रेट कॉरिडोर, वीजग्राहकांना एकापेक्षा जास्त वीज कंपनी निवडण्याचे धोरण, सिक्युरिटीज कायद्याचे एकत्रिकरण, कॉर्पोरेट कायद्याची सुलभ चौकट व्यवसाय अनुकूल व अनुपालन खर्च कमी करण्याचे स्वागतार्थ निर्णय आहेत. वरिष्ठ नागरिकांना करसवलत व नवीन कर न आकारल्याचा निर्णय योग्य आहे.

दीपेन अग्रवाल, अध्यक्ष, चेंबर ऑफ असोसिएशन ऑफ महाराष्ट्र इंडस्ट्री अ‍ॅण्ड ट्रेड.

अर्थव्यवस्था वाढीचा अर्थसंकल्प

सरकारच्या पाच ट्रिलियन डॉलर्सच्या अर्थव्यवस्थेच्या आश्वासनानुसार वाढीसाठी अर्थसंकल्प आहे. उज्ज्वला योजनेच्या आणखी एक कोटी लाभार्थींच्या विस्ताराचे स्वागत आहे. छोट्या कंपन्यांचे पेडअप भांडवल ५० लाखांवरून दोन कोटी आणि जास्तीत जास्त उलाढाल २० कोटींपर्यंत वाढल्यास दोन लाख कंपन्यांना फायदा होईल. लाभांश वितरण कर रद्द करण्याचा निर्णय योग्य आहे. कर सवलतीने स्टार्टअपला चालन मिळेल.

नितीन खारा, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, कॉन्फिडेन्स ग्रुप

उज्ज्वल भविष्याचा संकल्प

सामायिक सुरक्षा, आरोग्य, पायाभूत सुविधा, पारदर्शक करप्रणाली, संशोधन क्षेत्र, विदेशी गुंतवणुकीला प्रोत्साहन देणारा आणि उज्ज्वल भविष्याचा संकल्प असलेला अर्थसंकल्प आहे. समाजातील सर्व वर्ग आणि क्षेत्राला केंद्रस्थानी ठेवून आणि आत्मनिर्भर भारताचा वाट मजबूत करण्याचा निर्धार अर्थसंकल्पात आहे. कोरोना महामारीतून विकासाची वाट सुकर करणारा आहे.

प्रा. संजय भेंडे, संचालक, नॅफकब

संमिश्र अर्थसंकल्प

यंदाचा अर्थसंकल्प संमिश्र आहे. एसएमई व आयकर स्लॅब कमी केलेले नाहीत. एमएसएमईसाठी काही विशेष नाही. स्वास्थ्य, कृषीवर लक्ष केंद्रित केले आहे. कोरोनामुळे नवीन कर नाही. नागपूर मेट्रो टप्पा-२ आणि रस्ते विकासासाठी जास्त तरतूद योग्य आहे. त्यामुळे विदर्भाचा विकास होईल. कृषी सेसचा परिणाम काही दिवसांत दिसून येणार आहे. एखादा टेक्सटाइल पार्क विदर्भात आल्यास विकास होईल.

सुरेश राठी, अध्यक्ष, विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशन