शहरं
Join us  
Trending Stories
1
“१४ वर्षांचा वनवास संपला, स्वगृही परतलो, माझ्यात DNA…”; आनंद परांजपेंचा शिंदेसेनेत प्रवेश
2
“...तर महाराष्ट्र पुरोगामी राहिला असता”; प्रणिती शिंदेंचे विधान, गडकरींच्या कार्याची स्तुती
3
हा पराभव पचवणं कठीण; सलग पाचव्या पराभवानंतर तिलक वर्माचं नाव घेत काय म्हणाला श्रेयस अय्यर?
4
अरविंद केजरीवाल यांच्यासह ‘आप’च्या ५ नेत्यांच्या अडचणी वाढल्या; ‘या’ प्रकरणात खटला चालणार
5
तिलक वर्माचा मॅच विनिंग सिक्सर! रोमहर्षक सामन्यात MI नं मारली बाजी; पाचव्या पराभवासह PBKS चं गणित बिघडलं
6
भारतीय जहाजावरील हल्ल्यानंतर होर्मुझजवळ आणखी एक मोठी घटना; नांगर टाकलेल्या जहाजावर कब्जा, इराणच्या दिशेनं गेलं!
7
हिटमॅन रोहित शर्माने MS धोनीचा रेकॉर्ड मोडला, पण विराटला मागे टाकणं जमणार नाही, कारण...
8
सोन्यासंदर्भात सरकारचा आणखी एक मोठा निर्णय! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं खरेदी टाळण्याचं आवाहन 
9
PBKS vs MI : शार्दुल ठाकूरची कमाल! श्रेयस अय्यरचा असा घेतला बदला; अन्... (VIDEO)
10
‘एल-निनो’चा संभाव्य धोका, खरीप हंगामासाठी आवश्यक सज्जता ठेवा: शिवेंद्रसिंहराजे भोसले
11
अमेरिका इराण तणावामध्ये भारतासाठी चांगली बातमी, २ LPG टँकर्स 'होर्मुझ' पार करून पुढे निघाले!
12
Jasprit Bumrah : १३ वर्षांचा प्रवास; जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार! हार्दिक पांड्याचा विषय संपला?
13
ह्युंडाई स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणणार, काय काय फीचर्स असणार? टाटा पंच EV सह या कारना देणार टक्कर
14
जबरदस्त! १३८० किमी धावणार अन् तीन चाकांवरही पळणार! 'ही' नवी हायटेक इलेक्ट्रिक कार ऑटो विश्वात धुमाकूळ घालणार?
15
रशियाचे परराष्ट्र मंत्री PM मोदींना भेटले; तेल संकट, युक्रेन, परस्पर संबंध वाढवण्यावर चर्चा
16
देशातील परिस्थिती गंभीर, सर्वपक्षीय बैठक बोलवा, त्यात पंतप्रधानांनी हजर राहावे- शरद पवार
17
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
18
Vaibhav Suryavanshi In India A Squad : वैभव सूर्यवंशीला BCCI चं मोठं गिफ्ट; भारतीय ‘अ’ संघात निवड
19
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
20
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
Daily Top 2Weekly Top 5

अर्थसंकल्प प्रतिक्रिया.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:49 IST

आरोग्य आणि पायाभूत सुविधांसाठी जास्त निधीची तरतूद सरकारने केल्याने यंदाचे बजेट आत्मनिर्भर आणि सक्षम भारतासाठी आहे. मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याच्या ...

आरोग्य आणि पायाभूत सुविधांसाठी जास्त निधीची तरतूद सरकारने केल्याने यंदाचे बजेट आत्मनिर्भर आणि सक्षम भारतासाठी आहे. मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याच्या विकासासाठी निधी दिल्याने नागपूरचा विकास वेगाने होणार आहे. एमएसएमई क्षेत्रासाठी तरतूद केल्याने आणि ग्रामोद्योग आयोगाच्या कार्यक्रमासाठी दुप्पट राशी व बजेटमध्ये शेतकऱ्यांचे हित आणि कृषी क्षेत्राला जास्त निधी दिल्याने बजेट गरीब व वयस्कांना दिलासा मिळाला आहे.

जयप्रकाश गुप्ता, केंद्रीय सदस्य, खादी व ग्रामोद्योग आयोग.

विशेष योजनांची घोषणा नाही ()

अर्थसंकल्पात औद्योगिक व सेवा क्षेत्राला महत्त्व देताना ग्रामीण आणि कृषी क्षेत्रासाठी विशेष योजनेची घोषणा नसल्याने या क्षेत्राकडे कानाडोळा केल्याचे दिसून येते. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे सरकारपुढे आव्हान आहे. ग्रामीण आणि शहरी युवकाच्या रोजगारासाठी विशेष पावले उचलली नाहीत. कोरोना संकटात कोणतेही नवीन कर आणि सेसचा भार नागरिकांवर टाकला नाही. हे प्रशंसनीय पाऊल आहे.

मधुर बंग, उद्योजक़

बजेटमध्ये शोषित, वंचित घटकांचे हित नाही ()

बजेटमध्ये अनेक बाबींचा उल्लेख असून तरतुदींचे आकडे दिले आहेत. परंतु, समाजातील दुर्बल घटकांचा विकास व कल्याण आणि अनुसूचित जाती उपयोजना आणि आदिवासी उपयोजनांच्या तरतुदींची अर्थसंकल्पात निश्चित आकडेवारी दिसत नाही. सरकारने पाच वर्षांत किती निधी दिला याची श्वेतपत्रिका काढून खरी परिस्थिती जनतेसमोर आणावी. विविध बाबींमध्ये सरकारची इच्छाशक्ती दिसली नाही. बजेट निराशाजनक आहे.

-ई.झेड. खोब्रागडे, संविधान फाऊंडेशन.