शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
3
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
4
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
5
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
6
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
7
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
8
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
9
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
10
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
11
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
12
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
13
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
14
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
15
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
16
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
17
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
18
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
19
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
20
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
Daily Top 2Weekly Top 5

चांगल्या गोष्टींना समाजापुढे आणा

By admin | Updated: November 18, 2014 00:50 IST

पत्रकारिता हे सामान्य काम नाही. पत्रकारांच्या लिखाणाने जनता प्रभावित होते. त्यामुळे पत्रकाराचे डोळे हे ‘एक्सरे आईज’व बुद्धी ही प्रचंड शार्प असणे गरजेचे आहे. मात्र पत्रकारिता क्षेत्रात शिरलेल्या ‘हेड’

विकास सिरपूरकर : राष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्त चर्चासत्रनागपूर : पत्रकारिता हे सामान्य काम नाही. पत्रकारांच्या लिखाणाने जनता प्रभावित होते. त्यामुळे पत्रकाराचे डोळे हे ‘एक्सरे आईज’व बुद्धी ही प्रचंड शार्प असणे गरजेचे आहे. मात्र पत्रकारिता क्षेत्रात शिरलेल्या ‘हेड’,‘मेड’,‘पेड’ न्यूजमुळे पत्रकारितेचा दर्जा खालावतो आहे. असे असले तरी, आशावादी राहून स्वच्छ चारित्र बाळगून, सापेक्षी वृत्तीने आपल्या कल्पनाशक्तीच्या जोरावर चांगल्या गोष्टींना समाजापुढे आणा, तरच पत्रकारितेत पारदर्शिता येईल, असे मत सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती विकास सिरपूरकर यांनी व्यक्त केले. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, नागपूर श्रमिक पत्रकार संघ व टिळक पत्रकार भवन ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्त ‘सार्वजनिक कामकाजातील पारदर्शकता : माध्यमांची भूमिका’ या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या चर्चासत्रात वक्ता म्हणून ते बोलत होते. यावेळी प्रेस कौन्सिल आॅफ इंडियाचे सदस्य व वरिष्ठ पत्रकार प्रकाश दुबे, माहिती व जनसंपर्क संचालनालयाचे संचालक मोहन राठोड, विभागीय माहिती केंद्रातील जिल्हा माहिती अधिकारी दिलीप कुळकर्णी, टिळक पत्रकार भवन ट्रस्टचे अध्यक्ष प्रदीप मैत्र, सरचिटणीस शिरीष बोरकर, नागपूर श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष बी. एस. त्रिपाठी, सरचिटणीस अनुपम सोनी उपस्थित होते. यावेळी सिरपूरकर यांनी प्रिंट मीडिया कसा बलशाली आहे, याचे उदाहरण देताना ते म्हणाले की, पत्रकार जे लिहितो, ज्या टीका करतो, जे विचार मांडतो, त्या विचाराशी तो जुळलेला असतो. हे विचार तो अक्षराच्या माध्यमातून वृत्तपत्रातून प्रकट करतो. आणि अक्षर कधीही नष्ट होत नाही. त्यामुळे पत्रकाराने जबाबदारी ठेवून पत्रकारिता करणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले. यावेळी बोलताना प्रकाश दुबे यांनी पत्रकारिता जगताचे सध्याचे काय स्वरूप आहे, त्यात बदल करण्यासाठी काय करणे गरजेचे आहे, यावर विवेचन केले. ते म्हणाले की मीडिया हे संवादाचे माध्यम राहिलेले नसून ते सत्तेचे माध्यम झालेले आहे. या माध्यमावर आंतरिक आणि बाहेरूनही संकटाचे सावट आहे. पत्रकारितेच्या परिवर्तनासाठी तिसऱ्या प्रेस आयोगाची गरज त्यांनी व्यक्त केली. पत्रकारिता क्षेत्रात साधन वाढले आहे, मात्र संवेदना कमी झाली आहे. त्यामुळे पत्रकारांनी या क्षेत्रात कार्य करताना संवेदना हरवू देऊ नका, असा सल्लाही त्यांनी दिला. (प्रतिनिधी)