शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
3
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
4
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
5
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
6
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
7
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
8
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
9
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
10
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
11
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
12
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
13
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
14
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
15
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
16
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
17
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
18
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
19
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
20
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
Daily Top 2Weekly Top 5

आम्ही झुगारल्या जातीच्या भिंती

By admin | Updated: June 6, 2017 02:04 IST

काळ बदलत आहे, जग झपाट्याने पुढे जात आहे. मात्र जातीभेद, रुढी, परंपरेचा पगडा आजही समाजावर दिसून येतो.

आंतरजातीय विवाह केलेल्या दाम्पत्यांचा सत्कारलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : काळ बदलत आहे, जग झपाट्याने पुढे जात आहे. मात्र जातीभेद, रुढी, परंपरेचा पगडा आजही समाजावर दिसून येतो. प्रेमविवाहाबाबत लोकांची भूमिका आजही सकारात्मक नाही. त्यामुळे आजही आंतरजातीय प्रेमविवाह करणाऱ्यांना कौटुंबिक व सामाजिक बहिष्कारासारखा संघर्ष सहन करावा लागतो. अशा परिस्थितीतही ज्यांनी जातीच्या भिंती झुगारून प्रेमविवाह केला आणि सुखाचा संसार फुलविला अशा दाम्पत्यांना सोमवारी जि.प.च्या समाजकल्याण विभागातर्फे सन्मानित करण्यात आले. जि.प.च्या आबासाहेब खेडकर सभागृहात जिल्ह्यातील ३०८ आंतरजातीय विवाह करणाऱ्या दाम्पत्यांचा सन्मान करण्यात आला. शासनातर्फे समाजातील जातीभेद दूर करण्यासाठी समाजकल्याण विभागाकडून आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन देण्यात येते. त्यांना प्रमाणपत्र व रोख रक्कम भेट देण्यात येते. जि.प.मध्ये हा कार्यक्रम सोमवारी साजरा झाला. यात ३४ आंतरजातीय विवाह केलेल्या दिव्यांगाचाही समावेश होता. या ३०८ जोडप्यांना १ कोटी ५० लाख रुपयांचे वाटप करण्यात येणार आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन अध्यक्ष निशा सावरकर यांच्याहस्ते झाले. अध्यक्षस्थानी उपाध्यक्ष शरद डोणेकर होते. व्यासपीठावर समाजकल्याण समितीचे सभापती दीपक गेडाम, अर्थ समितीचे सभापती उकेश चव्हाण, सत्तापक्ष नेता विजय देशमुख, जयकुमार वर्मा, शिवकुमार यादव, अति. मुख्य कार्यकारी अधिकारी अंकुश केदार, समाजकल्याण अधिकारी सुकेशिनी तेलगोटे, विनोद पाटील, शांता कुमरे, नंदा नारनवरे, शुभांगी वैद्य, सरिता रंगारी, शकुंतला वरखडे, योगिता चिमूरकर, वंदना पाल, कल्पना चहांदे, सुरेंद्र शेंडे आदी सदस्य उपस्थित होते. यावेळी जिल्ह्यातून आलेल्या दिव्यांग, अव्यंग, आंतरजातीय विवाह करणाऱ्या दाम्पत्यांना धनादेश व सन्मानपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. संसार टिकविण्यासाठी वकिलांकडे जाऊ नकासंसारात वाद होतच असतात. पण वादाचे रूपांतर नाते तुटेपर्यंत जाऊ देऊ नका. इतरांजवळ मनमोकळे करा. मात्र, अशा परिस्थितीत वकिलांचा सल्ला कदापिही घेऊ नका. त्याऐवजी ज्येष्ठांचा सल्ला घ्या. त्यांना मध्यस्थी करण्यास भाग पाडा. कारण, वकील नाते तोडण्याचा सल्ला देतील पण ज्येष्ठ संसार टिकवण्याचाच सल्ला देतील, असा सल्ला अध्यक्ष निशा सावरकर यांनी उपस्थित दाम्पत्यांना दिला.