शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
2
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
3
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
4
...तेव्हा "शिवसेना + राष्ट्रवादी + भाजपा सरकार" बनवण्याची ऑफर उद्धव ठाकरेंनी दिली होती; तटकरेंचा गौप्यस्फोट
5
पैशांची कमतरता, पक्षही देईना, निवडणूक लढू शकणार नाही; काँग्रेसच्या महिला उमेदवारानं परत केलं तिकीट
6
नितीन पाटलांना जूनमध्ये खासदार केलं नाही तर पवारांची औलाद सांगणार नाही; अजित पवारांची घोषणा
7
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
8
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

देशासाठीच्या कर्तव्याची जाण ठेवा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 01, 2020 11:01 AM

Nagpur News नागरिक सर्वसाधारणतः स्वतःच्या मूलभूत अधिकारांबाबत बोलताना दिसतात. मात्र कर्तव्याबाबत फारसे कुणी भाष्य करीत नाही. प्रत्येकाने देशासाठीच्या कर्तव्याची जाण ठेवली पाहिजे, असे मत अधिवक्ता फिरदोस मिर्झा यांनी व्यक्त केले.

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर – नागरिक सर्वसाधारणतः स्वतःच्या मूलभूत अधिकारांबाबत बोलताना दिसतात. मात्र कर्तव्याबाबत फारसे कुणी भाष्य करीत नाही. प्रत्येकाने देशासाठीच्या कर्तव्याची जाण ठेवली पाहिजे, असे मत अधिवक्ता फिरदोस मिर्झा यांनी व्यक्त केले. भारतीय विचार मंचतर्फे सदर येथे आयोजित संविधान दिवस कार्यक्रमादरम्यान ते बोलत होते.

यावेळी अधिवक्ता ओमप्रकाश जैन, भारतीय विचार मंचचे सदर भाग संयोजक संजय करमरकर प्रामुख्याने उपस्थित होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मनात संविधानाची मूल्ये जपणारा व ती आचरणारा समाज अपेक्षित होता. त्याचे पालन करीत सर्व समाजाने एकमेकांशी सद्भावनेने वागावे, असे आवाहन मिर्झा यांनी केले. आपल्या मूलभूत अधिकारांबाबत बोलत असताना दुसऱ्याच्या अधिकारांना धक्का पोहोचता कामा नये. सर्वांचा आदर ठेवला पाहिजे, असे प्रतिपादन जैन यांनी केले. काही लोक जाणूनबुजून संविधानाच्या नावाखाली समाजात खोट्या व भ्रमित करणाऱ्या बाबी पसरवीत आहेत. अराजकता माजविण्याचा प्रयत्न करणाऱ्यांपासून सावध राहिले पाहिजे, असे मत करमरकर यांनी व्यक्त केले. अनुज पाटील यांनी संचालन केले. भगवान दास अडवाणी, दिलीप मसराम, गणेश दास यावेळी उपस्थित होते.

टॅग्स :Socialसामाजिक