शहरं
Join us  
Trending Stories
1
'नीट'चे पेपरचोर रडारवर, अधिकाऱ्यांवरही संशय; पुण्यातील महिलेच्या २१ बँक खात्यांत लाखोंचे व्यवहार
2
राखीव प्रवर्गाची सवलत घेतलेल्या उमेदवारांना खुल्या प्रवर्गात ‘नो एंट्री’, राज्य सरकारचा मोठा निर्णय
3
चिनी जहाजांसाठी होर्मुझ पुन्हा उघडले; ट्रम्प-जिनपिंग चर्चा सुरू असताना इराणचा निर्णय
4
महाराष्ट्रात एसआयआर; ३० जूनपासून होणार मतदारांची पडताळणी; १६ राज्ये, ३ केंद्रशासित प्रदेशांमध्ये तिसरा टप्पा  
5
‘प्रतिस्पर्धी नको, आपण भागीदार बनू; व्यापार युद्धात कोणीच विजयी नसतो’, शी जिनपिंग यांच्या ट्रम्प यांना कानपिचक्या
6
जावेद जाफ़रीच्या पत्नीची १७.५ कोटींची फसवणूक: वादग्रस्त महापालिका सहायक आयुक्त पाटीलसह साथीदारांविरुद्ध गुन्हा; पटेलला अटक
7
महाराष्ट्रात काटकसर सुरू! अधिकारी आठवड्यातून किमान १ दिवस फिरणार रेल्वे, बसने
8
“१४ वर्षांचा वनवास संपला, स्वगृही परतलो, माझ्यात DNA…”; आनंद परांजपेंचा शिंदेसेनेत प्रवेश
9
“...तर महाराष्ट्र पुरोगामी राहिला असता”; प्रणिती शिंदेंचे विधान, गडकरींच्या कार्याची स्तुती
10
हा पराभव पचवणं कठीण; सलग पाचव्या पराभवानंतर तिलक वर्माचं नाव घेत काय म्हणाला श्रेयस अय्यर?
11
अरविंद केजरीवाल यांच्यासह ‘आप’च्या ५ नेत्यांच्या अडचणी वाढल्या; ‘या’ प्रकरणात खटला चालणार
12
तिलक वर्माचा मॅच विनिंग सिक्सर! रोमहर्षक सामन्यात MI नं मारली बाजी; पाचव्या पराभवासह PBKS चं गणित बिघडलं
13
भारतीय जहाजावरील हल्ल्यानंतर होर्मुझजवळ आणखी एक मोठी घटना; नांगर टाकलेल्या जहाजावर कब्जा, इराणच्या दिशेनं गेलं!
14
हिटमॅन रोहित शर्माने MS धोनीचा रेकॉर्ड मोडला, पण विराटला मागे टाकणं जमणार नाही, कारण...
15
सोन्यासंदर्भात सरकारचा आणखी एक मोठा निर्णय! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं खरेदी टाळण्याचं आवाहन 
16
PBKS vs MI : शार्दुल ठाकूरची कमाल! श्रेयस अय्यरचा असा घेतला बदला; अन्... (VIDEO)
17
‘एल-निनो’चा संभाव्य धोका, खरीप हंगामासाठी आवश्यक सज्जता ठेवा: शिवेंद्रसिंहराजे भोसले
18
अमेरिका इराण तणावामध्ये भारतासाठी चांगली बातमी, २ LPG टँकर्स 'होर्मुझ' पार करून पुढे निघाले!
19
Jasprit Bumrah : १३ वर्षांचा प्रवास; जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार! हार्दिक पांड्याचा विषय संपला?
20
ह्युंडाई स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणणार, काय काय फीचर्स असणार? टाटा पंच EV सह या कारना देणार टक्कर
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांविरुद्धची आधारहीन याचिका फेटाळली

By admin | Updated: January 17, 2015 02:38 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सरकारी वकील (हायकोर्ट) भारती डांगरे यांच्यासह इतर संबंधितांविरुद्ध गैरप्रकाराच्या आरोपाप्रकरणी चौकशीचे निर्देश देण्यास मुंबई उच्च न्यायालयाच्या ...

नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सरकारी वकील (हायकोर्ट) भारती डांगरे यांच्यासह इतर संबंधितांविरुद्ध गैरप्रकाराच्या आरोपाप्रकरणी चौकशीचे निर्देश देण्यास मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी स्पष्ट नकार दिला. असे निर्देश देण्यासाठी प्रकरणात मांडलेले मुद्दे पुरेसे नसल्याचे न्यायालयाने सांगितले.
२३ डिसेंबर २०१४ रोजी उच्च न्यायालयाने देवेंद्र फडणवीस व इतर आरोपींविरुद्ध जेएमएफसी (प्रथम श्रेणी न्यायादंडाधिकारी) न्यायालयात २३ वर्षांपर्यंत प्रलंबित खटला दोन्ही पक्षांत आपसी तडजोड झाल्यामुळे रद्द केला होता. त्यासाठी दोन्ही पक्षांनी फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम ४८२ अंतर्गत अर्ज दाखल केला होता. ही कार्यवाही करताना गैरप्रकार झाल्याचा आरोप करून अ‍ॅड. सतीश उके यांनी उच्च न्यायालयात फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम १९५ व ३४० अंतर्गत अर्ज दाखल केला होता. देवेंद्र फडणवीस, अ‍ॅड. भारती डांगरे यांच्यासह इतर संबंधितांविरुद्ध गैरप्रकाराची चौकशी व न्यायालय अवमाननेसाठी फौजदारी करावाई करण्यात यावी आणि २३ डिसेंबर २०१४ रोजीचा आदेश मागे घेण्यात यावा अशी विनंती उके यांनी केली होती. न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व मृदुला भटकर यांनी त्यांची विनंती अमान्य करून अर्ज फेटाळून लावला.
उके यांनी विविध आरोप केले होते. दोन्ही पक्षकारांनी तडजोडीयोग्य गुन्हे नसतानाही खटला रद्द करण्यासाठी अर्ज केला. अर्जावरील कार्यालयीन आक्षेप बाजूला ठेवून संपूर्ण कार्यवाही पूर्ण करण्यात आली. देवेंद्र फडणवीस यांनी स्वत:चा व्यवसाय नमूद करताना सामाजिक कार्यकर्ता अशी खोटी माहिती दिली. आवश्यक स्वाक्षऱ्या व फडणवीस स्वत: उपस्थित नसताना खटला रद्द करण्यात आला. अ‍ॅड. एम.बी. पराते यांनी स्वत:साठी वकीलपत्र सादर केले होते. इतरांचे वकीलपत्र त्यांनी घेतले नव्हते. न्यायालयाच्या तांत्रिक विभागाने यावर आक्षेप घेतला होता. हे आक्षेप तसेच ठेवून प्रकरण चालविण्यात आले.
फडणवीस यांच्याविरुद्धच्या निवडणूक याचिकेत त्यांनी या प्रकरणातील गुन्हा लपविल्याची बाब नमूद करण्यात आली आहे. यामुळे हा गुन्हा रद्द करण्याची कार्यवाही करण्यात आली.
फडणवीस व अ‍ॅड. भारती डांगरे एकाच महाविद्यालयात शिकले असून त्यांचे चांगले नाते आहे. खटला रद्द करण्याची कार्यवाही नियोजनबद्धरीत्या, एकमेकांशी संपर्क साधून आणि सरकारी वकिलाची मदत घेऊन पूर्ण करण्यात आली, असे उके यांचे म्हणणे होते. (प्रतिनिधी)