शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
2
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
3
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
4
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
5
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
6
अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता...
7
Vastu Tips: घरात पाऊल ठेवताच अस्वस्थ वाटतं? नकारात्मक ऊर्जा ओळखण्याचे संकेत आणि उपाय जाणून घ्या!
8
"हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी
9
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
11
लग्नानंतरही प्रियकराचा नाद सुटेना; संतापलेल्या वडिलांनी लेकीला संपवलं, 'असा' उघड झाला गुन्हा
12
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
13
IPL 2026: एकही टी-२० सामना खेळला नाही, तरीही 'हा' खेळाडू घेऊ शकतो मुंबई इंडियन्समध्ये रोहितची जागा!
14
IPL 2026: 'मुंबई इंडियन्स'च्या ताफ्यात आला नवा खेळाडू; कोण आहे 'मिस्टर हँडसम'?
15
"अशा गोष्टी घडतच असतात..." छळ सहन करणाऱ्या तरुणीला TCSच्या महिला अधिकाऱ्यांनीच झापलं!
16
IPL 2026: आयपीएलमध्ये भारतीय सलामीवीर म्हणून सर्वाधिक षटकार; विराट- केएल राहुलमध्ये टक्कर!
17
अमेरिकेच्या नाकेबंदीला इराणच्या वाकुल्या; इराणी सुपरटँकर सुरक्षा भेदत होर्मुझ मार्गे पोहोचले आखातात
18
Chaitra Amavasya 2026: अमावस्येचा काळ असतो अतिसंवेदनशील; अंघोळीपूर्वी आठवणीने करा 'हा' ज्योतिषीय उपाय
19
"बाळ हवं तर तुझ्या बायकोला माझ्याकडे पाठव..."; धर्मांतरासाठी दबाव आणणारी गँग 'असा' करायचा छळ
20
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
Daily Top 2Weekly Top 5

आंबे पिकविण्यासाठी अजूनही होतोय प्रतिबंधित कॅल्शियम कार्बाइडचा उपयोग !

By मोरेश्वर मानापुरे | Updated: June 6, 2024 20:27 IST

रसायनाने पिकलेले आंबे आरोग्यासाठी घातक : सरकारची एथिलीन रिपनरच्या वापराला परवानगी

नागपूर : अन्न व औषध प्रशासन विभागाच्या (एफडीए) संथ कारवाईमुळे यंदाच्या हंगामात कळमन्यातील फळे व्यापारी आंबे पिकविण्याठी प्रतिबंधित कॅल्शियम कार्बाइड रसायनाचा सर्रास उपयोग करीत असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने (एफएसएसएआय) तीन वर्षांआधी अधिसूचना काढून फळे पिकविण्यासाठी एथिलीन रिपनर रसायनाच्या वापराला अधिकृत परवानगी दिली आहे. या रसायनाने आंबे उशिरा पिकतात. त्यामुळेच झटपट नफा कमविण्यासाठी पर्याय म्हणून कळमन्यातील व्यापारी पुन्हा प्रतिबंधित कॅल्शियम कार्बाइडकडे वळले आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाकडून व्यापाऱ्यांवर कारवाई होत नसल्याने कळमन्यात या रसायनाचा सर्रास उपयोग होत असल्याचे व्यापाऱ्यांनी खासगीत सांगितले. दुसरीकडे कॅल्शियम कार्बाइड रसायनाचा उपयोग आता बंद झाल्याचे एफडीएच्या अधिकारी सांगतात. अर्थपूर्ण व्यवहारामुळे व्यापाऱ्यांवर कारवाई होत नसल्याचा ग्राहक पंचायतचा आरोप आहे.

एथिलीन रिपनरने दोन दिवसातच पिकतात आंबेभारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाच्या अधिसूचनेनंतर फळे पिकविण्यासाठी कॅल्शियम कार्बाइडऐवजी एथिलीन रिपनर रसायनाचा उपयोग होऊ लागला. या रसायनाने दोन दिवसातच आंबे पिकतात. पाऊच स्वरुपात चीन देशातून आलेले हे रसायन ओले करून आंब्याच्या पेटीत ठेवतात. या रसायनाचा आरोग्यावर परिणाम होत नसल्याचे सरकारचे मत आहे. पण सरकारचा दावा खरा नसल्याचे तज्ज्ञ सांगतात. नैसर्गिक पद्धतीने पिकलेले आंबे आरोग्यासाठी नेहमीच उत्तम असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. व्यापारी नफा कमविण्यासाठी आधीही प्रतिबंधित कॅल्शियम कार्बाइडचा उपयोग करायचे. आता त्याऐवजी सरकारमान्य दुसरे रसायन आले आहे. शेवटी मानवी आरोग्याशी खेळ होतोच.

केवळ दोन पाऊचने आंब्याची पेटी पिवळीधम्मसध्या आंब्याचा हंगाम आहे. सर्वच प्रकारचे आंबे कळमन्यात विक्रीसाठी येत आहेत. सध्या आवक वाढली आहे. त्यामुळे आंबे पिकविण्यासाठी रसायनाचा उपयोग होत आहे. याआधीही विकलेले आंबे कोणत्या रसायनाने पिकविले होते, याची माहिती विभागाकडे नाही. शिवाय किती कारवाऱ्या झाल्या, याचीही नोंद नाही. या रसायनाबाबत अधिकारी अनभिज्ञ आहेत. पिकलेल्या आंब्याची प्रयोगशाळेत तपासणी केल्यास आंब्यात रसायन असल्याचे निष्पन्न होत नाही. त्यामुळे ग्राहकांनीच आंबे जपून खावेत, असा सल्ला ग्राहक पंचायतच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.

टॅग्स :nagpurनागपूर