शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
3
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
4
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
5
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
6
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
7
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
8
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
9
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
10
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
11
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
12
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
13
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
14
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
15
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
16
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
17
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
18
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
19
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
20
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

वृक्षतोडीने गहिवरलेल्या ‘बाबां’नी कोरली स्मरणशिला

By admin | Updated: February 4, 2015 00:53 IST

इमारती बांधताना अविचारीपणे हजारो वृक्षांची अक्षरश: कत्तल केली जाते. पर्यावरण आणि प्रदूषण हा विषय कागदोपत्रीच रंगविला जातो. या विषयावर मोठमोठी भाषणे ठोकली जातात.

३६ वर्षे पूर्ण : आनंदवनमध्ये ‘त्या’ स्मृतींना उजाळासाईनाथ कुचनकार - चंद्रपूरइमारती बांधताना अविचारीपणे हजारो वृक्षांची अक्षरश: कत्तल केली जाते. पर्यावरण आणि प्रदूषण हा विषय कागदोपत्रीच रंगविला जातो. या विषयावर मोठमोठी भाषणे ठोकली जातात. मात्र कळत-नकळत आनंदवनच्या स्थापनेसाठीही अनेक वृक्षांची आहुती द्यावी लागली होती. तेव्हा बाबा खूप व्यथित झाले होते. त्यानंतर त्यांनी हजारो वृक्षांची लागवड केली. मात्र आहुती दिलेल्या वृक्षांचे कायम स्मरण राहावे, यासाठी त्यांनी आनंदवनात अनामवृक्षांची स्मरणशिला कोरली. या कोनशिलेला ३६ वर्षे पूर्ण झाली. कुष्ठरुग्णांच्या सेवेसाठी आयुष्य वेचणाऱ्या बाबांचे निसर्गावरही तेवढेच प्रेम होते, हेच या स्मरणशिलेवरून अंकित होते. आनंदवनमुळे समाजाने वाळीत टाकलेल्या हजारो कृष्ठरुग्णांना आधार मिळाला. एकीकडे त्यांना आधार मिळाला असला, तरी त्यासाठी अनेक वृक्षांची तोड करावी लागली. वृक्षतोडीमुळे बाबांचे मन हेलावले. त्यामुळे बाबांनी आनंदवनात ४ फेब्रुवारी १९७९ रोजी ‘अमनवृक्षाची स्मरणशिला’ स्थापन केली. त्या वृक्षांचे स्मरण आजही आनंदवनमध्ये होत आहे.आदर्श घेतील काय?आनंदवन उभारताना शेकडो वृक्षांचा बळी गेला. त्यानंतर त्यापेक्षा अधिक वृक्ष लागवड करण्यात आली. आज रस्ता चौपदरीकरणासाठी हजारो वृक्षांची अक्षरश: कत्तल केली जाते. वृक्ष हटविताना त्या वृक्षाच्या मोबदल्यात १० वृक्ष लावण्याची हमी द्यावी लागते, त्यानंतरच ते वृक्ष संबंधित ठिकाणाहून हटविण्यास परवानगी दिली जाते. परंतु, १० वृक्ष तर सोडा एक वृक्षही जगविण्यासाठी कुणी धडपडत नाही. कुणालाही त्याचे सोयरसुतक वाटत नाही. बाबांच्या या कार्याचा आदर्र्श साऱ्यांनीच घ्यायला हवा.