शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
2
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
3
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
4
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
5
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
6
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
7
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
8
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
9
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
10
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
11
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
12
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
13
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
14
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
17
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
18
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
19
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
20
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
Daily Top 2Weekly Top 5

१२ महिन्यात ९५ बाळं दुधाला मुकली

By admin | Updated: May 18, 2016 03:05 IST

आई असतानाही गेल्या १२ महिन्यात शून्य ते सहा वर्षांची ९५ निष्पाप बालके दुधाला मुकली.

जन्मदाते हयात, ५५६ बालके अनाथ : मुलींची संख्या ८० टक्क्यांवरसुमेध वाघमारे नागपूरआई असतानाही गेल्या १२ महिन्यात शून्य ते सहा वर्षांची ९५ निष्पाप बालके दुधाला मुकली. यात मुलींची संख्या ८० टक्क्यांहून जास्त आहे, तर शून्य ते १८ वर्षांखालील ५५६ बालके जन्मदाते हयात असतानाही अनाथ झाली आहेत. या दोन्ही वयोगटात कुमारी मातांचे प्रमाण ६० टक्के असल्याचे बोलले जाते. या धक्कादायक आकडेवारीमुळे समाजाचे होणारे अध:पतन समोर आले आहे. स्त्रीभू्रणहत्येचा विषय देशभर गाजत आहे, तसेच अनैतिक संबंधातून जन्माला आलेले अर्भक रस्त्यावर टाकून देण्याचे प्रमाणही कायम असल्याचे या आकडेवारीवरून दिसून येते. माता म्हटले की प्रेम, वात्सल्य, जिव्हाळा, आपुलकी हे सर्व शब्द थिटे पडतात. परंतु काही (कु)माता जन्माला येणाऱ्या बाळाचा जगण्याचा हक्कच हिसकावून घेतात. कुणाला कचराकुंडीत, कुणाला रस्त्यालगत, कुणाला एस.टी. बसमध्ये, कुणाला देवळासमोर, कुणाला इस्पितळात तर कुणाला थेट अनाथलायात बेवारस सोडून पालक फरार झाले आहेत. बालकल्याण समितीकडून मिळालेल्या माहितीनुसार, एप्रिल २०१४ ते मार्च २०१५ या कालावधीत शून्य ते अठराच्या आतील वयोगटातील ६०७ बालके बेवारस मिळाली आहेत. यात शून्य ते सहा वयोगटातील ७६ बालके आहेत. एप्रिल २०१५ ते मार्च २०१६ या कालावधीत ५५६ बालके बेवारस मिळाली आहेत, तर शून्य ते सहा वयोगटातील ९५ बालके आहेत. या दोन्ही वर्षात ‘नकोशी’ म्हणून टाकून दिलेल्या बाळात मुलींचे प्रमाण सर्वाधिक आहे. अनैतिक संबंध, गरिबी, लाचारी व मुलगी हे मुख्य कारण असल्यांचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. अशा बाळांना हक्क प्राप्त करून देण्यासाठी बालकल्याण समिती, अनाथालये शासनाने निर्माण केली आहेत. यामुळे या अनाथ बालकांच्या समस्यांची दाहकता अजून जाणवत नसल्याचे वास्तव आहे.कुमारी माता चिंतेचा विषयउपासमार, सतत श्रम, हेटाळणी, तुच्छता, तिरस्कार, घरगुती हिंसा हे ज्या मुलींच्या वाट्याल येतात तिथं कुमारी माताचे प्रमाण वाढल्याचे मला दिसून आले. कारण, अशा स्थितीत कुणी प्रेमाचे दोन शब्द बोललं, भेटवस्तू दिल्या; तरी ती गोष्ट त्यांच्यासाठी अप्रूप ठरते. अन्न, अलंकार, विविध वस्तू, पैसे अशा आमिषांनी अनेक गरीब मुली स्वत:च्या शरीराचा घास पुरुषांच्या ताटात वाढतात. यातूनच कुमारी मातांचे प्रमाण वाढतेय. -विशाखा गुप्तेअध्यक्ष, बाल कल्याण समिती (महिला व बालविकास)कुमारी मातांचे प्रमाण वाढतेयबदलती जीवनशैली, समाज माध्यमांचे तरुणाईवर असणारे गारुड, लैंगिक शिक्षणाचा अभाव, भिन्नलिंगी आकर्षण यासह अन्य काही कारणांमुळे कुमारी माता होण्याचे प्रमाण वाढल्याचे समोर आले आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागात हे प्रमाण अधिक असल्याचे राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणात अधोरेखित झाले आहे. शहरात हे प्रमाण ६.० टक्के, तर ग्रामीण भागात १०.४ टक्के इतके असून एकूण सरासरी ८.३ टक्के आहे. साधारणत १५ ते १९ हा वयोगट शालेय व महाविद्यालयात शिक्षण घेणारा असतो. त्यात कुमारी अवस्थेत गर्भवती किंवा माता होण्याचे प्रमाण चिंताजनक असल्याचे तज्ज्ञाचे म्हणणे आहे.