शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

नागपूर मनोरुग्णालयात ८० टक्के रुग्णांना खरुजची लागण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2018 12:20 IST

कर्मचाऱ्यांकडून मनोरुग्णांच्या प्रकृतीची काळजी घेणे, ही रुग्णालय प्रशासनाची जबाबदारी. मात्र याकडे दुर्लक्ष झाल्याने नागपूरच्या प्रादेशिक मनोरुग्णालयात खरुजची लागण झाली आहे.

ठळक मुद्देप्रशासनाच्या हलगर्जीपणाचा रुग्णांना फटका

सुमेध वाघमारे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कर्मचाऱ्यांकडून मनोरुग्णांची रोज व्यवस्थित आंघोळ घालणे, स्वच्छ कपडे घालायला देणे, आठवड्यातून एकदातरी पलंगपोस (बेडशीट) बदलणे, त्यांच्या प्रकृतीची काळजी घेणे, ही रुग्णालय प्रशासनाची जबाबदारी. मात्र याकडे दुर्लक्ष झाल्याने नागपूरच्या प्रादेशिक मनोरुग्णालयात खरुजची लागण झाली आहे. सुमारे ८० टक्के रुग्ण या रोगाने ग्रासले आहेत. ‘वेड्यांकडे काय लक्ष द्यावे’, याच भावनेतून रुग्णालयाचे कामकाज चालत असल्याचे हे बोलके उदाहरण आहे. मनोरुग्णांवर योग्य औषधोपचार करून त्यांना सर्वसामान्यांसारखे आयुष्य जगता यावे यासाठी इंग्रजांनी महाराष्ट्रात चार मनोरुग्णालयांची स्थापना केली. मात्र सरकारी अनास्थेमुळे या रुग्णालयाची अवस्था बिकट झाली आहे. दररोजच्या ताणतणावांमुळे मनोरुग्णांची संख्या वाढत आहे. सद्यस्थितीत मनोरुग्णालयात स्त्री आणि पुरुष मिळून ६००वर रुग्ण आहेत. मात्र, मनोरुग्णालयाची जुनाट सोर्इंवरच आजही भिस्त असल्याने व शासन आवश्यक सोई उपलब्ध करून देण्याकडे दुर्लक्ष करीत असल्याने याचा फटका रुग्णांना बसत आहे.

रोगामुळे वाढला रुग्णांमध्ये चिडचिडेपणामहिलांच्या तुलनेत पुरुषांमध्ये खरुज झालेल्या रुग्णांची संख्या मोठी आहे. अनेक रुग्णांच्या बोटांमध्ये, मनगट, कोपर, बगलेचा भाग, नाभी, मांड्या आदी ठिकाणी खरुज झाली आहे. वारंवार खाजवल्यामुळे त्या फुटून जखमा झालेले, पू येणारे रुग्णही दिसतात. या रोगामुळे रुग्णांमध्ये चिडचिडेपणाही वाढल्याचे कर्मचारी सांगतात.

स्क्रब टायफसचीही भीतीरुग्णालयाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात गवत व झुडूप वाढलेले आहे. अनेक रुग्ण या गवतात अनवाणी पायाने चालतात, लोळतात, झुडूपात जातात. यामुळे खरुज होत आहे. सोबतच स्क्रब टायफस होण्याचीही भीती आहे. विशेष म्हणजे, गवत कापण्याचे कंत्राट देण्यात आले असून कंत्राटदाराचेही याकडे दुर्लक्ष झाले आहे.

घाणीचे कपडेही बदलवित नाहीअनेक रुग्ण कपड्यातच घाण करतात, परंतु त्यानंतरही त्यांच्या स्वच्छतेकडे लक्ष दिले जात नाही. विशेष म्हणजे, पूर्वी सफाई कर्मचारी अशा रुग्णांची स्वच्छता करून द्यायचे. आता सफाईचे कंत्राट बदलल्याने याकडे दुर्लक्ष होत आहे. रुग्णांचे कपडे धुण्याचे काम एका कंत्राटदाराला देण्यात आले आहे. नियमानुसार कंत्राटदाराने गरम पाण्यात उकळून, स्वच्छ धुवून देणे आवश्यक आहे. मात्र, कंत्राटदार या नियमाला हरताळ फासत असल्याचे एका कर्मचाऱ्याने सांगितले. धुवून आलेले कपडे अस्वच्छच राहत असल्याने त्वचारोगासारखे आजार वाढले आहेत.

स्वच्छतेच्या अभावामुळे पसरतोय आजारसंसर्गजन्य आजारांपैकी एक महत्त्वाचा आजार म्हणजे खरुज. ‘सारकॉप्टिस’ या परजीवी किड्यामुळे हा आजार होतो. याला मुख्यत: कारण ठरते अस्वच्छता. प्रादेशिक मनोरुग्णालयात स्वच्छता नावालाच आहे. मनोरुग्णांच्या स्वच्छतेकडे विशेष लक्ष देणे आवश्यक असताना त्याकडे झालेले दुर्लक्ष आता समोर येत आहे. मनोरुग्णांना स्वत:हून नीट अंघोळ करता येत नाही. त्यांच्या अंघोळीची जबाबदारी रुग्णालय प्रशासनाची आहे. परंतु ही जबाबदारी घ्यायला कुणीच नाही. अनेक रुग्ण आठवड्यातून एक-दोनदाच अंघोळ करत असल्याचे सूत्राचे म्हणणे आहे.

१०-२० टक्केच रुग्णांना खरुजमनोरुग्णालयात खरुजची साथ नाही. मात्र १०-२० टक्केच रुग्णांना खरुज झाली असून उपचार सुरू आहेत. कपड्यात घाण केलेल्या रुग्णांना आंघोळ घालून देण्याची सूचना नुकतीच सफाई कर्मचाऱ्यांच्या कंत्राटदाराला देण्यात आली आहे. रुग्णांचे कपडे एक दिवसाआड तर बेडशीट आठवड्यानंतर बदलविली जाते. परिसरातील गवत व झुडूपही कापण्याच्या सूचना दिल्या आहेत.-डॉ. आर.एस. फारुखीवैद्यकीय अधीक्षक, प्रादेशिक मनोरु ग्णालय

टॅग्स :Healthआरोग्यmental hospitalमनोरूग्णालय