शहरं
Join us  
Trending Stories
1
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
2
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
3
ऑस्ट्रेलियाचा सुपरफास्ट गोलंदाज मिचेल स्टार्कची IPL 2026मध्ये 'एन्ट्री'; 'या' संघाची ताकद वाढली!
4
जागतिक अस्थिरतेचा Gold-Silver च्या दरांवर परिणाम; इराण-अमेरिका तणावामुळे गुंतवणूकदार सतर्क, पाहा नवे दर
5
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
6
‘सात खासदारांना अपात्र ठरवा; पक्षांतरविरोधी कायदा लावा’
7
Ashok Kharat : "माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा
8
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
9
Mumbai: देशातील सर्वात श्रीमंत पालिकेची नाट्यगृहे इतरांच्या तुलनेत महागडी 
10
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
11
झारखंडमधील बँकेवर मोठा दरोडा; १० मिनिटांत ७ कोटींचं सोनं आणि ५ लाख लंपास
12
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
13
रेल्वेमधून उतरल्यावर स्थानकामध्येच प्रवाशांना करता येणार किराणा खरेदी
14
Ashok Kharat : आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी
15
“आज आनंद दिघे असते, तर संजय निरुपम यांना चपराक लगावली असती”: संदीप देशपांडे, मनसे आक्रमक
16
टीसीएस, इन्‍फोसिस, एचसीएल, विप्रो आणि टेक महिंद्रामध्ये भरती प्रक्रिया मंदावली; ७,३८९ कर्मचाऱ्यांनाही दिला नारळ
17
Mumbai KEM Hospital: केईएम आता ‘कौशल्यश्रेष्ठ एकलव्य मेमोरियल हॉस्पिटल’
18
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
19
आश्रमात २०० व्हिडिओ आणि ९० औषधांची सॅम्पल्स; भोंदू राजेंद्र गडगेच्या उपचाराने बरे वाटणाऱ्यांची होणार चौकशी
20
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
Daily Top 2Weekly Top 5

एमपीआयडीची ७२ प्रकरणे एकाच न्यायाधीशाकडे

By admin | Updated: January 30, 2016 03:14 IST

ऐकून आश्चर्य वाटेल, पण हे खरे आहे. नागपूर जिल्ह्यातील महाराष्ट्र गुंतवणूकदारांचे हित संरक्षण कायदा-१९९९ (एमपीआयडी) अंतर्गतची सर्व ७२ प्रकरणे एकाच अतिरिक्त सत्र न्यायाधीशाकडे सोपविण्यात आली आहेत.

हायकोर्टाची गंभीर दखल : आॅगस्ट-२०१४ मधील आदेशाकडे दुर्लक्षनागपूर : ऐकून आश्चर्य वाटेल, पण हे खरे आहे. नागपूर जिल्ह्यातील महाराष्ट्र गुंतवणूकदारांचे हित संरक्षण कायदा-१९९९ (एमपीआयडी) अंतर्गतची सर्व ७२ प्रकरणे एकाच अतिरिक्त सत्र न्यायाधीशाकडे सोपविण्यात आली आहेत. व्ही. टी. सूर्यवंशी असे हा भार सांभाळत असलेल्या न्याधाधीशांचे नाव आहे. ही प्रकरणे २००५ ते २०१५ या कालावधीतील आहेत. यामुळे पीडितांना जलद न्याय कसा मिळणार हा प्रश्न उपस्थित झाला आहे.मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातील एका जामीन अर्जामुळे हा धक्कादायक प्रकार पुढे आला. मुंबई उच्च न्यायालयाच्या महाप्रबंधकांनी २७ आॅगस्ट २०१४ रोजी आदेश जारी करून सर्व सत्र न्यायाधीश, अतिरिक्त सत्र न्यायाधीश व तदर्थ सत्र न्यायाधीशांना एमपीआयडी कायद्यांतर्गतची प्रकरणे ऐकण्याचा अधिकार दिला आहे. तसेच, या सर्वांना एमपीआयडीची प्रकरणे वितरित करण्यात यावीत असे निर्देश राज्यातील सर्व प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीशांना दिले आहेत. असे असताना नागपूर सत्र न्यायालयातील एमपीआयडीची सर्व ७२ प्रकरणे केवळ न्यायाधीश व्ही. टी. सूर्यवंशी यांच्याकडेच सोपविण्यात आली आहेत. (प्रतिनिधी)- तर जलद न्याय ठरेल स्वप्नउच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अरुण चौधरी यांनी हे प्रकरण गंभीरतेने घेतले आहे. नागपूर सत्र न्यायालयातील एमपीआयडीची प्रकरणे तातडीने निकाली काढण्यासाठी दोनपेक्षा अधिक किंवा किमान पाच न्यायाधीशांची गरज असल्याचे त्यांनी सांगितले आहे. प्रत्येक प्रकरणात १०० ते १००० पानांचे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. ही सर्व प्रकरणे एकाच न्यायाधीशाकडे सोपविल्यास न्यायदान प्रणालीला काहीच अर्थ उरणार नाही व पीडितांना जलद न्याय देणे एक स्वप्न ठरेल, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे. समस्या सोडविण्यासाठी आदेशउच्च न्यायालयाने ही समस्या निकाली काढण्यासाठी महत्त्वपूर्ण आदेश दिले आहेत. नागपूरसारखी परिस्थिती राज्यातील अन्य जिल्हा व सत्र न्यायालयांतही असू शकते. ही बाब लक्षात घेता महाप्रबंधकांनी याचा शोध घेऊन माहिती सादर करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच, नागपूरचे प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीशांनी एमपीआयडीची प्रकरणे तातडीने सर्व सत्र न्यायाधीशांना वितरित करावी, असे सांगण्यात आले आहे. २७ आॅगस्ट २०१४ रोजीच्या आदेशाकडे दुर्लक्ष करणे योग्य नसल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. प्रकरणावर ४ फेब्रुवारी रोजी पुढील सुनावणी निश्चित करण्यात आली आहे.उच्च न्यायालयाची भूमिका महत्त्वपूर्णगुंतवणूकदार फसवणुकीच्या घटना वाढल्या आहेत. श्रीसूर्या समूह व वासनकर वेल्थ मॅनेजमेंट कंपनीचे प्रकरण अगदी ताजे आहे. त्यापूर्वी महिला सहकारी बँक, समता सहकारी बँक, परमात्मा सहकारी, कळमना अर्बन सहकारी आदी संस्थांनी गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांनी फसवणूक केली आहे. अशा फसवणुकीपासून गुंतवणूकदारांचे संरक्षण करण्यासाठी एमपीआयडी कायदा लागू करण्यात आला आहे. यात गुंतवणूकदारांच्या हितासाठी अनेक प्रभावशाली तरतुदी करण्यात आल्या आहेत. परंतु, न्यायालयात ही प्रकरणे तातडीने निकाली निघत नसल्यास कायद्याचा उद्देशच फोल ठरतो. यामुळे याप्रकरणात उच्च न्यायालयाने घेतलेली भूमिका महत्त्वपूर्ण आहे.