शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
4
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
5
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
6
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
7
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
8
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
9
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
10
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
11
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
12
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
13
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
14
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
15
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
16
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
17
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
18
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
19
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
20
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
Daily Top 2Weekly Top 5

६२५ कोटींचे कर्ज वाटप

By admin | Updated: July 26, 2015 03:15 IST

जिल्ह्यात यंदा २०१५-१६ च्या खरीप हंगामात ६७,५५४ शेतकऱ्यांना राष्ट्रीयीकृत बँकांकडून ६२५ कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आले.

६७,५५४ शेतकऱ्यांना पुरवठा : पालकमंत्र्यांकडून बँकांचे अभिनंदन नागपूर : जिल्ह्यात यंदा २०१५-१६ च्या खरीप हंगामात ६७,५५४ शेतकऱ्यांना राष्ट्रीयीकृत बँकांकडून ६२५ कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आले. ८४१.५० कोटी रुपये कर्ज वाटपाचे उद्दिष्ट असून ही प्रक्रिया २२ जुलै पर्यंतची असून ७४.२८ ही पीककर्ज वाटपाची यंदाची टक्केवारी असल्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. ते जिल्ह्यातील कृषी अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत बोलत होते. रविभवन येथे पार पडलेल्या या बैठकीत आमदार सुधीर परवे, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी जोंधळे प्रामुख्याने उपस्थित होते. यावर्षी खरीप हंगामात राष्ट्रीयीकृत बँकांनी शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटपात महत्त्वाची भूमिका बजावल्याने पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शासनाच्यावतीने सर्व बँकांचे अभिनंदन केले. तसेच यंदा पावसाने सुरुवातीला दमदार सुरुवात केल्यानंतर जुलैच्या मध्यात दडी मारली. त्यामुळे शेतकऱ्यांना दुबार पेरणीला सामोरे जावे लागेल, अशी भीती होती.परंतु पावसाच्या पुनरागमनाने ती भीती संपली असून राज्याच्या कृषी विभागाने शेतकऱ्यांना स्वत:कडील बियाणे वापरण्याचे आवाहन केले. यामुळे शेतकऱ्यांची बियाण्यांवर होणाऱ्या एकूण खर्चात ४० टक्के कपात झाली असल्याचे यावेळी सांगितले. तसेच जिल्ह्यात पिकाखालील एकूण क्षेत्र पाहता खताचा ५० हजार मेट्रिक टन असा मुबलक साठा उपलब्ध असल्याने शेतकऱ्यांनी खत पुरवठ्याबाबत काळजी करण्याचे कारण नसल्याचे पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले. यंदाचा खरीप हंगाम-२०१५ चा पीक पेरणी व पीक परिस्थितीचा अहवाल पाहता नागपूर जिल्ह्यात ११३८.८६ मि.मि. इतका सरासरी पाऊस असून २४ जुलै पर्यंत प्रत्यक्ष ४१७.५ मि.मी. म्हणजेच सरासरीच्या तुलनेच ३६.६५ टक्के पाऊस झाला आहे.(प्रतिनिधी)दुबार पेरणीचे संकट दूर जिल्ह्यातील खरीप हंगामात आतापर्यंत पीक पेरणी सर्वसाधारण क्षेत्राच्या प्रमाणात ८१.७० टक्के इतकी लागवड झाली आहे. यात २२ जुलैपर्यंत कापूस २ लाख हेक्टरपर्यंत लागवड झाली आहे. ही लागवड ९८.६९ टक्के इतकी आहे. सोयाबीन १ लाख २४ हजार ४०६ हेक्टर (८६ टक्के), भात १२ हजार १६८ हेक्टर (४ टक्के) आणि तूर ४८ हजार ५८९ हेक्टर (१०६ टक्के) इतकी लागवड झाली आहे जिल्ह्यात वेळेवर पाऊस पडल्याने दुबार पेरणीचे संकट दूर झाल्याचेही पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले.