शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
4
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
5
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
6
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
7
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
8
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
9
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
10
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
11
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
12
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
13
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
14
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
15
‘धुरंधर’चा वाद सामंजस्याने सोडवावा, दिग्दर्शक आदित्य धर, निर्मात संतोष कुमार यांना उच्च न्यायालयाच्या सूचना
16
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
17
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
18
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
19
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
20
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
Daily Top 2Weekly Top 5

मनपाला मिळणार ४४ कोटीचे अनुदान

By admin | Updated: August 2, 2015 03:13 IST

५० कोटीपर्यंत उलाढाल असलेल्या व्यापाऱ्यांना एलबीटीतून वगळण्यात आले आहे.

आर्थिक हातभार : स्टॅम्प ड्युटीतून एलबीटीची वसुली कायमनागपूर : ५० कोटीपर्यंत उलाढाल असलेल्या व्यापाऱ्यांना एलबीटीतून वगळण्यात आले आहे. काही प्रमाणात एलबीटी हटविल्याच्या मोबदल्यात महापालिकेला राज्य सरकारकडून दर महिन्याला अनुदान स्वरुपात ४४ कोटी मिळण्याची आशा आहे. सोबतच मुद्रांक शुल्काच्या माध्यमातून एक टक्का एलबीटी कायम राहणार आहे. यातून पाच कोटी व तसेच ५० कोटीहून अधिक व्यापार असलेल्या व्यापाऱ्यांकडून ७ कोटी व ४४ कोटी असे महिन्याला ५६ कोटीचे उत्पन्न होण्याची अपेक्षा आहे. मागील पाच वर्षात जकात व एलबीटीच्या माध्यमातून ज्या वर्षात सर्वाधिक उत्पन्न झाले. ते गृहीत धरून सरकारकडून त्या आधारावर अनुदान मिळणार आहे. २०१२-१३ या वर्षात जकातीपासून सर्वाधिक ४८५ कोटीचे उत्पन्न झाले होते. यात ८ टक्के वाढ गृहीत धरता ५२४ कोटी होतात. या आधारे मनपाला दर महिन्याला ४४ कोटी अनुदान मिळण्याची आशा आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुरेसे अनुदान देण्याचे आश्वासन दिले होते. त्यांनी ते पूर्ण केल्याची माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष रमेश सिंगारे यांनी दिली. विधानसभेत पाच महिन्यासाठी २०४०. ४४ कोटीच्या अनुदानाची घोषणा करण्यात आली आहे. ही रक्कम २५ महापालिकांना अनुदान स्वरूपात दिली जाणार आहे. मुद्रांक शुल्काच्या माध्यमातून गेल्या वर्षात मनपाला ६० कोटीचे उत्पन्न झाले होते. त्यावरील एलबीटी कायम असल्याने महिन्याला पाच कोटी मिळतील. जकातीच्या आधारे अनुदान मिळणार असल्याने मनपाची र्आिर्थक स्थिती चांगली होईल. असा विश्वास सत्तापक्षनेते दयाशंकर तिवारी यांनी व्यक्त केला. यातून एलबीटीचे नुकसान भरून निघणार असल्याने तिवारी व सिंगारे यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. अभय योजनेची मुदत १५ दिवसांनी वाढविण्यात आली आहे. त्यानंतर एलबीटी रिटर्न न भरणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई केली जाईल. परंतु या संदर्भात मनपाला सरकारच्या निर्देशाची प्रतीक्षा आहे. (प्रतिनिधी)