शहरं
Join us  
Trending Stories
1
“१४ वर्षांचा वनवास संपला, स्वगृही परतलो, माझ्यात DNA…”; आनंद परांजपेंचा शिंदेसेनेत प्रवेश
2
“...तर महाराष्ट्र पुरोगामी राहिला असता”; प्रणिती शिंदेंचे विधान, गडकरींच्या कार्याची स्तुती
3
हा पराभव पचवणं कठीण; सलग पाचव्या पराभवानंतर तिलक वर्माचं नाव घेत काय म्हणाला श्रेयस अय्यर?
4
अरविंद केजरीवाल यांच्यासह ‘आप’च्या ५ नेत्यांच्या अडचणी वाढल्या; ‘या’ प्रकरणात खटला चालणार
5
तिलक वर्माचा मॅच विनिंग सिक्सर! रोमहर्षक सामन्यात MI नं मारली बाजी; पाचव्या पराभवासह PBKS चं गणित बिघडलं
6
भारतीय जहाजावरील हल्ल्यानंतर होर्मुझजवळ आणखी एक मोठी घटना; नांगर टाकलेल्या जहाजावर कब्जा, इराणच्या दिशेनं गेलं!
7
हिटमॅन रोहित शर्माने MS धोनीचा रेकॉर्ड मोडला, पण विराटला मागे टाकणं जमणार नाही, कारण...
8
सोन्यासंदर्भात सरकारचा आणखी एक मोठा निर्णय! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं खरेदी टाळण्याचं आवाहन 
9
PBKS vs MI : शार्दुल ठाकूरची कमाल! श्रेयस अय्यरचा असा घेतला बदला; अन्... (VIDEO)
10
‘एल-निनो’चा संभाव्य धोका, खरीप हंगामासाठी आवश्यक सज्जता ठेवा: शिवेंद्रसिंहराजे भोसले
11
अमेरिका इराण तणावामध्ये भारतासाठी चांगली बातमी, २ LPG टँकर्स 'होर्मुझ' पार करून पुढे निघाले!
12
Jasprit Bumrah : १३ वर्षांचा प्रवास; जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार! हार्दिक पांड्याचा विषय संपला?
13
ह्युंडाई स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणणार, काय काय फीचर्स असणार? टाटा पंच EV सह या कारना देणार टक्कर
14
जबरदस्त! १३८० किमी धावणार अन् तीन चाकांवरही पळणार! 'ही' नवी हायटेक इलेक्ट्रिक कार ऑटो विश्वात धुमाकूळ घालणार?
15
रशियाचे परराष्ट्र मंत्री PM मोदींना भेटले; तेल संकट, युक्रेन, परस्पर संबंध वाढवण्यावर चर्चा
16
देशातील परिस्थिती गंभीर, सर्वपक्षीय बैठक बोलवा, त्यात पंतप्रधानांनी हजर राहावे- शरद पवार
17
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
18
Vaibhav Suryavanshi In India A Squad : वैभव सूर्यवंशीला BCCI चं मोठं गिफ्ट; भारतीय ‘अ’ संघात निवड
19
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
20
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
Daily Top 2Weekly Top 5

मंजूर १५७ कोटी, दमडीही हाती नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:50 IST

राजीव सिंह नागपूर : राज्याच्या मागील सरकारने नागपूरच्या विकास कार्यासाठी मुख्यमंत्री फंडातून १५७ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता. ...

राजीव सिंह

नागपूर : राज्याच्या मागील सरकारने नागपूरच्या विकास कार्यासाठी मुख्यमंत्री फंडातून १५७ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता. नागपूर मनपाला संबंधित निधीतून विकास कार्य पूर्ण करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली होती. मनपानेही तत्परता दाखवीत १५७ कोटी रुपयांच्या निविदा काढल्या होत्या. ८७ कार्यासाठी १४८ कोटी रुपयांच्या निविदा कंत्राटदारांनी भरल्या. कंत्राटदारांनी १० ते १५ टक्के खाली जाऊन निविदा भरल्या; पण विशेष बाब अशी की, सरकार बदलल्यानंतर संबंधित निधीपैकी मनपाला अद्याप एक रुपयाही मिळालेला नाही. त्यामुळे नागपूर मनपा मोठ्या आर्थिक संकटात आली आहे.

गेल्या विधानसभा निवडणुकीच्या काही महिन्यांपूर्वी नागपूर शहरात विविध विकास कामांसाठी संबंधित राशीचे नियोजन करून रस्त्याची दुरुस्ती, नवीन सिमेंट रोड, अंतर्गत रस्ते आदींच्या ८७ कामांची यादी तयार करण्यात आली. यापैकी ८५ कामांसाठी कार्यादेश जारी करण्यात आले. यापैकी २२ कामे पूर्ण झाली आहेत. २४ कामे सुरू आहेत, तर ३९ कामे अपूर्ण आहेत. जेवढी कामे झाली आहेत, त्यांची बिले कंत्राटदारांनी मनपा वित्त विभागाकडे सोपविली आहेत; परंतु वित्त विभागाने यापैकी एकाही बिलाला हात लावला नाही. कारण संबंधित मदत राशीपैकी एक रुपयाही मनपाला मिळालेला नाही.

वरिष्ठ अधिकारी म्हणाले, संबंधित राशीकरिता नागपूर मनपातर्फे अनेकदा राज्य शासनाला पत्र लिहिले आहे. या पत्रांवर अद्याप कुठलेही उत्तर आलेले नाही. आताही पाठपुरावा करण्यात येत आहे.

लहान कंत्राटदारांनी थांबविले काम

दहा लाखांपर्यंत काम केलेल्या कंत्राटदारांनी बिल न मिळाल्याने कामे बंद केली आहेत. त्यामुळे अनेक भागांतील अपूर्ण कामांमुळे नागरिकांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. जेव्हा नगरसेवक संबंधित कंत्राटदारांकडे काम पूर्ण करण्याची गोष्ट करतात तेव्हा ते जुने बिल अजूनही न मिळाल्याची आठवण त्यांना करून देतात. सत्तारूढ पक्षांतर्फे आश्वासन मिळाल्यानंतर काही मोठ्या कंत्राटदारांनी काम सुरू ठेवल्याची माहिती आहे.

अशी आहे स्थिती :

- १५७ कोटी मंजूर, त्यापैकी एक रुपयाही मिळालेला नाही.

- मनपाने ८७ कामांच्या निविदा काढल्या, १४८ कोटींच्या निविदा भरण्यात आल्या.

- १३ कोटी रुपयांची २२ कामे पूर्ण झाली, ३९ कामे अपूर्ण.

- मनपाने आतापर्यंत एकाही बिलावर निर्णय घेतलेला नाही.