शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH चा 'ई'शानदार विजय! आपल्यासोबत GT लाही मिळवून दिलं प्लेऑफ्सचं तिकीट; CSK चं काय?
2
उद्योगपती गौतम अदानी यांना मोठा दिलासा! अमेरिकेच्या न्याय विभागाने सर्व फौजदारी खटले केले बंद
3
आफ्रिकेत इबोला व्हायरसचा धोका वाढला, भारत सरकार 'अलर्ट मोड'वर, तपासणी अधिक तीव्र
4
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला नॉर्वेचा सर्वोच्च सन्मान; जगातील ३२वा मानाचा पुरस्कार प्रदान
5
चेन्नई सुपर किंग्सचा डाव संपल्यावर MS धोनी मैदानात उतरला; फोटो सेशनसह त्याचा IPL प्रवास थांबला? (VIDEO)
6
हिंदू बांधव रस्त्यावर पूजा करतात, एअरपोर्टवर गरबा खेळतात, आम्ही काही बोलतो का?- वारिस पठाण
7
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
8
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
9
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
10
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
11
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
12
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
13
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
14
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
15
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
16
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
17
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
18
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
19
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
20
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
Daily Top 2Weekly Top 5

मंत्री कोणाला करावे, हाच एक प्रश्न आहे...

By अतुल चिंचली | Updated: December 8, 2024 07:56 IST

सरकार कोणत्याही पक्षाचे, विचाराचे स्थापन झाले, तरी मंत्री कोणाला करावे? हाच एक प्रश्न सतत छळत राहतो...

- अतुल कुलकर्णी संपादक, मुंबई

प्रिय आमदार मित्रहो,
सरकार कोणत्याही पक्षाचे, विचाराचे स्थापन झाले, तरी मंत्री कोणाला करावे? हाच एक प्रश्न सतत छळत राहतो... एका पक्षाचे मुख्यमंत्री असलेले सरकार असो किंवा वेगवेगळ्या पक्षांचे एक मुख्यमंत्री, एक उपमुख्यमंत्री किंवा एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री असे कसेही सरकार बनले तरी प्रश्न एकच आहे, मंत्री कोणाला करावे... तुमच्या मनातल्या प्रश्नांचा घेतलेला हा वेध -
जात बघावी की समाज... 
की सांभाळावे विभागाचे गणित... 

की झुगारून द्यावीत सगळी बंधनं 
आणि द्यावे फक्त आणि फक्त 
गुणवत्तेलाच प्राधान्य? 
की संधी द्यावी निष्ठावंतांना...? 
त्यातही पक्षातल्या निष्ठावंतांना, 
की आपल्यावर निष्ठा ठेवणाऱ्यांना..?
जिल्ह्या-जिल्ह्यात पक्ष वाढवण्यासाठी 
द्यावी संधी आपल्याच पक्षातल्या नेत्यांना..?
की गांधीजींवर प्रेम असणाऱ्या 
आपल्याच नेत्यांना द्यावी मंत्रिपदाची संधी..?
गांधींचे फोटो ज्याच्याजवळ जेवढे जास्त 
तेवढा तो आपल्या कामाचा...
या विचारांमुळे दादा..., भाऊ..., साहेब...
तिघेही परेशान आहेत बाबूराव... म्हणून तर
कोणाला संधी द्यावी हाच एक प्रश्न आहे..?

साहेबांपुढे वेगळेच प्रश्न आहेत...
तानाजी सावंत, संजय राठोड, दीपक केसरकर
अब्दुल सत्तार यांनाच किती वेळा संधी देता...
आम्ही काय सतरंज्याच उचलायच्या का?
असा सवाल चार वेळा निवडून आलेले,
आपल्यावर निष्ठा ठेवून आपल्या सोबत आलेले,
अनेक नेते कळवळून विचारत आहेत...
त्यांना काय उत्तर द्यायचे? 
या विचारात साहेब रात्रभर अस्वस्थ होते...
कारण, मंत्री कोणाला करावे..?
हाच एक सवाल आहे... 
जो दिवस-रात्र सगळ्यांना छळतो आहे...

तिकडे दादांचेही असेच झाले आहे...
छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, 
धनंजय मुंडे, आदिती तटकरे यांना डावलून 
शिफारस तरी कोणाच्या नावाची करायची? 
मराठा तितुका मेळवावा... 
अशी भूमिका घ्यायची की, 
देवाभाऊसारखी ओबीसींची 
जबरदस्त मोट बांधायची..?
की पदरी पडले पवित्र झाले, असे म्हणत 
मिळेल ती मंत्रिपदं घ्यायची आणि 
गपगुमान बसायचे पाच वर्षे विरोध न करता...
सारखा एकच प्रश्न छळतो आहे 
मंत्री कोणाला करावे? हाच तो प्रश्न आहे...

देवाभाऊकडे जाऊन सांगायचे कसे..?
लॉबिंग करायचे की स्वतःचे मार्केटिंग...
देवाभाऊपुढेही प्रश्न आहेतच...
वर्षानुवर्षे मंत्रिपदाची झूल पांघरणाऱ्यांना
दूर करून, देऊन टाकावी का संधी नव्या रक्ताला? 
आणि घ्यावा वसा नवनिर्माणाचा...
की, ज्येष्ठांना द्यावे पाठवून सल्लागार मंडळात,
आणि नव्यांच्या हाती द्यावी राज्याची दोरी 
पक्षाचे निष्ठावंत महत्त्वाचे; की आपले...?
प्रश्न अनेक आहेत, पण छळणारा प्रश्न एकच आहे 
यावेळी मंत्री करावे तरी कोणाला..?

की ठेवाव्या मंत्रिपदाच्या काही खुर्च्या रिकाम्या,
वर्षानुवर्ष हेच तर करत आले आहेत, सगळे... 
त्यातली एक खुर्ची तुमच्यासाठीच ठेवली आहे, 
असे सांगून घ्याव्या काढून पालिका निवडणुका 
की वाटावीत मन कठोर करून
महामंडळांची गाजरे नेहमीप्रमाणे राज्यभर... 

कोणी म्हणतील तुम्ही इतके कठोर का झालात..?
एका बाजूला आम्ही ज्यांना मोठे केले, 
तेच आम्हाला विसरून गेले... दुसऱ्या बाजूला 
आम्ही केलेली मदतही काही जण विसरून गेले...
मग अशा विस्कटलेल्या प्रश्नांचे, 
हे सगळे गाठोडे घेऊन दयाघना 
प्रश्न सोडवण्यासाठी जायचे तरी कोणाकडे..?
कारण या सगळ्याच्या वरही एक प्रश्न छळतोच आहे 
मंत्री कोणाला करावे? हाच तो प्रश्न आहे...
- तुमचाच बाबूराव

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAjit Pawarअजित पवारEknath Shindeएकनाथ शिंदे