शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
4
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
5
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
6
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
7
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
8
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
9
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
10
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
11
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
12
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
13
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
14
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
15
‘धुरंधर’चा वाद सामंजस्याने सोडवावा, दिग्दर्शक आदित्य धर, निर्मात संतोष कुमार यांना उच्च न्यायालयाच्या सूचना
16
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
17
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
18
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
19
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
20
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
Daily Top 2Weekly Top 5

बारामती जिल्हा होणार कधी?

By admin | Updated: June 19, 2014 23:35 IST

ठाणो जिल्ह्याचे विभाजन करण्यास राज्य शासनाने मंजुरी दिली आहे.

महेंद्र कांबळे ल्ल बारामती
ठाणो जिल्ह्याचे विभाजन करण्यास राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. याच अनुषंगाने भौगोलिकदृष्टय़ा विस्ताराने मोठय़ा असलेल्या नगर व पुणो जिल्ह्याचे विभाजन करून नवीन जिल्हे अस्तित्वात कधी येणार, याची चर्चा सुरू झाली आहे. विशेषत: पुणो जिल्ह्याचे क्षेत्रफळ मोठे आहे. त्यामुळे पुणो जिल्ह्याचे विभाजन करून बारामती जिल्हा अस्तित्वात येणार, याची चर्चा मागील 2क् ते 22 वर्षापासून आहे. परंतु, यावर शासनस्तरावर कोणत्याही हालचाली झालेल्या नाहीत. 
साधारणत: 1991 पासून पुणो व नगर जिल्ह्याचे विभाजन करून बारामती जिल्ह्याची निर्मिती करण्याचा प्रस्ताव देण्यात आला होता. पुणो जिल्ह्यातील बारामती, दौंड, इंदापूर, पुरंदरसह सातारा जिल्ह्यातील फलटण, सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस, नगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्याचा समावेश करून बारामती जिल्हा निर्मिती करण्याच्या हालचाली 1991 पासून सुरू आहेत. परंतु, त्यावर अंतिम निर्णय होत नाही. 
राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार यांच्या 12 डिसेंबर 2क्12 मध्ये या तारखेचे औचित्य साधून बारामती जिल्हा घोषित करण्याच्या हालचाली होत्या. मात्र, त्या वेळी निर्णय झाला नाही. सर्व चर्चाना पूर्णविराम मिळाला. पुणो जिल्ह्याचे विभाजन करण्याचा मूळ प्रस्ताव त्यापूर्वी होता.  त्यामध्ये बारामती, इंदापूर, फलटण, माळशिरस, कर्जत या तालुक्यांचा समावेश केला होता. त्यानंतर पुन्हा दौंडचा समावेश केला. त्याचबरोबर बारामती जिल्ह्याची निर्मिती झालीच, तर पुरंदर तालुक्याचादेखील  यामध्ये समावेश करावा, अशा हालचाली सुरू झाल्या. जिल्हा निर्मितीच्या दृष्टीने आवश्यक असलेले सर्व कार्यालय बारामतीत सुरू करण्यात आले आहेत. तसेच, ज्या तालुक्यांचा बारामती जिल्ह्यामध्ये समावेश होण्याचा प्रस्ताव आहे. त्यांचे अंतर साधारणत: 5क् ते 6क् किलोमीटर इतके आहे. त्यामुळे महसुली कामासह अन्य महत्त्वाच्या कामांना गती येईल, नागरिकांचे प्रश्न सुटतील.  
 
4पुणो, अहमदनगर जिल्हा विस्ताराने मोठा आहे. त्यामुळे भौगोलिकदृष्टय़ा विस्तारलेल्या या जिल्ह्यांचे विभाजन करणोदेखील महत्त्वाचे आहे. पुण्यापासून इंदापूरचे शेवटचे गाव 17क् किलोमीटर आहे. त्यामुळे कोणत्याही महसुली अथवा अन्य कामांसाठी जाण्यासाठी नागरिकांना मानसिक त्रस होतो. त्यामुळे बारामती, दौंड, इंदापूर, पुरंदर, फलटण, माळशिरस, कर्जत तालुक्यांना बारामती मध्यवर्ती ठिकाण आहे.
 
4जिल्ह्याच्या ठिकाणी असणारे सर्व शासकीय कार्यालये बारामतीमध्ये सुरू झाली आहेत. त्यासाठी नवीन मध्यवर्ती इमारत उभारण्यात आली आहे. महावितरण कंपनीचे परिमंडल कार्यालय, अतिरिक्त पोलीस अधीक्षक कार्यालय, पोलीस प्रशिक्षण केंद्र, अतिरिक्त सत्रन्यायालय आदी महत्त्वाची कार्यालये बारामतीमध्ये आहेत. त्याबरोबर आरटीओ, कृषी, आरोग्य आदी विभागीय कार्यालयांचा कारभार बारामतीतून सुरू आहे.
 
4 पुणो, नगर जिल्ह्याचेदेखील विभाजन होण्याच्या हालचालींना वेग येईल. त्यानुसार ‘बारामती जिल्हा’ अस्तित्वात येण्याची चर्चा पुन्हा वाढली आहे. मात्र, बारामती जिल्ह्यात समावेश करण्यासाठी माळशिरस, फलटण, पुरंदरच्या राजकीय मंडळींचा विरोध आहे, असे सांगितले जात आहे.  परंतु, या तालुक्यांना बारामती जिल्ह्याची निर्मिती झाल्यास फायदाच होणार आहे.