शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
2
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
3
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
4
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
5
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
6
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
7
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
8
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
9
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
10
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
11
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
12
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
13
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
14
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
15
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
16
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
17
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
18
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
19
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
20
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेची ही कसली मैत्री?

By admin | Updated: August 21, 2014 01:43 IST

महायुतीच्या उमेदवारास उघड विरोध केला, त्यांनाच पुन्हा उमेदवारी देण्यासाठी शिवसेना पायघडय़ा घालत असेल तर शिवसेनेचे हे राजकारण न समजणारे आहे.

विश्वास पाटील - कोल्हापूर
ज्या माजी आमदारांने लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारास उघड विरोध केला, त्यांनाच पुन्हा उमेदवारी देण्यासाठी शिवसेना पायघडय़ा घालत असेल तर शिवसेनेचे हे राजकारण न समजणारे आहे. शिवसेनेचा हा घटक पक्षांसोबत कसला व्यवहार आणि ही कसली मैत्री, असा सवाल खासदार राजू शेट्टी यांनी  केला. शिवसेनेचे कार्याध्यक्ष उध्दव ठाकरे यांच्या उद्याच्या कोल्हापूर जिल्ह्यांतील कोणत्याच कार्यक्रमांना उपस्थित न राहण्याचा निर्णय घेतला असल्याचे खासदार शेट्टी यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. या घडामोडींमुळे महायुतीमध्ये जागावाटपाआधीच तणाव निर्माण झाला आहे.
शाहूवाडी मतदारसंघातील पक्षाचे माजी आमदार सत्यजित पाटील यांच्या पुढाकाराने सरुड (ता.शाहूवाडी) येथे होत असलेल्या मेळाव्यासाठी ठाकरे उद्या (गुरुवारी) कोल्हापुरात येत आहेत. सरुडकर यांनी गेल्या लोकसभा निवडणुकीत स्वाभिमानीचे नेते खासदार शेट्टी यांच्याविरोधात काम केले. त्यांनी काँग्रेसचे उमेदवार कल्लाप्पाण्णा आवाडे यांना पाठिंबा दिला होता. त्यावरून शेट्टी व शिवसेना यांच्यात धुसफूस सुरु झाली आहे. शिवसेनेने सत्यजित पाटील यांना उमेदवारी देवू नये, अशी उघड भूमिका शेट्टी यांनी घेतली आहे. शाहूवाडी मतदारसंघ स्वाभिमानी शेतकरी संघटनेस द्यावा व त्यापक्षातर्फे विद्यमान आमदार विनय कोरे यांच्याविरोधात संघटनेचे लढाऊ नेते सदाभाऊ खोत किंवा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष भारत पाटील यांना 
रिंगणात उतरण्याची ‘स्वाभिमानी’ची तयारी आहे. या घडामोडींच्या पाश्र्वभूमीवर खासदार शेट्टी म्हणाले,‘माङया मतदारसंघात शिवसेना कार्यक्रम घेत असेल व आम्हांला त्याबद्दल अजिबातच विश्वासात घेतले जात नसेल तर ही गोष्ट योग्य नाही. त्याबद्दल मी आज रावतेंकडे नाराजी व्यक्त करणार आहे. शिवसेनेने कुणाला उमेदवारी द्यायची हा त्या पक्षाचा अधिकार आहे. परंतु ज्यांनी आम्हांला लोकसभेला थेट विरोध केला, त्यांनाच तुम्ही उमेदवारी देणार असाल तर संघटनेचे कार्यकर्तेही गप्प बसणार नाहीत.  ज्यांनी काँग्रेस सत्तेत असताना लुटमार केली तेच लोक आता काँग्रेसचे जहाज बुडायला लागल्यावर महायुतीत यायला रांग लागली आहे. अशा लोकांना घेतल्यास लोक तुमच्यावर विश्वास ठेवणार नाहीत. याचा शिवसेना नेतृत्वाने विचार करावा, असा सल्लाही शेट्टी यांनी दिला आहे.
 
च्आज भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस, शिवसेनेचे नेते दिवाकर रावते, स्वाभिमानी शेतकरी पक्षाचे राजू शेट्टी, शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे यांच्यात जागा वाटपावर पुणो येथे चर्चा झाली. राष्ट्रीय समाज पक्ष आणि रिपब्लिकन पक्षाचा आठवले गट हे घटक पक्ष यावेळी उपस्थित नव्हते. जागा वाटप होत नाही तोर्पयत इतरांना दिलेले आश्वासन पाळायचे की नाही हे त्या त्या पक्षाने ठरवावे. वाटप होत नाही तोर्पयत घटक पक्ष त्या जागेवरचा दावा सोडणारच नाही, असे शेट्टी यांनी सांगितले.
च्ज्या घटक पक्षाची जेथे ताकद आहे, तेथे निवडून येण्याची क्षमता असलेल्या उमेदवारांना उभे करण्याचा प्रय} करायचा असे ठरले आहे. आमच्या संभाव्य उमेदवारांना आम्ही उमेदवार आहोत असे सांगणो अवघड झाले आहे, असे सांगून खा. शेट्टी म्हणाले, स्वाभिमानी पक्षाने 38 जागा, तर शिवसंग्राम संघटनेने 16 मागितल्या आहेत. काही जागांवर आमचा दावा कसा मजबूत आहे, हे आम्ही दोन्ही नेत्यांना पटवून दिले. 
 
च्कॉँग्रेस-राष्ट्रवादीच्या बुडणा:या जहाजातील उंदिर महायुतीकडे येत आहेत. त्यांना तुमच्या जहाजात घ्याल, तर तुमचेच जहाज बुडायला वेळ लागणार नाही, असा इशाराही त्यांनी शिवसेना- भाजपाला दिला. जागा वाटपाबाबत 3क् तारखेर्पयत निर्णय व्हावा, अशी मागणीही त्यांनी केली. रिपाई व राष्ट्रीय समाज पक्षाच्या उपस्थितीत चर्चा होईल तेव्हा ती अधिकृत होईल, असे मेटे यांनी सांगितले. 
 
आदिवासींच्या योजनेत भ्रष्टाचार - उद्धव ठाकरे
नाशिक : आदिवासी योजनेत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी येथे केला.  आदिवासींर्पयत योजना न पोहोचवणा:या आघाडी सरकारला सत्तेवरून खाली खेचण्याचे आवाहनही त्यांनी केले. इगतपुरी तालुक्यातीतल घोटी येथे आदिवासी बांधवाना अन्न-धान्य कीटचे ठाकरे यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. शिवसेनेच्या मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, आघाडी सरकारने आदिवासी बांधवांचा विश्वासघात केला. कुपोषणाच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले. सेनेने सामाजिक बांधीलकी जपत कुपोषणमुक्तीसाठी विविध उपक्रम राबविले. वनविभागातील वरिष्ठ अधिकारी चंद्रकांत खाडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शिक्षण मंडळ सदस्य बाबूराव आढाव यांच्यासह मनसेच्या कार्यकत्र्यानी शिवसेनेत प्रवेश केला.
 
कामगार नेते विजय कांबळे 
देणार राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी
मुंबई : कामगार नेते विजय कांबळे हे समर्थक कार्यकत्र्यासह राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देणार आहेत. सध्या ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष असून सामाजिक समता मंचचे संस्थापक आहेत.  देशात होत असलेले राजकीय बदल आणि राष्ट्रवादीने राज्यातील दलित समाजाची चालवलेली गळचेपी याबाबत कार्यकत्र्याची मते जाणून घेऊन ते पुढील राजकीय वाटचालीचा निर्णय येत्या शनिवारी घेणार आहेत. वांद्रे (पूर्व) एमआयजी क्रि केट क्लब येथे त्यांच्या सामाजिक समता मंचच्या महाराष्ट्र कार्यकरिणीसह श्रमिक उत्कर्ष कामगार सभेच्या पदाधिका:यांच्या बैठकीत ते निर्णय जाहीर करतील. 
 
पक्षनिहाय स्थिती
पक्षएकूण उमेदवारविजयमते मिळालीटक्के
काँग्रेस2868क्1,19,41,83231
शिवसेना1697363,15,49316.39
भाजपा1166549,32,76712.8क्
जनता दल1821122,58,9145.86
शेकाप4267,88,2862.क्5
माकपा1833,86,क्क्91.क्क्
समाजवादी पार्टी2233,56,731क्.93
नाग विदर्भ
आंदोलन समिती2182,677क्.21
महाराष्ट्र विकास
काँग्रेस3145,4क्4क्.12
अपक्ष31964591,क्4,क्3623.63