शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH चा 'ई'शानदार विजय! आपल्यासोबत GT लाही मिळवून दिलं प्लेऑफ्सचं तिकीट; CSK चं काय?
2
उद्योगपती गौतम अदानी यांना मोठा दिलासा! अमेरिकेच्या न्याय विभागाने सर्व फौजदारी खटले केले बंद
3
आफ्रिकेत इबोला व्हायरसचा धोका वाढला, भारत सरकार 'अलर्ट मोड'वर, तपासणी अधिक तीव्र
4
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला नॉर्वेचा सर्वोच्च सन्मान; जगातील ३२वा मानाचा पुरस्कार प्रदान
5
चेन्नई सुपर किंग्सचा डाव संपल्यावर MS धोनी मैदानात उतरला; फोटो सेशनसह त्याचा IPL प्रवास थांबला? (VIDEO)
6
हिंदू बांधव रस्त्यावर पूजा करतात, एअरपोर्टवर गरबा खेळतात, आम्ही काही बोलतो का?- वारिस पठाण
7
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
8
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
9
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
10
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
11
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
12
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
13
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
14
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
15
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
16
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
17
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
18
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
19
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
20
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
Daily Top 2Weekly Top 5

Video: विलासरावांच्या आठवणी लातूर शहरातून पुसल्या जातील; रवींद्र चव्हाणांच्या विधानानं वाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2026 23:33 IST

इतका द्वेष, इतका तिरस्कार! विलासरावांच्या निधनाला १३ वर्षे झाल्यानंतर त्यांच्या आठवणीही नष्ट व्हाव्यात ही कामना भाजपाने करावी? असा सवाल प्रवक्ते सचिन सावंत यांनी विचारला आहे.

लातूर - राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहिलेले विलासराव देशमुख यांच्या आठवणी लातूर शहरातून पुसल्या जातील यात शंका नाही असं विधान भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केले आहे. चव्हाण यांचं हे विधान सोशल मीडियात व्हायरल होत आहे. त्यात काँग्रेसनेही रवींद्र चव्हाण यांच्या विधानाचा निषेध करत भाजपावर जोरदार पलटवार केला आहे.

काँग्रेसने त्यांच्या सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटलंय की, स्व. विलासराव देशमुख यांच्या आठवणी लातूर जिल्ह्यातून पुसू शकणारा अजून कोणी निर्माण नाही झाला. अनेक जण इच्छा बाळगून आलेत आणि स्वाभिमानी लातूरकरांनी त्यांना त्यांची जागा दाखवून दिलीय. विलासराव देशमुख यांनी लातूर जिल्ह्याला राष्ट्रीय पातळीवर ओळख मिळवून दिली, त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य लातूरच्या विकासासाठी समर्पित केलं. आज त्यांच्याबद्दल हे सत्तेचा माज असलेले भाजपा नेते लातूरात येऊन बरळून जातात की साहेबांच्या आठवणी पुसल्या गेल्यात. त्यांना काय समजणार विलासराव देशमुख यांचं लातूरशी असलेलं नातं. लातूरच्या कर्तुत्वसंपन्न सुपुत्राचा अपमान लातूरकर कधीही सहन करणार नाही. भाजपवाल्यांनो याद राखा, करारा जवाब मिलेगा असं त्यांनी म्हटलं आहे.

तसेच इतका द्वेष, इतका तिरस्कार! विलासरावांच्या निधनाला १३ वर्षे झाल्यानंतर त्यांच्या आठवणीही नष्ट व्हाव्यात ही कामना भाजपाने करावी? विलासरावांचे स्थान केवळ लातूर नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे. ते कधीही पुसले जाऊ शकणार नाही. द्वेष तिरस्कार पसरविणाऱ्या अनेक संघटना, अनेक नेते आले पण इतिहासाच्या पानात काळ्या अक्षरांत त्यांची नोंद झाली. जनतेने केवळ सद्विचारांना डोक्यावर घेतले आहे. त्यामुळे गांधीजींचा कितीही तुम्ही द्वेष केलात तरी त्यांच्या पुतळ्यासमोर तुम्हाला झुकावे लागते. भाजपा नेत्यांनी स्वतःचे भविष्य काय ते ओळखावे असं सांगत काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी रवींद्र चव्हाणांवर टीका केली आहे.

काय म्हणाले रवींद्र चव्हाण?

लातूर येथे कार्यकर्ता मेळाव्यात भाषणाची सुरुवात करताना भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी भारतमाता की जय, वंदे मातरम अशा घोषणा दिल्या. या घोषणा दिल्यानंतर ते म्हणाले की, खरंतर आपल्या सर्वांचा उत्साह बघितल्यावर लक्षात येते, १०० टक्के विलासरावांच्या आठवणी या शहरातून नक्कीच पुसल्या जातील यात काही शंका नाही असं त्यांनी म्हटलं. 

English
हिंदी सारांश
Web Title : Chavan's statement on erasing Vilasrao's memories sparks controversy in Latur

Web Summary : Ravindra Chavan's statement about erasing Vilasrao Deshmukh's memories from Latur sparked controversy. Congress strongly protested, emphasizing Deshmukh's contributions and enduring legacy. Chavan's remarks ignited a political firestorm.
टॅग्स :Municipal Electionमहानगरपालिका निवडणूक २०२६Latur Municipal Corporation Electionलातूर महानगरपालिका निवडणूक २०२६BJPभाजपाcongressकाँग्रेसRavindra Chavanरविंद्र चव्हाण