शहरं
Join us  
Trending Stories
1
तमिळनाडू सत्तासंघर्ष: बहुमताची बेरीज जुळली नाही; विजय याच्या शपथविधीला राज्यापालांचा पुन्हा ब्रेक?
2
मराठीचा ‘टक्का’ घसरला; ९४ हजार विद्यार्थी नापास; दहावीचा निकाल ९२% : प्रथम भाषा मराठीत ९२% उत्तीर्ण
3
आजचे राशीभविष्य, ०९ मे २०२६: नवीन योजना आखाल, नातेवाईक-मित्रांकडून सुखद बातमी मिळेल! 'असा' जाईल आजचा दिवस 
4
प. बंगालमध्ये सुवेंदूच भाजपच्या सत्तेचे ‘अधिकारी’; मुख्यमंत्रिपदासाठी आठही प्रस्ताव सुवेंदू अधिकारी यांच्या एकट्याच्याच नावाचे
5
सर्वांना मोफत घर नको, ‘कट ऑफ डेट’ वाढवू नका, ‘त्याच ठिकाणी’ कशाला?
6
तमिळ अस्मिता आणखी ताणू नये! तमिळनाडूच्या सत्तेचा पेच सुटणार का?
7
दहावीतही सावित्रीच्या लेकींचीच बाजी; ९२.०९ टक्के परीक्षेचा निकाल; मुली उत्तीर्ण ९७.६२ टक्के तर मुले ८९.५६ टक्के
8
बेशिस्त IPL, बीसीसीआय आणि खेळाडूंच्या गर्लफ्रेंड्स!
9
वयाची ७४ वर्षे, ७२ देशांची सफर; ब्रिटनच्या 'गिल आजीं'चा एकटीनं जगप्रवास!
10
भूसंपादन घोटाळा : अविनाश पाठकसोबतचे आणखी ३ बडे मासे रडारवर! १५ मेपर्यंत पोलिस कोठडीत मुक्काम
11
वर्षभरात १,०९८ कोटींवर चोरट्यांचा डल्ला; राज्यासाठी ‘एनसीआरबी’चा २०२४ चा धक्कादायक अहवाल
12
रेल्वेचा ‘मेगा’ गोंधळ ! सूचना नाही की घोषणा; सलग दुसऱ्या दिवशी कसारा मार्गाचा खोळंबा; प्रवाशांचा आक्रोश
13
..तर विद्रोहाची गाणी नक्कीच रस्त्यावर येतील!
14
DC Vs KKR: कोलकाताकडून ‘दिल्ली’ सर, फिन एलनचे ४७ चेंडूत नाबाद शतक; १४.२ षटकांतच मारली बाजी!
15
निदा खानला लपवण्यात AIMIM नगरसेवक सामील?; CM देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान, म्हणाले...
16
पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार? ३०००० कोटीवर पोहोचला तेल कंपन्यांचा तोटा; रोज ७०० कोटींचा फटका
17
"आमच्या पक्षात कुणीही 'एकनाथ शिंदे' नाही!"; असं का म्हणाले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला? भाजपवर थेट हल्ला
18
अमित शाह यांनी पश्चिम बंगालच्या जनतेला दिले ५ मोठे शब्द; म्हणाले, “भाजपा वचने पूर्ण करणारच”
19
"आता बंगालमध्ये..."; मुख्यमंत्रीपदी निवड होताच शुभेंदू अधिकारी यांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...?
20
टाटा समुहाचा 'दिग्गज' शेअर बनला रॉकेट; रेखा झुनझुनवालांच्या संपत्तीत एका दिवसात १३०० कोटींची वाढ! खास गिफ्ट देण्याच्या तयारीत कंपनी
Daily Top 2Weekly Top 5

भाज्या स्वस्त होणार!

By admin | Updated: August 18, 2014 00:37 IST

सध्या बाजारात नागपूरलगतच्या उत्पादकांकडून भाज्यांची आवक वाढल्याने गणेशोत्सव आणि महालक्ष्मी सणात भाज्या स्वस्त होण्याचे संकेत आहेत. गेल्या काही दिवसांच्या तुलनेत

स्थानिकांची आवक वाढली : टमाटर, मिरचीच्या किमतीत घट
नागपूर : सध्या बाजारात नागपूरलगतच्या उत्पादकांकडून भाज्यांची आवक वाढल्याने गणेशोत्सव आणि महालक्ष्मी सणात भाज्या स्वस्त होण्याचे संकेत आहेत. गेल्या काही दिवसांच्या तुलनेत रविवारी भाज्या स्वस्तात उपलब्ध झाल्याने गृहिणींमध्ये उत्साह आहे. महागाईत थोडीफार का होईना, गृहिणींच्या बचतीच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.
गेल्या काही दिवसांआधी प्रति किलो १०० रुपयांवर गेलेली हिरवी मिरची आणि कोथिंबीरचे भाव सध्या अर्ध्यांपेक्षा कमी आहेत. टमाटर, फुलकोबी, पत्ताकोबी, वांगे, भेंडी, पालक, कोहळे सर्वसामान्यांच्या आवाक्यात आहेत. स्थानिक उत्पादकांसह बाहेरून येणाऱ्या भाज्यांची आवक वाढल्याने भाव कमी झाल्याची माहिती कॉटन मार्केट आडतिया असोसिएशनचे सचिव राम महाजन यांनी दिली.
भाज्यांची मुबलक आवक
गेल्यावर्षी याच काळात जास्त पावसामुळे भाज्या खराब झाल्याने महागल्या होत्या. सणांमध्ये किरकोळ बाजारात बहुतांश भाज्यांचे दर ५० ते ७० रुपये किलो होते. या कारणाने सण साजरे करणारे नको ही महागाई असेच म्हणत होते. पण यंदा स्थिती वेगळी आहे. यावेळी पाऊस पडला, पण उघाडही दिल्याने भाज्यांच्या पिकाला फटका बसला नाही, शिवाय कीडही पडली नाही. भाज्या मुबलक प्रमाणात बाजारात येण्याचे हे मुख्य कारण आहे. उत्पादन आणि वाहतुकीचा खर्च पाहता बाहेरून येणारा माल तसा महागच असतो. किरकोळमध्ये काही भाज्या वगळता बहुतांश स्वस्त आहेत.
कॉटन मार्केट ठोक बाजारात टमाटर नारायणगाव, मदनफल्ली, संगमनेर व नाशिकहून येत आहे. गोंदिया आणि भंडाऱ्यातून भेंडी, छिंदवाडा व औरंगाबाद येथून फुलकोबी आणि परतवाडा, जगदलपूर, रायपूर येथून हिरवी मिरचीची आवक आहे. नागपूरलगतहून चवळी भाजी, पालक, भेंडी, कारल्याची आवक आहे. कॉटन मार्केटमध्ये लहानमोठ्या १५० गाड्या येत आहेत.
कांदे उतरले, बटाटे महागच
सध्या कांद्याला मागणी कमी असल्याने भाव आटोक्यात आहेत, तर भाज्यांच्या किमतीमुळे बटाट्याला मागणी वाढली आहे. कळमना ठोक बाजारात भाव प्रति किलो २५ रुपयांवर आहे. कळमन्यात लाल आणि पांढरा कांद्याची आवक वाढली आहे. पांढरे आणि लाल कांदे ७०० ते ७२५ रुपये मण (४० किलो) आहेत. अमरावती आणि अकोला येथून पांढरा तर बुलडाणा येथून लाल कांद्याची आवक आहे. थोडेफार ट्रक नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यातून येत आहेत.
श्रावणात कांद्याची विक्री कमी असल्याने दरही कमी असतात. तीन आठवड्याआधी भाव १००० रुपयांवर होते. नवीन कांदा बाजारात आल्यानंतर दर कमी होण्याचे शक्यता असल्याची माहिती कळमना बाजारातील आलू-कांदे आडतिया असोसिएशनचे अध्यक्ष जयप्रकाश वसानी यांनी दिली. (प्रतिनिधी)