शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

प्रादेशिक, राष्ट्रीय पक्षांना संपवण्याचा भाजपचा विडा; संविधान सन्मान महासभेत ॲड. आंबेडकरांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2025 11:01 IST

भाजप राष्ट्रीय पक्ष म्हणूनच राहिला. बाकीचे सगळे प्रादेशिक पक्ष झाले. या परिस्थितीतून बाहेर पडायचे असेल तर आरएसएसप्रणीत भाजपला मत देणार नाही, हा निर्धार करा असं आवाहन प्रकाश आंबेडकरांनी केले.

मुंबई - देशात एकीकडे जातींमध्ये भांडणे लावली जात आहेत. तर, दुसरीकडे प्रादेशिक व राष्ट्रीय पक्षांना संपवण्याचा विडा भाजपने उचलला आहे. तसे झाल्यास त्यांना खुले मैदान मिळेल. त्यामुळे विरोधी पक्षांची भूमिका आता वंचितांच्या खांद्यावर आली आहे. जे संविधानाला मानणारे राष्ट्रवादी, तर मनुवादाला मानणारे विघटकवादी आहेत, अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी मंगळवारी शिवाजी पार्क येथील संविधान सन्मान महासभेत केली. सभेला मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. 

या परिस्थितीतून बाहेर पडायचे असेल तर भाजपला मत देणार नाही हा निर्धार करा, असे आवाहनही त्यांनी केले. भाजप राष्ट्रीय पक्ष म्हणूनच राहिला. बाकीचे सगळे प्रादेशिक पक्ष झाले. या परिस्थितीतून बाहेर पडायचे असेल तर आरएसएसप्रणीत भाजपला मत देणार नाही, हा निर्धार करा. देशात विरोधी पक्ष शिल्लक राहिलेला नाही. त्यामुळेच भाजप नकली प्रश्न उपस्थित करत आहेत. विरोधी पक्ष मजबूत असता तर असली प्रश्नांना हात घालता आला असता. पाकिस्तानसोबत झालेल्या युद्धात भारताची ७ विमाने पाडल्याचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ड्रम्प सांगतात, पण विरोधी पक्ष काहीच कसा विचारत नाही, असाही हल्लाबोल त्यांनी केला. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी जगभर फिरतात. इतर देशांतील भारतीयांच्या सभा घेतात. अमेरिकेने एच१ व्हिसा बंद केला. कारण बाहेरचे लोक वाढले तर राज्य करतील ही भीती त्यांना आहे. मोदींनी भारताला नुकसान पोहोचवले आहे, पण इतर देशांतील भारतीयांची त्या त्या देशातून हकालपट्टी करण्याची व्यवस्था करून ठेवली आहे, असाही आरोप त्यांनी केला.  या देशातील प्रजा कशी असावी, हे ठरविण्याची वेळ मतदारांवर आली आहे. पैशांसाठी विकले जाऊ नका, असेही आवाहन ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केले. वंचितचे राज्य उपाध्यक्ष धैर्यवान फुंडकर, युवा अध्यक्ष सुजात आंबेडकर, भारतीय बौद्ध समाजाचे एस. पी. भंडारी, जगद्गुरू चन्नबसवानंद महास्वामी, विजयाबाई सूर्यवंशी (सोमनाथ सूर्यवंशी यांची आई), भन्ते राजज्योती (बुलडाणा), मौलाना डॉ. अब्दुर रशीद मदणी, ह.भ.प. श्री. ज्ञानेश्वर बंडगर महाराज, ओबीसी नेते लक्ष्मण हाके आदी व्यासपीठावर उपस्थित होते. 

आरएसएस नोंदणी का करत नाही? सर्वच राजकीय पक्ष, संघटना, संस्था यांना संविधानाप्रमाणे, कायद्याप्रमाणे नोंदणी करणे आवश्यक आहे. त्यानुसार धर्मदाय आयुक्त आणि निवडणूक आयुक्तांना जमाखर्च दिला जातो. मात्र, आमची संघटना ब्रिटिशांच्या काळातील आहे त्यामुळे नोंदणीचा प्रश्न येत नाही, हे आरएसएसचे उत्तर कायद्याचे पालन न करण्यासारखे आहे. याबाबत औरंगाबादला न्यायालयात खटला दाखल केला असून जोपर्यंत आरएसएसची नोंदणी होत नाही, तोपर्यंत टोकाचे भांडण सुरू राहील. ज्यावेळी नोंदणी होईल, त्यावेळी आमचे भांडण संपले, असे ॲड. आंबेडकर म्हणाले. 

English
हिंदी सारांश
Web Title : BJP Vow to Eliminate Regional, National Parties: Ambedkar's Criticism

Web Summary : Prakash Ambedkar criticizes BJP for dividing castes and aiming to eliminate regional and national parties. He urged people to not vote for BJP and accused Modi of harming India's interests, speaking at a Mumbai event.
टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरBJPभाजपाVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडी