शहरं
Join us  
Trending Stories
1
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
2
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
3
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
4
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
5
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
6
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
7
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
8
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
9
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
10
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
11
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
12
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
13
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
14
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
15
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
16
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
17
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
18
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
19
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
20
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
Daily Top 2Weekly Top 5

रासायनिक खतांचा हेक्टरी वापर घटतोय!

By admin | Updated: September 14, 2016 00:25 IST

दुष्परिणामाबाबत शेतकरी सतर्क; राज्यात रासायनिक खताच्या वापरात घट होत असून प्रति हेक्टर १७२ किलोवरुन १0७ किलोवर.

संतोष वानखडे वाशिम, दि. १३ : रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे जमिनीचा पोत बिघडत असल्याचा अनुभव शेतकर्‍यांना येत आहे. या अनुभवातूनच आता शेतकर्‍यांनी रासायनिक खतांचा अतिवापर टाळला असल्याचे कृषी विभागाच्या आकडेवारीवरून दिसून येते. २0१२ मध्ये राज्यात हेक्टरी १७२ किलोग्रॅम असलेला वापर २0१५ मध्ये १0७ किलोग्रॅमवर आला असून, २0१६ च्या खरीप हंगामात हा वापर सरासरी १00 किलोग्रॅमच्या आसपास असल्याचा अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे.रासायनिक खते व कीटकनाशक औषधांनी कृषी क्षेत्रात क्रांतिकारक बदल घडवून आणले आहेत. तर दुसरीकडे अन्नधान्य व भाजीपालावर्गीय पिकांवर कीटकनाशकांचा होत असलेला अतिरिक्त फवारा मानवी आरोग्याच्या दृष्टीने चिंता वाढविणारा आहे. खतांचा अतिरिक्त वापर जमिनीचा पोत बिघडविणारा तर कीटकनाशकांचा जादा फवारा मानवी आरोग्य धोक्यात टाकणारा आहे. खत व कीटकनाशक औषधींच्या वापराविषयी काही संकेत आहेत. यानुसार खताचा सरासरी वापर दर हेक्टरी ९५ किलोग्रॅमच्या आसपास असणे अपेक्षित आहे. हा वापर २0१२ पर्यंत सरासरी १७२ किलोग्रॅमपर्यंत पोहोचला होता, असे कृषी आयुक्तालयाच्या आकडेवारीवरून स्पष्ट होते. जमिनीचा पोत बिघडणे आणि भाजीपालावर्गीय पिकांसाठी धोकादायक ठरणे आदींचे महत्त्व शेतकर्‍यांना समजू लागल्याने त्यानंतर हळूहळू रासायनिक खतांचा अतिवापर कमी होत गेल्याचे दिसून येते. राज्यात सन २0११-१२ मध्ये दर हेक्टरी सरासरी १७२ किलोग्रॅम रासायनिक खतांचा वापर होता. सन २0१२-१३ मध्ये दर हेक्टरी ११९ किलोगॅ्रम, सन २0१४ मध्ये दर हेक्टरी १२५ अणि सन २0१५ मध्ये दर हेक्टरी १0७ किलोग्रॅम रासायनिक खतांचा वापर होता. २0१६ च्या खरीप हंगामातील निश्‍चित आकडेवारी राज्यस्तरावर अद्याप संकलित झाली नाही. तथापि, हा वापर दर हेक्टरी सरासरी १00 किलोग्रॅमच्या आसपास राहण्याची शक्यता कृषी विभागाच्या विश्‍वसनीय सूत्रांनी वर्तविली.