शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
3
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
4
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
5
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
6
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
7
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
8
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
9
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
10
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
11
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
12
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
13
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
14
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
15
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
16
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
17
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
18
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
19
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
20
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

टीव्ही टाळला; कुटुंबाचा संवाद जपला

By admin | Updated: March 2, 2015 00:13 IST

हिरलगेतील देसाई कुटुंब : तीस वर्षांपूर्वीच्या निर्णयाने नात्यातील वीण झाली घट्ट, राज्यात आदर्श

संतोष मिठारी -- कोल्हापूरशिक्षण झाले, नोकरी लागली अथवा व्यवसाय चांगला चालला आणि हातात चार पैसे आले की, घरांत सुधारणा, सुख-सोयीच्या वस्तू आणण्याची लगबग सुरू होते. त्यात प्राधान्याने दूरदर्शन संचाचा (टी.व्ही.) समावेश असतो. सुख-सोयीसाठी घेतलेला हाच टी.व्ही. पुढे कुटुंबात विसंवाद निर्माण करतो. त्याची अनेक उदाहरणे आहेत; पण याला अपवाद ठरले आहे, ते हिरलगे (ता. गडहिंग्लज) मधील देसाई कुटुंबीय. कुटुंब एकत्र राहावे, शिवाय एकमेकांमधील संवाद कायम राहावा म्हणून देसाई कुटुंबीयांनी आजतागायत घरी टी. व्ही. घेतलेला नाही.देसाई यांचे २५ जणांचे एकत्रित कुटुंब आहे. त्यात निवृत्त विस्तार अधिकारी बाबासाहेब देसाई, हिरलगेतील सोसायटीचे अध्यक्ष मानसिंग, बँकेतील निवृत्त अधिकारी कृष्णराव, गडहिंग्लज पंचायत समितीचे माजी उपसभापती सुभाष आणि नोकरदार वसंतराव हे पाच भाऊ आहेत. या सर्वांची मुले-मुली सध्या भारतीय सैन्यदल, अभियंता, डॉक्टर, प्राध्यापक, नोकरी, आदी क्षेत्रांत कार्यरत आहेत. या कुटुंबाला टी. व्ही. घेणे सहजशक्य आहे; पण वडिलधाऱ्यांनी ठरविलेले टी.व्ही. न वापरण्याचे तत्त्व कुटुंबातील प्रत्येक सदस्याने पाळले आहे. सध्या टी. व्ही. म्हणजे बहुतांश जणांचा जीव की प्राण बनला आहे. एकवेळ घरच्या लोकांची विचारपूस केली जात नाही; पण टी. व्ही. मालिकांमधील पात्रे, त्यातील कथांवर तासन्-तास गप्पा, चर्चा केली जाते. विविध स्वरूपांतील मालिका, गेम-शो, आदी कार्यक्रमांनी घरा-घरांमधील संवाद कमी होत असल्याचे वास्तव आहे. अशा स्थितीत कुटुंबातील प्रत्येक सदस्याचा सर्वांशी संवाद कायम राहावा, एकत्रित कुटुंब कायम राहावे या उद्देशाने देसाई कुटुंबीयांनी पाळलेले हे तत्त्व आदर्शवत ठरणारे आहे.‘अटॅचमेंट’ वाढलीघरात टी.व्ही. नसल्यामुळे दिवसभरातील आपापली कामे आटोपून सायंकाळी कुटुंबातील सर्व सदस्य जेवण घेतल्यानंतर एकत्रित बसून गप्पा मारतात, चर्चा करतात. वैयक्तिक तसेच कौटुंबिक पातळ्यांवरील काही प्रश्नही सोडविले जातात, महत्त्वाचे निर्णय घेतले जातात. त्यातून कुटुंबातील प्रत्येक सदस्याची एकमेकांशी तसेच त्यांच्या नातेवाईक, मित्रमंडळींसमवेत ‘अटॅचमेंट’ वाढली आहे. आमचे वडील शिक्षक होते. त्यांनी व आईने पाचही भावंडांनी कायम एकत्रित राहावे, कुटुंबात सुसंवाद राहावा यासाठी घरात टी.व्ही. न वापरण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाला आज ३० वर्षे झाली. या निर्णयाचे पालन तिसरी पिढी करत आहे. वृत्तपत्रे, रेडिओचा वापर मनोरंजन, विविध घडामोडी समजावूून घेण्याााठी करतो. टी. व्ही. टाळल्याने कुटुंबांतील संवाद कायम आहे आणि त्याचे एक वेगळे समाधान आम्हा सर्वांना आहे. - सुभाष देसाई