शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
2
हंगेरीची मोठी घोषणा! नेतन्याहूंना अटक करणार; नवीन पंतप्रधान पीटर माग्यार यांचा इस्रायलला मोठा इशारा
3
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
4
Latest Marathi News LIVE Updates: चेन्नई सुपर किंग्जचा आयुष म्हात्रे दुखापतीमुळे IPL 2026 बाहेर
5
खाडी देशांत युद्ध...! भारतीय पर्यटकांनी या देशांकडे वळविला आपला मोर्चा; उन्हाळ्यात तुम्ही कुठे जाणार?
6
धक्कादायक! रील बनवण्याची हौस जिवावर बेतली; बाईकवरून स्टंट करताना पडून ३ भावांचा मृत्यू
7
एकनाथ शिंदेंनी शब्द पाळला; पहलगाममध्ये आदिलच्या कुटुंबाला घर बांधून दिले, १२ लाख खर्च केले!
8
“IPLप्रमाणे राजकारणात बोली लागतात, जिकडे जास्त बोली, तिकडे लोक अधिक”; ठाकरेंचा रोख कुणाकडे?
9
"चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात?
10
Apple कडून वर्षाकाठी मिळतात ₹५२५ कोटी; टिम कुक यांची एकूण संपत्ती किती? आकडा ऐकून धक्का बसेल...
11
मध्यमवर्गीयांसांठी Hyundai स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणनार, 500 kmची रेंज अन् ढासू फीचर्स मिळणार; TATAचं टेन्शन वाढणार?
12
मोदींचा 'झाल मुरी'चा व्हिडीओ, ममता बॅनर्जी म्हणाल्या, "कोणाचा विश्वास बसेल का की, पंतप्रधानांच्या पाकिटामध्ये..."
13
"मला विराट कोहलीसारखा पार्टनर हवाय...", युजवेंद्र चहलसोबत डेटिंगच्या चर्चा सुरू असतानाच 'बिग बॉस' फेम शेफाली बग्गाचं वक्तव्य
14
"भारत विसरत नाही, मर्यादा ओलांडल्यास..."; पहलगाम हल्ल्याला वर्ष होण्याआधी PAK ला सूचक संदेश
15
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा प्रेग्नेंट; नवरा फरमान खानचा मोठा दावा, पोलीस पोहोचले पण...
16
Narasimha Navratri 2026: २२ एप्रिलपासून 'नृसिंह नवरात्र' प्रारंभ! जाणून घ्या महत्त्व, अचूक पूजा विधी आणि लाभ 
17
IPL 2026: विराट कोहली-अनुष्का शर्मा वृंदावनमध्ये, प्रेमानंद महाराजांचे आशीर्वाद घेतले!
18
“राहुल गांधींना शक्य नाही, प्रियंका गांधी INDIA आघाडी चांगल्या प्रकारे पुढे नेऊ शकतात”; कुणाचा दावा?
19
"भाजपाचा २०२७ मध्येच निवडणुका घेण्याचा प्रयत्न, त्यासाठी घाईघाईत...", आमदार रोहित पवारांचा दावा
20
अभ्यासक्रम प्रशिक्षण, जनगणना, मतदारयादी पडताळणी; राज्यातील प्राथमिक शिक्षकांवर कामाचा डोंगर
Daily Top 2Weekly Top 5

गाड्या वाढताहेत; सुरक्षेचे काय?

By admin | Updated: July 10, 2014 00:57 IST

अर्थसंकल्पात नागपूरला नव्या दोन गाड्या मिळून आठ गाड्या नागपूरमार्गे धावणार आहेत. प्रत्येक अर्थसंकल्पात नव्या गाड्यांची घोषणा होते. परंतु सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कुठलाच विचार होत नाही.

अपुरी सुरक्षा यंत्रणा : चोऱ्या वाढल्या, रेल्वे रूळही दुर्लक्षितचदयानंद पाईकराव - नागपूर अर्थसंकल्पात नागपूरला नव्या दोन गाड्या मिळून आठ गाड्या नागपूरमार्गे धावणार आहेत. प्रत्येक अर्थसंकल्पात नव्या गाड्यांची घोषणा होते. परंतु सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कुठलाच विचार होत नाही. यामुळे रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची सुरक्षितताच धोक्यात आली असून नव्या गाड्या नकोत आधी सुरक्षा पुरवा, असे म्हणण्याची पाळी प्रवाशांवर आली आहे.नागपूर शहर देशाच्या केंद्रस्थानी आहे. नागपूर शहरातून दररोज १५० ते १६० रेल्वेगाड्या आणि ५० ते ६० हजार प्रवासी ये-जा करतात. रेल्वेगाड्यात प्रवाशांचे साहित्य चोरीला जाणे, पाकीट मारणे, मोबाईल पळविणे या घटना दररोजच्या झाल्या आहेत. रेल्वेगाड्यांच्या स्लिपर क्लासमध्ये तर सोडा एसी कोचमधील प्रवासी सुरक्षित नाहीत. अनेक गाड्यात ‘आरपीएफ’ जवानांची संख्या पुरेशी नसल्याने गस्त होत नाही. याचा फायदा चोरट्यांना मिळून ते थेट कोचमध्ये शिरून प्रवाशांची रोख रक्कम, दागिने, महागडे साहित्य लंपास करीत आहेत. नागपूर-सेवाग्राम या मार्गावर मागील अर्थसंकल्पात थर्ड लाईनच्या कामाला मंजुरी मिळाली. या मार्गाची रेल्वेगाड्या चालविण्याची क्षमता १०० असताना तेथे १५० रेल्वेगाड्या चालविण्यात येत आहेत. हा थेट रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेशी खेळ आहे. त्यामुळे थर्ड लाईनचे काम तातडीने पूर्ण करण्याची गरज आहे. परंतु या थर्डलाईनच्या १५०० कोटींच्या प्रकल्पासाठी मागील वर्षी २६.३६ कोटी आणि या वर्षी १५ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. या थर्डलाईनसाठी अशाच पद्धतीने निधीची तरतूद केल्यास हा प्रकल्प पूर्ण होण्यासाठी आणखी १० वर्षे लागतील, यात शंका नाही. नागपूर-वर्धा मार्गावर रनिंग कर्मचाऱ्यांच्या ड्युटीचे प्रमाणही १० तासांच्या वर होत असून विभागात लोकोपायलटची संख्याही कमी असल्यामुळे अधिक काम करणाऱ्या लोकोपायलटच्या हातून अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे रेल्वे मंत्रालयाने नव्या गाड्यांची घोषणा करण्यापूर्वी सुरक्षेच्या बाबतीत विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे. (प्रतिनिधी)