शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local News BREAKING: हार्बर रेल्वे ठप्प! सीएसएमटी स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला, प्रवाशांची तारांबळ
2
'देवेंद्र फडणवीसांना खोटं बोलण्यात गोल्ड मेडेल मिळेल'; रोहित पवारांचा खोचक टोला
3
नारायण राणे जिंकले नाहीत तर प्रचार कायमचा सोडणार; कट्टर राणे समर्थकाने घेतली शपथ, केला मताधिक्याचा दावा
4
चिंताजनक! जास्त मीठ खाणं ठरू शकतं मृत्यूचं कारण; वेळीच व्हा सावध, धडकी भरवणारा रिपोर्ट
5
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
6
“नरेंद्र मोदी अन् अमित शाहांना महाराष्ट्राचे तुकडे करायचेत”; संजय राऊतांचा दावा
7
T20 World Cup साठी न्यूझीलंडचा संघ जाहीर; अनोख्या पद्धतीने घोषणा, नव्या जर्सीत किवी संघ
8
Fact Check : पंजाबमध्ये भाजपाच्या विरोधात लोकांनी झेंडे जाळल्याचा Video दिशाभूल करणारा; हे आहे 'सत्य'
9
नोकरीच्या शोधात फिरणारी युवती अचानक बनली कोट्यधीश; ८ वर्षापूर्वी नेमकं काय घडलं?
10
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
11
बापरे! चौथ्या मजल्यावरून खाली पडलं 7 महिन्यांचं बाळ; काळजाचा ठोका चुकवणारा Video
12
'एकट्यात बोलवून साडीची पिन काढायचे अन्...'; प्रज्वल रेवन्नांविरोधात महिलेची पोलिसांत तक्रार
13
प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या, मग पोलिसांत दिली बेपत्ता असल्याची तक्रार, पण असं फुटलं बिंग
14
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
15
गुरुचे राशीपरिवर्तन: मेष ते मीन राशींवर कसा असेल प्रभाव? तुमची रास कोणती? लाभ की ताप? पाहा
16
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
17
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
18
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
19
...अन् नम्रता संभेरावला पाहून बोमन इराणींनी चक्क त्यांची BMW थांबवली, अभिनेत्रीने सांगितला किस्सा
20
'ये रिश्ता क्या कहलाता है' मधून हिना खानला काढण्यात आलं होतं, शिवांगी जोशी ठरली कारण?

२१ लाख कोटींचे कर्ज काढा, पण अर्थव्यवस्थेत वाढ करा - चव्हाण

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2020 6:18 AM

केंद्र सरकारकडे मागणी; तीन महिन्यांचे व्याज सरकारने भरावे

अतुल कुलकर्णी ।लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोण काय म्हणेल याचा विचार न करता मोठ्या प्रमाणावर कर्ज काढावे, सरकारी बॉन्डच्या माध्यमातून लोकांना पैसे द्यावेत, या आणीबाणीच्या संकटातून बाहेर पडण्यासाठी आपल्याला २१ लाख कोटींची गरज लागेल, असे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी लोकमतला सांगितले.अमेरिकेची अर्थव्यवस्था २१ तर चीनची १४ ट्रिलीयन डॉलर्सची आहे. भारताची २.८ ट्रिलीयन डॉलर्सची आहे. अमेरिकेने या संकटातून बाहेर पडण्यासाठी त्यांच्या अर्थव्यवस्थेच्या १० टक्के म्हणजे जवळपास २.२ ट्रिलीयन डॉलर्सचे पॅकेज जाहीर केले आहे. इंग्लंडने १६ टक्के, जर्मनीने २२ टक्के पॅकेज जाहीर केले आहे. आपणही अर्थव्यवस्थेच्या प्रमाणात १० टक्के पॅकेज जाहीर करणे आवश्यक आहे. मात्र पंतप्रधान मोदी यांनी फक्त १ लाख ७० हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले आहे. ते अत्यंत कमी आहे. आज कर्ज काढले म्हणून कोण काय म्हणेल याचा विचार करण्याची वेळ नाही. मजुरापासून ते पगारी नोकरदारापर्यंत सगळ्यांना पैसा द्यावा लागेल, असेही चव्हाण म्हणाले.

लॉकडाऊन उठविल्यानंतर लोकांकडे पैसाच नसेल तर सगळा बाजार ठप्प होईल. त्यासाठी ग्रामीण भागात क्रयशक्ती वाढवावी लागेल. बाजाराची परिस्थिती जर खराब असेल तर काहीही विकत घेण्याची मानसिकताच उरणार नाही. राष्टÑीयीकृत, खासगी व सहकारी बँकांचे तीन महिने हप्ते नाही भरले तरी चालतील, असे केंद्राने जाहीर केले आहे पण पैसाच नसेल तर लोक हप्ते व व्याज भरतील कसे? त्यामुळे या तीन महिन्यांचे व्याज सरकारने भरावे, , असेही चव्हाण यांनी स्पष्ट केले.ग्रामीण भागातील सहकारी पतसंस्था आणि विविध कार्यकारी सेवा सोसायट्या यांचेही तीन महिन्यांचे व्याज माफ करुन त्यांना देखील ही सवलत द्यावी. खासगी डॉक्टर, नर्सेस, पॅरामेडीकल स्टाफ यांचाही सरकारने विमा काढावा, अशी मागणीही त्यांनी केली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याPrithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाण