शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
3
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
4
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
5
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
6
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
7
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
8
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
9
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
10
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
11
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
12
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
13
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
14
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
15
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
16
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
17
ममता बॅनर्जींची सत्ता गेली! पराभवानंतर अभिषेक बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया; मतमोजणीवर उपस्थित केले गंभीर प्रश्न
18
Video: अंदमानच्या अथांग समुद्रात फडकवला तिरंगा! 'अंडरवॉटर' ध्वजारोहणाचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड
19
पाच राज्यांचे निकाल, काँग्रेसच्या पदरात काय? कोणत्या राज्यात किती जागा मिळाल्या?
20
“केरळच्या सुज्ञ जनतेची काँग्रेसचा विचार, राहुल गांधींच्या नेतृत्वाला साथ”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

२१ लाख कोटींचे कर्ज काढा, पण अर्थव्यवस्थेत वाढ करा - चव्हाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2020 06:19 IST

केंद्र सरकारकडे मागणी; तीन महिन्यांचे व्याज सरकारने भरावे

अतुल कुलकर्णी ।लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोण काय म्हणेल याचा विचार न करता मोठ्या प्रमाणावर कर्ज काढावे, सरकारी बॉन्डच्या माध्यमातून लोकांना पैसे द्यावेत, या आणीबाणीच्या संकटातून बाहेर पडण्यासाठी आपल्याला २१ लाख कोटींची गरज लागेल, असे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी लोकमतला सांगितले.अमेरिकेची अर्थव्यवस्था २१ तर चीनची १४ ट्रिलीयन डॉलर्सची आहे. भारताची २.८ ट्रिलीयन डॉलर्सची आहे. अमेरिकेने या संकटातून बाहेर पडण्यासाठी त्यांच्या अर्थव्यवस्थेच्या १० टक्के म्हणजे जवळपास २.२ ट्रिलीयन डॉलर्सचे पॅकेज जाहीर केले आहे. इंग्लंडने १६ टक्के, जर्मनीने २२ टक्के पॅकेज जाहीर केले आहे. आपणही अर्थव्यवस्थेच्या प्रमाणात १० टक्के पॅकेज जाहीर करणे आवश्यक आहे. मात्र पंतप्रधान मोदी यांनी फक्त १ लाख ७० हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले आहे. ते अत्यंत कमी आहे. आज कर्ज काढले म्हणून कोण काय म्हणेल याचा विचार करण्याची वेळ नाही. मजुरापासून ते पगारी नोकरदारापर्यंत सगळ्यांना पैसा द्यावा लागेल, असेही चव्हाण म्हणाले.

लॉकडाऊन उठविल्यानंतर लोकांकडे पैसाच नसेल तर सगळा बाजार ठप्प होईल. त्यासाठी ग्रामीण भागात क्रयशक्ती वाढवावी लागेल. बाजाराची परिस्थिती जर खराब असेल तर काहीही विकत घेण्याची मानसिकताच उरणार नाही. राष्टÑीयीकृत, खासगी व सहकारी बँकांचे तीन महिने हप्ते नाही भरले तरी चालतील, असे केंद्राने जाहीर केले आहे पण पैसाच नसेल तर लोक हप्ते व व्याज भरतील कसे? त्यामुळे या तीन महिन्यांचे व्याज सरकारने भरावे, , असेही चव्हाण यांनी स्पष्ट केले.ग्रामीण भागातील सहकारी पतसंस्था आणि विविध कार्यकारी सेवा सोसायट्या यांचेही तीन महिन्यांचे व्याज माफ करुन त्यांना देखील ही सवलत द्यावी. खासगी डॉक्टर, नर्सेस, पॅरामेडीकल स्टाफ यांचाही सरकारने विमा काढावा, अशी मागणीही त्यांनी केली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याPrithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाण