शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याच्या राज्य शासनाच्या निर्णयाचे विद्यार्थी संघटनांकडून स्वागत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2020 18:59 IST

परीक्षा रद्दचा निर्णय विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर घाला घालणारा असून कायद्याच्या चौकटीत टिकणारा नाही, अशीही भूमिका विद्यार्थी संघटनांकडून व्यक्त..

ठळक मुद्देविद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्देशानुसार अंतिम वर्षाच्या परीक्षा घेणे अपेक्षित

पुणे : अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याच्या राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयाचे बहुतांश विद्यार्थी संघटनांनी स्वागत केले आहे. मात्र, परीक्षांसंदभार्तील शासन निर्णयात अद्याप स्पष्टता आलेली नाही. त्यामुळे स्वायत्त महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांच्या परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेतल्या जात आहेत. तर परीक्षा रद्दचा निर्णय विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर घाला घालणारा असून कायद्याच्या चौकटीत टिकणारा नाही, अशीही भूमिका विद्यार्थी संघटनांकडून व्यक्त केली जात आहे. त्यामुळे परीक्षेवरील शासन निर्णयावर संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्देशानुसार अंतिम वर्षाच्या परीक्षा घेणे अपेक्षित आहे. परंतु,राज्यातील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याच्या घेतलेल्या निर्णयाचे अनेकांकडून स्वागत केले जात आहे. मात्र, शासन निर्णयात अद्याप स्पष्टता आलेली नाही. त्यामुळे पुणे शहरातील काही स्वायत्त महाविद्यालयांकडून अजूनही ऑनलाइन पद्धतीने अंतिम वर्षाच्या परीक्षा घेतल्या जात आहेत. बॅकलॉगच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा होणार की नाही याबाबतही अद्याप स्पष्टता नाही. तसेच हा निर्णय गुणवत्तापूर्ण शिक्षणाची मागणी करणाºया विद्यार्थ्यांसाठी दुदैर्वी असून, विद्यापीठाच्या स्वायत्तेवर घाला घालणारा आहे, असेही मत विद्यार्थी संघटनांकडून व्यक्त केले जात आहे.  ------शिक्षण विभागाच्या निर्णयाने सुमारे नऊ लाख विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेऊन घेतलेला हा निर्णय देशातील इतर राज्येही घेतील. ज्यांना परीक्षा द्यायची, त्यांनाही परीक्षा देता येणार आहे. परगावी असणाºया विद्यार्थ्यांना परीक्षा देणे शक्य झाले नसते, त्यामुळे राज्यातील; तसेच परराज्य व परदेशातील विद्यार्थ्यांनाही या निर्णयाचा लाभ मिळेल.- किरण साळी, उपशहरप्रमुख, शिवसेना ----------------कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने योग्य निर्णय घेतला आहे. सार्वजनिक वाहतूक बंद असल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना जाण्या-येण्यासाठी कोणतीही व्यवस्था नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना या निर्णयाचा फायदा होईल. परीक्षा महत्त्वाच्या असल्याने ज्यांना परीक्षा द्यायची, त्यांना परीक्षा देण्याचा पर्याय खुला ठेवला आहे.-अक्षय जैन, राष्ट्रीय संघटक, एनएसयुआय------------------------- कोणत्याही परीक्षा जिवापेक्षा मोठ्या नाहीत. कोरोना संसगार्चा धोका निर्माण होईल, अशा कोणत्याही गोष्टींची सक्ती योग्य नाही. परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांना संसर्ग झाला, तर त्याला जबाबदार कोण? त्यामुळे राज्य शासनाने परीक्षा रद्द करून विद्यार्थी हिताचा निर्णय घेतला आहे.ऋषी परदेशी- प्रदेश उपाध्यक्ष, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस.-----------------बॅकलॉगच्या विद्यार्थ्यांबाबत आणि स्वायत्त ऑटोनॉमस महाविद्यालयांना हा निर्णय बंधनकारक आहे का, यावर शासनाच्या धोरणात स्पष्टता नाही. काही स्वायत्त महाविद्यालयांच्या अंतिम वर्षाच्या ऑनलाइन परीक्षा सुरू आहेत. त्यामुळे शासनाने सरसकट अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द कराव्यात.-कल्पेश यादव, शहराध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना,-----अंतिम वर्षाची परीक्षा न घेण्याचा राज्य शासनाचा निर्णय विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा आहे. विद्यापीठ कायदा 2016 नुसार हा निर्णय जाहीर करण्याचा अधिकार राज्य शासनाला आहे का? हा निर्णय विद्यापीठ कायद्यानुसार न टिकणारा आहे. तसेच, गुणवत्तापूर्ण शिक्षणाची मागणी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा निर्णय दुर्दैवी असून विद्यापीठाच्या स्वायत्तेवर घाला घालणारा आहे.- अनिल ठोंबरे ,अभाविप,महानगर मंत्री, पुणे

.................. 

टॅग्स :Puneपुणेexamपरीक्षाStudentविद्यार्थीEducationशिक्षणState Governmentराज्य सरकार