शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

सोळा हजार शेतकरी आत्महत्या अन् कर्जमाफी श्रीमंतांना : शरद पवार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2019 2:43 PM

ईडीच्या मदतीने विरोधकांचा आवाज बंद करण्यात येईल असा तुम्हाला वाटत असेल तर अशा शेकडो ईडीचं काय करायचं यासाठी आम्ही ताकदवान आहोत त्याची चिंता तुम्ही करू नका असा इशाराही पवारांनी दिला.

मुंबई - मागील पाच वर्षांपासून शेतकऱ्याला त्याच्या घामाची किंमत मिळत नाही. शेतकऱ्याला दोन पैसे मिळालेले या सत्ताधाऱ्यांना पटत नाही. देशाची आर्थिक परिस्थिती बिकट झाली असताना यांच्याकडून श्रीमंतांची थकबाकी माफ केली जाते पण शेतकऱ्याला कर्जमाफी दिली जात नाही, त्यामुळे मागील पाच वर्षात राज्यात 16 हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस आणि मित्रपक्षांच्या संयुक्त पुरोगामी महाआघाडीचे गेवराई मतदारसंघाचे उमेदवार विजयसिंह पंडित आणि बीडचे उमेदवार संदीप क्षीरसागर यांच्या सभेला झालेल्या गर्दीवरून या दोन्ही मतदार संघात चमत्कार होणार, असं शरद पवार यांनी म्हटले आहे.

आपल्या सर्व मित्रापक्षाकडून नव्या पिढीला नेतृत्व देण्याचे काम होत आहे. ५२ वर्षापूर्वी मी २७ वर्षाचा असताना यशवंतराव चव्हाण यांनी मला विधानसभेला उभे राहण्याची संधी दिली. त्यामुळे तरुणांना संधी देण्याची जबाबदारी माझ्यावर देखील आहे. आज मी राज्यात फिरताना पाहतोय की लोकांमध्ये या सरकारविषयी नाराजी आहे. लोकांना बदल हवाय. लोकांच्या प्रश्नासाठी आणि लोकांसाठी तुम्ही काय केलं ते सांगा. मात्र ते सांगायची तुमची लायकी नाही आणि सांगायला भांडवलही नाही. त्यामुळे विरोधकांवर तुम्ही आज खोटा खटला भरू शकता पण निकाल लागल्यावर तुमची जागा दाखवण्याचे काम तेव्हाचे सरकार करेल यात शंका नाही, असंही पवार म्हणाले.

देशाचे गृहमंत्री अमित शहा म्हणतात शरद पवारांनी काय केलं. पण अमित शाहानाच पाच वर्षापूर्वी कोणीही ओळखत नव्हते. राज्यात रोजगार हमी कायदा पहिल्यांदा आम्ही आणला, महिलांना आरक्षण देण्याचा निर्णय आम्हीच घेतला हे सारे समजून घ्या, मग बोला. महाराष्ट्रासाठी आम्ही काय केलं हे विचारायचा अधिकार तुम्हाला नाही तो राज्याच्या जनतेला आहे.

आपल्या सत्तेचा गैरवापर करण्याचे काम आजचे सत्ताधारी करत आहेत. देशाचे माजी अर्थमंत्री चिदंबरम सरकारविरोधात बोलत असल्याने त्यांच्यावर खोटेनाटे आरोप करून महिन्याभरापूर्वी तुरुंगात घालण्याचे काम सत्ताधाऱ्यांनी केले. माझ्यावर देखील आरोप करण्याचा प्रयत्न केला. ईडीच्या मदतीने विरोधकांचा आवाज बंद करण्यात येईल असा तुम्हाला वाटत असेल तर अशा शेकडो ईडीचं काय करायचं यासाठी आम्ही ताकदवान आहोत त्याची चिंता तुम्ही करू नका असा इशाराही पवारांनी दिला.