शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

इराकमध्ये अडकलेले सहा अभियंते अखेर मुंबईकडे रवाना

By admin | Updated: June 25, 2014 01:20 IST

इराकमधील दहशतवादी हल्ल्याचा थरार अनुभवलेले मुंबई-पुण्यातील सहा अभियंते अखेर बुधवारी पहाटे सुखरुप भारतात परतणार आहेत.

काम अर्धवट सोडले : बुधवारी पहाटे ४.३० वाजता मुंबई विमानतळावर उतरणारयवतमाळ : इराकमधील दहशतवादी हल्ल्याचा थरार अनुभवलेले मुंबई-पुण्यातील सहा अभियंते अखेर बुधवारी पहाटे सुखरुप भारतात परतणार आहेत. प्रकल्प व्यवस्थापक विजय बळीराम तावडे यांच्या नेतृत्वात हे पथक इराकमध्ये कार्यरत होते. या पथकात मोहम्मद सय्यद अहमद, लियाकत अली, मोहम्मद वाजीद अन्सारी, शमशाद अली, मोहम्मद अलीशर अन्सार यांचा समावेश आहे. त्यातील पाच मुंबईचे तर एक पुण्याचा रहिवासी आहे. बुधवार दि. २५ जून रोजी पहाटे ४.३० वाजता त्यांचे अरेबियन एअर लाईन्सच्या विमानाने मुंबईला आगमन होत आहे. मुले सुखरुप परतणार असल्याने त्यांच्या कुटुंबीयांनीही सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. हे सहाही अभियंते पुण्यातील डॅसेस आयटी इन्फ्रा प्रा.लि. या कंपनीचे अधिकारी आहेत. सदर कंपनीने इराकच्या काबूल शहरात मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल निर्मितीचे कंत्राट मिळविले होते. हॉस्पिटलमधील आयटी इन्फ्रास्ट्रक्चरच्या कामासाठी या अभियंत्यांना मुंबई-पुण्याहून इराकमध्ये पाठविण्यात आले होते. परंतु दहशतवाद्यांनी ठिकठिकाणी हल्ले केल्याने इराकमध्ये वातावरण असुरक्षित झाले. तेथे सुरू असलेला थरार या अभियंत्यांनी अनुभवला. इराकमध्ये कुणाचाही जीव सुरक्षित नसल्याची जाणीव झाल्याने अखेर कंपनीने त्या सहाही अभियंत्यांना काम अर्धवट सोडून परत बोलविण्याचा निर्णय घेतला. एक्झिट व्हिसाच्या प्रतीक्षेत या अभियंत्यांचा भारतात परतीचा प्रवास आठवडाभर लांबला. मात्र अखेर हे सहाही अभियंते अरेबियन विमानाने नजफ विमानतळावरून मुंबईसाठी रवाना झाले असून २५ जूनला पहाटे ते मुंबईत पोहोचणार आहेत. (जिल्हा प्रतिनिधी)