शहरं
Join us  
Trending Stories
1
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
2
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
3
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
4
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
5
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
6
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
7
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
8
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
9
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
10
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
11
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
12
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
13
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
14
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
15
‘स्लीपर वंदे भारत’ जगात स्वस्त! चीन, अमेरिकेत हायस्पीड ट्रेनचे तिकीट किती? आकडे अवाक् करतील
16
नव्या आर्थिक वर्षात टाटा मोठा धमाका करणार! लवकरच ६ नव्या 'ढासू' कार बाजारात आणणार; बघा संपूर्ण प्लॅन
17
हॉटेलची रूम दिसते चकाचक, पण टॉयलेट सीटपेक्षा घाणेरड्या असतात 'या' गोष्टी; वापरताना सावधान
18
महिलांना दरमहा ३००० रुपये, मोफत बस प्रवास अन्...! सुवेंदू सरकार ॲक्शन मोडवर, १ जूनपासून खात्यात जमा होणार पैसे
19
"रस्त्यावर नमाज पठण चालणार नाही, प्रेमाने सांगून ऐकलं नाही तर..."; मुख्यमंत्री आदित्यनाथ यांचा इशारा 
20
IPL 2026 सुरू असताना धोनी अचानक NSG कॅम्पमध्ये; कमांडोंसोबत केला नेमबाजीचा सराव (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांचे तळतळाट घेऊ नका; सामनातून केंद्रसरकारवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2019 12:15 IST

आधी कोरडा दुष्काळ आणि नंतर ओढवलेल्या ओल्या दुष्काळाच्या संकटाने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे जगणे असह्य करून सोडले आहे.

मुंबई : आधीचे कर्ज डोक्यावर असतानाच परतीच्या पावसाने पिकांची जी प्रचंड नासाडी केली त्यामुळे खचलेला शेतकरी रोज मृत्यूला कवटाळतो आहे. मागील एका महिन्यात मराठवाडय़ातील 68 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे आकडेदेखील अस्वस्थ करणारे आहेत. हतबल शेतकरीकेंद्र सरकारकडे मोठय़ा आशेने पाहत आहेत. आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांचे तळतळाट घेऊ नका, तातडीने भक्कम आधार देऊन त्यांचे प्राण वाचवा, असे म्हणत शिवसेनेकडून सामानातून केंद्रसरकारवर निशाणा साधण्यात आला आहे.

आधी कोरडा दुष्काळ आणि नंतर ओढवलेल्या ओल्या दुष्काळाच्या संकटाने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे जगणे असह्य करून सोडले आहे. खासकरून मराठवाडय़ातून येणाऱ्या शेतकरी आत्महत्यांच्या बातम्या मन विषण्ण करणाऱ्या आहेत. मराठवाडय़ाच्या प्रत्येक जिल्हय़ात आत्महत्यांचे सत्रच सुरू झाले आहे. 14 ऑक्टोबर ते 11 नोव्हेंबर या सुमारे एक महिन्याच्या कालावधीत मराठवाडय़ातील 68 शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपवली. तर हतबल झालेले शेतकरी केंद्र सरकारकडे मोठय़ा आशेने पाहत आहेत.

दुबार पेरणीच्या संकटाला तोंड देतानाच पीक विम्यासाठी रांगा लावाव्या लागतात़. नुकसान झाले तर पुन्हा पीक विम्याच्या भरपाईसाठी कंपन्यांच्या कार्यालयात खेटे मारावे लागतात. तर राष्ट्रपती राजवटीतील सरकारने अजूनही ओला दुष्काळ जाहीर केला नाही. शिवाय राज्यपालांनी जी मदत जाहीर केली तीही इतकी तुटपुंजी आहे की त्यातून शेतकऱ्यांना कुठलाही दिलासा मिळालेला नसल्याचे सामनात म्हटलं आहे.

शेतकऱ्यांसाठी प्रत्येक ठिकाणी मदत केंद्र शिवसेनेच्या माध्यमातून सुरू करण्यात आले आहेत. या केंद्रांवर जाऊन शिवसेनेचे नेते शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेत आहेत. त्यातच राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा सुटू न शकल्याने अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना हवी असलेली मदत मिळत नाही. त्यामुळे केंद्र सरकरकडून शेतकऱ्यांना मदत देण्यात यावी अशी मागणी  सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आली आहे.