शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan Tension: पाकिस्तान वेडापिसा! भारतातील 'या' ठिकाणांवर मिसाईल सोडली, Indian Army ने झटक्यात पाडली
2
India Pakistan War : भारताने लाहोर ते कराचीपर्यंतच्या ९ शहरांवर इस्रायली ड्रोनने हल्ला केला; घाबरलेल्या पाकिस्तानचा दावा
3
Operation Sindoor: भारतीय लष्कराचा पाकमध्ये आणखी एक 'धमाका'; लाहोरमधील HQ-9 डिफेन्स सिस्टम केली उद्ध्वस्त
4
भारत-पाक तणावादरम्यान सोन्या-चांदीचे दर आपटले; झाली मोठी घसरण, काय आहेत नवे दर?
5
पाकिस्ताने भारतातील १५ ठिकाणी क्षेपणास्त्रे डागली; एस-४०० 'सुदर्शन चक्र'ने हवेतच केली उद्ध्वस्त
6
Operation Sindoor: पाकिस्तानसोबतच चीनलाही दणका! भारतानं उद्ध्वस्त केलेली लाहोरमधील HQ-9 डिफेन्स सिस्टम काय आहे?
7
'आम्ही तुमच्यासोबत आहोत', ऑपरेशन सिंदूरनंतर सर्वपक्षीय बैठकीत विरोधकांचा सरकारला पाठिंबा
8
Sanjay Singh : “पाकिस्तानने अमृतसर, होशियारपूरमध्ये क्षेपणास्त्रे डागण्याचा प्रयत्न केला, जो सैन्याने हाणून पाडला”
9
Raigad Accident: रायगडमध्ये भीषण अपघात! डंपर आणि एसटीच्या धडकेत चौघांचा मृत्यू, २० जण गंभीर जखमी
10
आधी सिंदूर आता आणणार पूर! भारताने उघडले बगलिहारचे दरवाजे, पाकिस्तानात पाणीच पाणी
11
"डॉक्टरांच्या चुकीमुळे गर्भपात झाला", प्रसिद्ध अभिनेत्रीची दुःखद कहाणी, म्हणाली- "तिसऱ्या महिन्यातच मला..."
12
Operation Sindoor: मोठी बातमी! कंदहार प्लेन हायजॅकचा मास्टरमाईंड रौफ असगरचा हल्ल्यात खात्मा
13
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर सर्वपक्षीय एकत्र; बैठक संपताच काँग्रेस खासदार राहुल गांधी म्हणाले...
14
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तानच्या दोन मित्रराष्ट्रांचे परराष्ट्र मंत्री भारत दौऱ्यावर, जयशंकर यांची भेट
15
Operation Sindoor : एअर स्ट्राइक दिवशी झाला जन्म, कुटुंबीयांनी मुलीचे नाव 'सिंदूर' ठेवले
16
तुम्हीही वारंवार पर्सनल लोन घेता? मग 'हे' ५ मोठे तोटे समजून घ्या; अनेकजण करतात दुर्लक्ष
17
Mumbai: पत्नीची हत्या करून मृतदेह बेडमध्ये लपवला, मुंबईतील गोरेगाव येथील धक्कादायक प्रकार
18
"मी रात्रभर त्यांच्या फोनची वाट पाहिली, पण..."; ढसाढसा रडली शहीद दिनेश कुमार यांची पत्नी
19
"तुमच्या हातात माईक दिलाय म्हणून तुम्ही काहीही बडबडू नका..."; रोहित शर्मा समालोचकांवर भडकला
20
'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरूच! किती आतंकवादी मारले? संरक्षण मंत्र्यांनी आकडाच सांगितला!

Maharashtra Politics: “५ महिन्यांपूर्वी मोठा धमाका झाला, आता नव्या वर्षातही...”; शिंदे गटातील नेत्याचा गौप्यस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2022 17:14 IST

Maharashtra News: एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या संपर्कात अनेक आमदार असल्याचा दावा शिंदे गटाकडून करण्यात आला आहे.

Maharashtra Politics: राज्यामध्ये शिंदे-फडणवीस सरकार आले आहे. ते २०१९ मध्ये यायला हवे होते, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. यानंतर पुन्हा एकदा आता राजकीय आरोप-प्रत्यारोप होऊ लागले आहेत. यातच शिंदे गटातील एका मंत्र्यांने गौप्यस्फोट करत नवीन वर्षात मोठ्या घडामोडी घडू शकतात, असा दावा केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेरत्नागिरी दौऱ्यावर आहेत. यावेळी शिंदे गटातील मंत्री, नेते उपस्थित होते. राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आमदार संपर्कात असल्याबाबतचे विधान केले आहे. 

गेल्या काही दिवसांपूर्वी सरकार पडण्याचे दावे केले गेले. मात्र त्यात काहीही तथ्य नव्हते. तेव्हा १७० हा आमचा मेजॉरीटी आकडा आहे. मात्र, यानंतर आता आगामी काळात १० ते १२ आमदार आमच्या संपर्कात आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याही संपर्कात काही आमदार आहेत. त्यामुळे शिंदे-फडणवीस सरकारच्या संख्याबळाचा आकडा १८० ते १८२ पर्यंत जाऊ शकतो. धमाका पाच महिन्यांपूर्वीच झाला, त्याचे पडसाद नव्या वर्षात आणखी दिसू शकतात, असा मोठा दावा उदय सामंत यांनी केला. 

कितीही लोक आले तरी सरकार कधी घाबरत नाही   

राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तारही रत्नागिरीत आहेत.  महाविकास आघाडीच्या वतीने महामोर्चा काढला जाणार आहे. त्यावर बोलताना अब्दुल सत्तार म्हणाले की, कितीही लोक आले तरी सरकार कधी घाबरत नाही. कायदा सुव्यवस्था कायम राहील, याची विरोधकांनी खबरदारी घ्यावी. शेवटी काही नियम असतात, काही धोरण असतात त्याचे पालन करावे आणि मोर्चा काढावा. आम्ही कुणाला अडवले नाही, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले आहे, असे सत्तार यांनी सांगितले.

दरम्यान, मनसेसोबतच्या युतीबाबत बोलताना, मनसेने कोणासोबत जायचे हे राज ठाकरे ठरवतील. राज ठाकरे हे राज्यातील प्रमुख नेत्यांपैकी एक नेते आहेत. त्यांनी कुणासोबत जावे हा त्यांचा निर्णय आहे. पण ते आमच्यासोबत आले तर वेलकम. आमच्या सर्व नेत्यांनी त्यांना सन्मानाने आमच्यासोबत येण्याचे आवाहन केले आहे. पण शेवटी निर्णय राज ठाकरे यांचा आहे. ते काय निर्णय घेतील हे कुणीही सांगू शकत नाही, असे सत्तार म्हणाले. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Uday Samantउदय सामंतRatnagiriरत्नागिरीEknath Shindeएकनाथ शिंदे