शहरं
Join us  
Trending Stories
1
शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे बाळाचा मृत्यू?; आईची भोईवाडा पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
3
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
4
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
5
कुजबुज! लोकप्रिय व्यक्तिमत्व डॉ. अभिजित बिचुकलेंना विधान परिषदेवर संधी द्यावी, शिंदेंकडे मागणी
6
महामार्गांवरील वाहतूक चिन्हांचे आता होणार ऑडिट; आयआयटी रुरकीची नेमणूक प्रस्तावित
7
फरार ‘मार्क’सोबत जियाचे जॉइंट अकाउंट; पोलिस कोठडीत वाढ, १४.९५ लाख ड्रग्ज विक्रीचे?
8
भाईंदरपाड्यात सुरक्षा रक्षक, गावकऱ्यांत हाणामारी; १२ गुंठे जमिनीवरून पेटला वाद, सरनाईकांवर आरोप
9
अखेरच्या व्हिडिओ कॉलवर कृष्णानं वडिलांना सांगितले; ‘पप्पा, मी येतोय’...पण तो आलाच नाही
10
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
11
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
12
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
13
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
14
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
15
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
16
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
17
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
18
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
19
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
20
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
Daily Top 2Weekly Top 5

बिहारमध्ये योगी आदित्यनाथ यांचा झंझावात, १० दिवसांत ३१ रॅली; काँग्रेस आणि RJD वर घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2025 10:30 IST

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी १६ ऑक्टोबरपासून बिहार निवडणुकीच्या प्रचाराची सुरुवात केली होती

पटना - बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील प्रचार थंडावला आहे. गेल्या महिनाभर बिहारमध्ये निवडणुकीमुळे आरोप प्रत्यारोप सुरू होते. त्यात बिहारमध्ये एनडीए आणि महाआघाडी यांच्यात थेट लढत आहे. यात एनडीएकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक भाजपा नेत्यांनी बिहारमध्ये सभा घेतल्या. त्यात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मागील १० दिवसांत तब्बल ३१ रॅली आणि रोड शो काढून विरोधी काँग्रेस आणि आरजेडीवर घणाघात केला.

योगी आदित्यनाथ यांनी बिहारमध्ये १० दिवस प्रचार केला. त्यात त्यांनी ३० रॅली आणि एक रोड शो केला. योगी यांनी बिहारमध्ये एनडीएच्या ४३ उमेदवारांचा प्रचार केला. त्याशिवाय दरभंगा येथील एनडीए उमेदवाराच्या प्रचारासाठी त्यांनी रोड शोही काढला. बिहारमध्ये एनडीएमधून भाजपा, जेडीयू, लोजपा, हम आणि राष्ट्रीय लोकमोर्चा एकत्रितपणे निवडणूक लढवत आहेत. त्यात योगी आदित्यनाथ यांनी एनडीएच्या उमेदवारांना विजयी करण्याचं आवाहन जनतेला केले. 

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी १६ ऑक्टोबरपासून बिहार निवडणुकीच्या प्रचाराची सुरुवात केली होती. एनडीएच्या प्रचारात सर्वात सक्रीय मुख्यमंत्री आणि सर्वाधिक मागणी असणाऱ्या स्टार प्रचारकांपैकी एक योगी आदित्यनाथ होते. बिहारवासियांना सर्वाधिक आकर्षित करणारे स्टार प्रचारक म्हणून ‘बुलडोझर बाबा’ दिसले, छतांवर, भिंतींवर, झाडांवर, बुलडोझरवर उभे राहून बिहारच्या लोकांनी योगी आदित्यनाथ यांचे स्वागत केले. उत्तर प्रदेशात गुन्हेगारीबाबत झीरो टॉरलेंस धोरणामुळे उमेदवारांकडून योगी आदित्यनाथ यांची मागणी वाढली. मुख्यमंत्री योगींनी उत्तर प्रदेश व बिहारातील सुशासनाची तुलना केली. सोबतच जंगलराज, गुन्हेगारी, भ्रष्टाचारावर काँग्रेस-राजद आघाडीवर जोरदार निशाणा साधला.

दरम्यान, महाआघाडीने भारताला सुवर्णयुग देणाऱ्या बिहारला कमकुवत राज्यात बदलले आहे. जगाला नालंदा विद्यापीठ आणि ज्ञानाचा प्रकाश देणाऱ्या बिहारला काँग्रेस आणि आरजेडी आघाडीने निरक्षरता आणि अराजकतेत ढकलले आहे. या भूमीने माता जानकी, महात्मा बुद्ध आणि भगवान महावीरांना जन्म दिला. ही आर्यभट्ट, चाणक्य आणि चंद्रगुप्त मौर्य यांची भूमी आहे, परंतु काँग्रेस आणि आरजेडीने या पवित्र भूमीला जातीभेद आणि माफियावादाने कलंकित केले आहे. जातीच्या आधारावर समाजाचे विभाजन केले, सरकारी तिजोरी लुटली आणि बिहारच्या तरुणांना बेरोजगार केले असा आरोपही योगी आदित्यनाथ यांनी लावला. 

English
हिंदी सारांश
Web Title : Yogi Adityanath's whirlwind in Bihar: 31 rallies, slams Congress-RJD.

Web Summary : Yogi Adityanath conducted 31 rallies in Bihar over 10 days, campaigning for NDA candidates. He criticized Congress and RJD for corruption and misgovernance, contrasting it with Uttar Pradesh's improved law and order under his leadership. He urged voters to support NDA for development.
टॅग्स :Bihar Assembly Election 2025बिहार विधानसभा निवडणूक २०२५yogi adityanathयोगी आदित्यनाथBJPभाजपाcongressकाँग्रेसRashtriya Janata Dalराष्ट्रीय जनता दल