शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
4
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
5
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
6
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
7
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
8
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
9
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
10
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
11
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
12
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
13
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
14
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
15
‘धुरंधर’चा वाद सामंजस्याने सोडवावा, दिग्दर्शक आदित्य धर, निर्मात संतोष कुमार यांना उच्च न्यायालयाच्या सूचना
16
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
17
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
18
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
19
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
20
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
Daily Top 2Weekly Top 5

..हा तर बाद झालेला शहा

By admin | Updated: October 10, 2014 08:57 IST

वाघाला हे कसले उंदीर करणार, हा तर बाद झालेला शहा आहे, अशा शब्दांत भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या टीकेची शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी खिल्ली उडवली.

पुणे : आग्य्राच्या बादशहापुढे छत्रपती शिवाजीमहाराजांनी झुकण्यास नकार दिला. ते म्हणाले होते, मी फक्त आई- वडील, दैवतासमोर झुकेन. वाघाला हे कसले उंदीर करणार, हा तर बाद झालेला शहा आहे, अशा शब्दांत भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या टीकेची शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी खिल्ली उडवली. 
पुण्यात शिवसेना उमेदवारांच्या प्रचारासाठी झालेल्या सभेत ठाकरे यांनी अमित शहा यांना लक्ष्य केले. शहा यांनी काल वाघाचे पुन्हा उंदीर करायचे, अशी टीका केली होती. त्याचा ठाकरे यांनी समाचार घेतला. ते म्हणाले, ''विजापूरच्या बादशहापुढे विडा उचलताना अफझलखान म्हणाला होता- हा पहाड का चुहा है, मैं उसे ऐसा दबाके मारूंगा. महाराजांना त्यांनी मिठी मारली., तेव्हा महाराजांनी आपली वाघनखे काढली. माझी वाघनखे समोर बसली आहेत. हे कोणाला राजकीय वर्णन आहे असे वाटेल. ज्याने त्याने ते पाहावे.'' 
महायुती का तुटली हे सांगताना ठाकरे म्हणाले, ''दिल्लीत सत्ताबदल झाला. जनतेने राज्यातही सोन्याचे ताट वाढून ठेवले होते. पण, काही लोकांना अनुकूल काळात विपरित बुद्धी सुचते. युद्धात आता केवळ अर्जुन (डांगळे) आपल्याबरोबर आहे.'' काल दिलेल्या त्या मताची अगोदर किंमत द्या, असे सांगत त्यांनी भाजपावर टीका केली. ते म्हणाले, ''भाजपाकडे कोणता चेहरा आहे. दिल्लीच्या नावावर शेपटू हलविणारा मुख्यमंत्री हवा का?. आम्हाला या मातीत जन्मलेला, या मातीचा स्वाभिमान असलेला मुख्यमंत्री हवा आहे.''
लोकसभा निवडणुकीतच काँग्रेस व राष्ट्रवादीचे कपडे उतरविले. पुण्यातील योजनांचा दाबलेला पैसा आता बाहेर पडतोय., तुमच्या नाकर्तेपणामुळे शेतकर्‍यांच्या डोळ्यांतील अश्रू मला दिसतात, अशा शब्दांत त्यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली. ''
सभेला संपर्कनेते गजानन कीर्तीकर, प्रवक्त्या नीलम गोर्‍हे, रिपब्लिकन पक्षाचे अर्जुन डांगळे, माजी मंत्री शशिकांत सुतार, शहर अध्यक्ष अजय भोसले, पुणे शहरातील शिवसेनेचे उमेदवार आमदार चंद्रकांत मोकाटे, महादेव बाबर, श्याम देशपांडे, मिलिंद एकबोटे, सचिन तावरे, प्रशांत बधे, सुनिल टिंगरे, परशुराम वाडेकर आदि उपस्थित होते. 
(प्रतिनिधी)
 
■ राजकारणाचा एक शब्दही न बोलता, तुमच्या काय योजना आहे ते मांडा, माझ्या काय योजना आहेत त्या मांडतो. मग, जनतेला निर्णय घेऊन द्या, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी सर्व पक्षांना आव्हान दिले.