शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
4
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
5
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
6
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
7
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
8
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
9
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
10
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
11
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
12
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
13
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
14
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
15
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
16
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
17
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
18
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
19
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
20
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
Daily Top 2Weekly Top 5

ट्रॉली कालव्यात पडून सात ऊसतोड मजूर बेपत्ता

By admin | Updated: February 19, 2015 01:54 IST

सोलापूर-पुणे महामार्गावरील उजनी मुख्य कालव्याच्या पुलावरून ट्रॅक्टर कालव्यात पडल्याने सात ऊसतोड मजूर बेपत्ता झाले आहेत़ ही घटना बुधवारी पहाटे २़३०च्या सुमारास घडली़

डी. एस. गायकवाड ल्ल टेंभुर्णीसोलापूर-पुणे महामार्गावरील उजनी मुख्य कालव्याच्या पुलावरून ट्रॅक्टर कालव्यात पडल्याने सात ऊसतोड मजूर बेपत्ता झाले आहेत़ ही घटना बुधवारी पहाटे २़३०च्या सुमारास घडली़ शेतकऱ्याच्या नकळत ऊसतोडीचे पैसे घेऊन नगर जिल्ह्यातील हे मजूर रातोरात गाव सोडून जात होते.ऊसतोड करणारे मजूर पळून गेल्याची माहिती शेतकरी बाळासाहेब सोपान चंदनकर यांना मिळताच त्यांनी आपला भाऊ सहदेव यांच्यासह जीपमधून या मजुरांचा पाठलाग केला. भीमानगर येथे त्यांना हा ट्रॅक्टर दिसला़ तेव्हा त्यांनी चालकास ट्रॅक्टर थांबवण्यास सांगितले. परंतु ट्रॅक्टर न थांबता ऊसतोड मजूर घेऊन तसाच पुढे निघाला़ यावेळी चंदनकर बंधूंनी त्यांच्यावर दगडफेक केली़ शेतकऱ्याला चुकविण्याच्या नादात, घाबरलेल्या चालकाचा स्टेअरिंगवरील ताबा सुटला आणि ट्रॅक्टर पुणे-सोलापूर महामार्गावरील उजनीच्या कालव्यात पडला़ उजनी कालव्यात सध्या शेतीसाठी पाणी सोडण्यात आल्याने तो पूर्णक्षमतेने भरून वाहत आहे़ रात्रीची वेळ असल्याने ही घटना कोणाच्या लक्षात आली नाही़या दुर्घटनेमध्ये ट्रॅक्टरमधील चालक बाळासाहेब जगन्नाथ गुंजाळ (३०), रेखा अंबादास गुंजाळ (३०), कविता बाळासाहेब गुंजाळ (२५), हिरा राजू मोरे (२५), अर्जुन राजू मोरे (६), कार्तिक राजू मोरे (४), शुभम बाळासाहेब गुंजाळ (५) हे सर्व वाहून गेल्याचे पोलिसांनी सांगितले़ अंबादास सीताराम गुंजाळ (३९) व राजू सर्जेराव मोरे (३०) हे दोघे पोहून बाहेर निघाले़ बुधवारी सकाळी १०़१५ वाजता ते टेंभुर्णी पोलीस ठाण्यात जाऊन घडलेला सर्व प्रकार पोलिसांना सांगितला़कालव्यातील प्रवाह थांबविण्याची विनंती पोलीस प्रशासनाने पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना केली़ मात्र संबंधितांनी त्यांची दखल न घेता तांत्रिक अडचण सांगत पाणीप्रवाह सुरूच ठेवल्याने तपासाला अडसर निर्माण होत आहे़ (वार्ताहर)पोलिसांची धावपळ : घटनेची माहिती मिळताच टेंभुर्णी पोलिसांचे पथक क्रेन, रुग्णवाहिकेसह घटनास्थळी दाखल झाले़ तपास यंत्रणा वेगाने कामाला लागली़ क्रेनच्या सहाय्याने ट्रॅक्टर व ट्रॉली बाहेर काढण्यात आली, परंतु त्यामध्ये एकही व्यक्ती आढळली नाही़चंदनकर बंधूंवर गुन्हा दाखलगावाकडे निघालेल्या ऊसतोड मजुरांचा पाठलाग करून त्यांच्यावर दगडफेक करून त्यांच्या अपघातास जबाबदार धरून बाळासाहेब चंदनकर व बळीराम चंदनकर यांच्यावर ३०४ अ प्रमाणे गुन्हा दाखल करणार असल्याचे अधीक्षक दत्तात्रय मंडलिक यांनी सांगितले़